शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

आरटीओ कार्यालयात पाच दिवसानंतर इंटरनेट सेवा सुरळीत; बीएसएनएलच्या पथकाने केले काम

By आशपाक पठाण | Updated: October 4, 2022 21:50 IST

मंगळवारी दिवसभर कामकाज सुरळीत

लातूर : येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात मागील पाच दिवसांपासून बंद पडलेली इंटरनेट सेवा मंगळवारी सुरू झाली आहे. त्यामुळे दिवसभरात रखडलेली अनेक कामे मार्गी लावण्यासाठी अधिकारी व कर्मचारी कार्यरत होते. दसऱ्यामुळे कामे वाढली. पण नेट बंद पडल्याने अधिकारीही त्रस्त झाले होते.

लातूरच्या कार्यालयातील इंटरनेट बुधवारपासून बंद पडले होते. नेमका बिघाड कुठे झाला, याचा शोध लागत नसल्याने अधिकारीही हैराण झाले आहेत. दसऱ्यामुळे नवीन वाहनांची खरेदी जोमात आहे. पण, पासिंग अन् त्यांना देण्यात येणारा नंबरची सिस्टीम ऑनलाईन असल्याने विक्रेत्यांनाही वाहनधारकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

सोमवारी बीएसएनएलच्या पथकाने दिवसभर तपासणी करून तांत्रिक बिघाड दुरूस्त केला. कार्यालयीन वेळ संपल्यावर इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली. त्यामुळे मंगळवारी सकाळी नियमितपणे कामकाज सुरू करण्यात आले. पाच दिवसानंतर इंटरनेट सुरू झाल्याने लवकर काम करून घेण्यासाठी नागरिकांची वर्दळ अधिक दिसून आली.

रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न...

परिवहन कार्यालयात मागील चार ते पाच दिवसांपासून इंटरनेट सेवा बंद झाली होती. बीएसएनएलची लाइन असल्याने संबंधितांना फोनवरून माहिती दिल्याने सोमवारी दिवसभर प्रयत्न करून बीएसएनएलच्या पथकाने बिघाड शोधून काढला. पाच दिवसांपासून बंद असलेली इंटरनेट सेवा मंगळवारी नियमितपणे सुरू झाली. रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी अधिकारी, कर्मचारी प्रयत्न करीत असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये यांनी सांगितले.

टॅग्स :Internetइंटरनेटlaturलातूर