शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

बीबीएफ पेरणीसाठी २२ गावांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर अनंतपाळ : खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शिरूर अनंतपाळ तालुक्यातील बावीस गावचे दीड हजार शेतकरी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरूर अनंतपाळ : खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शिरूर अनंतपाळ तालुक्यातील बावीस गावचे दीड हजार शेतकरी बीबीएफ या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एक हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करणार आहेत. त्यासाठी तालुका कृषी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी गावांची आणि शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे.

शिरूर अनंतपाळ तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ३१ हजार २०८ हेक्टर्स असले तरी लागवडीसाठी उपयुक्त असणारी जमीन २९ हजार ७०० हेक्टर्स इतकी आहे. यापैकी ५ हजार हेक्टर्स बागायती जमीन असल्याने सर्वसाधारणपणे २८ हजार ५०० हेक्टर्सवर खरीप हंगामाची पेरणी करण्यात येणार आहे. यंदा खरीप हंगामाच्या पेरणीचा कृती आराखडा तालुका कृषी कार्यालयाकडून तयार करण्यात आला असून, २८ हजार ३८५ हेक्टर्सवर खरीप हंगामाच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार पारंपरिक शेतीला फाटा देऊन प्रायोगिक तत्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात असल्याने यंदा खरिपाच्या पेरणीसाठी बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा, यासाठी तालुका कृषी कार्यालयाच्यावतीने शेतकऱ्याची बैठक घेण्यात आली. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा वापर करून आगामी खरीप हंगामाची पेरणी करण्यासाठी २२ गावांमधील दीड हजार शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे.

उत्पादन वाढीसाठी दुहेरी फायदा...

बीबीएफ तंत्रज्ञान म्हणजे रूंद सरी वरंबा पध्दत. या पद्धतीचा अवलंब केल्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होतो. जास्त पाऊस पडला तर पाण्याचा निचरा लवकर होतो. त्यामुळे पिकाचे नुकसान होत आहे नाही. शिवाय पाऊस कमी झाला तर सरीमध्ये थांबलेल्या पाण्याचा पिकाला उपयोग होतो.

हेक्टरी एक हजार रुपये अनुदान....

शिरूर अनंतपाळ तालुक्यात ४८ गावे आहेत. त्यापैकी २२ गावांतील शेतकऱ्यांची बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करून पेरणी करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. यासाठी शासनाने पोखरा योजनेंतर्गत हेक्टरी एक हजार रुपये अनुदान जाहीर केले असून, एका शेतकऱ्याला दोन हेक्टरची मर्यादा दिली आहे. त्यामुळे एक हजार हेक्टर्सवर या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे, कृषी अधिकारी शिवप्रसाद वलांंडे यांनी सांगितले.