शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

बीबीएफ पेरणीसाठी २२ गावांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर अनंतपाळ : खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शिरूर अनंतपाळ तालुक्यातील बावीस गावचे दीड हजार शेतकरी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरूर अनंतपाळ : खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शिरूर अनंतपाळ तालुक्यातील बावीस गावचे दीड हजार शेतकरी बीबीएफ या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एक हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करणार आहेत. त्यासाठी तालुका कृषी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी गावांची आणि शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे.

शिरूर अनंतपाळ तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ३१ हजार २०८ हेक्टर्स असले तरी लागवडीसाठी उपयुक्त असणारी जमीन २९ हजार ७०० हेक्टर्स इतकी आहे. यापैकी ५ हजार हेक्टर्स बागायती जमीन असल्याने सर्वसाधारणपणे २८ हजार ५०० हेक्टर्सवर खरीप हंगामाची पेरणी करण्यात येणार आहे. यंदा खरीप हंगामाच्या पेरणीचा कृती आराखडा तालुका कृषी कार्यालयाकडून तयार करण्यात आला असून, २८ हजार ३८५ हेक्टर्सवर खरीप हंगामाच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार पारंपरिक शेतीला फाटा देऊन प्रायोगिक तत्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात असल्याने यंदा खरिपाच्या पेरणीसाठी बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा, यासाठी तालुका कृषी कार्यालयाच्यावतीने शेतकऱ्याची बैठक घेण्यात आली. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा वापर करून आगामी खरीप हंगामाची पेरणी करण्यासाठी २२ गावांमधील दीड हजार शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे.

उत्पादन वाढीसाठी दुहेरी फायदा...

बीबीएफ तंत्रज्ञान म्हणजे रूंद सरी वरंबा पध्दत. या पद्धतीचा अवलंब केल्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होतो. जास्त पाऊस पडला तर पाण्याचा निचरा लवकर होतो. त्यामुळे पिकाचे नुकसान होत आहे नाही. शिवाय पाऊस कमी झाला तर सरीमध्ये थांबलेल्या पाण्याचा पिकाला उपयोग होतो.

हेक्टरी एक हजार रुपये अनुदान....

शिरूर अनंतपाळ तालुक्यात ४८ गावे आहेत. त्यापैकी २२ गावांतील शेतकऱ्यांची बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करून पेरणी करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. यासाठी शासनाने पोखरा योजनेंतर्गत हेक्टरी एक हजार रुपये अनुदान जाहीर केले असून, एका शेतकऱ्याला दोन हेक्टरची मर्यादा दिली आहे. त्यामुळे एक हजार हेक्टर्सवर या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे, कृषी अधिकारी शिवप्रसाद वलांंडे यांनी सांगितले.