शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनवर करप्याचा प्रादुर्भाव, महागड्या औषधांची फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:24 IST

येरोळ : शिरूर अनंतपाळ तालुक्यात पावसाने महिनाभर पाठ फिरविल्याने खरीपातील सोयाबीनवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. सध्या सोयाबीन शेंगा ...

येरोळ : शिरूर अनंतपाळ तालुक्यात पावसाने महिनाभर पाठ फिरविल्याने खरीपातील सोयाबीनवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. सध्या सोयाबीन शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून रोगामुळे शेंगा सुकू लागल्या आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. महागडी औषधे खरेदी करुन शेतकरी फवारणी करीत असल्याचे दिसून येत आहे.

शिरूर अनंतपाळ तालुक्यात जूनमध्ये झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या आटोपल्या होत्या. पीकही चांगले उगवले होते. त्यामुळे शेतक-यांच्या आशा उंचावल्या होत्या. परंतु, त्यानंतर पावसाने महिनाभर दडी मारल्याने माळरानावरील पिके वाळत होती तर सुपिक जमिनीवर पिके कोमेजून जात होती. मुग, उडिदाचे काही ठिकाणचे पीकं करपून गेले.

सध्या सोयाबीन शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. अशा परिस्थितीत सोयाबीनवर उंटअळी, खोडमाशी, चक्री भुंगा आणि आता करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. कोवळ्या शेंगा सुकत आहेत. त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. परिणामी, तो हवालदिल झाला आहे. दरम्यान, येरोळ व परिसरात सोयाबीन पिकाची पाहणी कृषी विभागाचे अधिकारी सुभाष चोले, मोरे, तालुका कृषी अधिकारी संजय नाब्दे, कृषी पर्यवेक्षक बालाजी राजवाडे, कृषी सहायक एम.ओ. मोदी यांनी पहाणी करुन फवारणीसंदर्भात माहिती दिली.

कीड नाशकाची फवारणी करावी...

बहुतांश ठिकाणी सोयाबीन शेंगा लगडण्याच्या अवस्थेत आहे. त्यावर पाने खाणाऱ्या व शेंगा पोखरणा-या अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी किटकनाशकांची फवारणी करावी. तसेच सुरक्षित किट वापरावे. कृषी विभागाच्या सल्ल्याने औषधांची फवारणी करावी, असे तालुका कृषी अधिकारी संजय नाब्दे, कृषी सहाय्यक एम.ओ. मोदी यांनी सांगितले.