शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
3
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
4
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
5
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
6
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
7
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
8
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
9
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
10
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
11
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
12
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
13
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
14
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
15
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
16
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
17
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
18
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
19
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
20
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन एज्युकेशनमुळे पालकांचा वाढला खर्च; मोबाईल, टॅब, इंटरनेटची भर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:14 IST

लातूर : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी शाळा-महाविद्यालये बंद असल्याने ऑनलाईन शिक्षणावर अवलंबून राहावे लागत असल्याने पालकांचा अतिरिक्त खर्च वाढला ...

लातूर : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी शाळा-महाविद्यालये बंद असल्याने ऑनलाईन शिक्षणावर अवलंबून राहावे लागत असल्याने पालकांचा अतिरिक्त खर्च वाढला असून, मोबाईल, टॅब, इंटरनेट, लॅपटॉपवर खर्च करावा लागत आहे. नेटवर दोनशे तर मोबाईलसाठी साधारण १५ ते २० हजार रुपयांचा खर्च प्रत्येक पालकाला करावा लागला आहे. जिल्ह्यात पहिली ते बारावीची विद्यार्थी संख्या ५ लाख ५० हजार २३४ इतकी आहे. यातील दहावीची विद्यार्थी संख्या ४७ हजार २९४ आहे तर बारावीची ३६७ हजार ४१८ इतकी आहे. या दोन वर्गांचा विचार केला तर प्रत्येक पालकांना ५० हजारांच्या पुढे साहित्य खरेदीसाठी खर्च करावा लागला आहे. नववी ते पहिलीपर्यंत घरातील कोणत्याही सदस्याच्या मोबाईलवर काही पालक भागवत आहेत, तर काही पालकांनी स्वतंत्र खर्च केला आहे. एकंदर, ऑनलाईन शिक्षणामुळे पालकांचा अतिरिक्त खर्च वाढला आहे. प्रस्तुत विद्यार्थी संख्या मराठी माध्यमांच्या शाळांची आहे. इंग्रजी शाळांतील विद्यार्थ्यांवर तर पालकांना यापेक्षा अधिक खर्च करावा लागला आहे.

मोबाईल, संगणक आणि इंटरनेट

गेल्या दोन वर्षांपासून शाळा-महाविद्यालये बंद आहेत. ऑनलाईन शिकवणी वर्ग आहेत. त्यामुळे प्रत्येक पाल्याला मोबाईल किंवा संगणक द्यावा लागला आहे. त्यासाठी इंटरनेटचा खर्च वाढला. महिन्याला किमान दोनशे रुपये इंटरनेटवर खर्च होतो.

इंटरनेट पॅक संपल्यानंतर वर्ग बंद होण्याची भीती असते. त्यामुळे पॅक संपण्याअगोदर बॅलन्स टाकण्यासाठी मुलांची पालकांकडे मागणी होत आहे. प्रत्येक घरामध्ये ऑनलाईन शिक्षणामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.

मुलगी अकरावीला आहे. आता तिने लॅपटॉपची डिमांड केली आहे. मोबाईलवर त्रास होतो, असे तिचे म्हणणे होते. त्यामुळे लॅपटॉप खरेदी करावा लागला. ५० हजारांच्या पुढे खर्च आला. पर्यायच नसल्यामुळे लॅपटॉप घ्यावा लागला. - बालाजी होदाडे

मोबाईल, इंटरनेटचा खर्च वाढला असून, मुलांची अडचण होऊ नये म्हणून दोघांसाठी दोन मोबाईल घ्यावे लागले. त्यासाठी आर्थिक झळ सोसावी लागली. मोबाईल घेतला नसता तर त्यांचे वर्ग बुडाले असते. ऑनलाईन शिक्षणाशिवाय सध्या तरी पर्याय नाही. - साहेबराव निकाळजे

मुलांची एकाग्रता कमी

स्क्रीन टाईम वाढल्यामुळे मुलांची एकाग्रता कमी होण्याचा धोका आहे. लॉकडाऊनमुळे त्यांच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज बंद झाल्या आहेत. मित्रांशी संवादही कमी आहे. त्यामुळे त्यांच्यात चिडचिडेपणा येतोय. ऑनलाईन शिक्षणामध्ये नॉर्मल स्कूलचे वातावरण नाही. तिसऱ्या लाटेचे पालकांनी जास्तच मनावर घेतल्याने मुलांना बाहेर सोडले जात नाही. याचाही मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. - डॉ. आशिष चेपुरे, मानसोपचार तज्ज्ञ

पहिली ४६,७७८

दुसरी ४६,७३३

तिसरी ४६,२२१

चौथी ४७,६९९

पाचवी ४९,२१५

सहावी ४८,४८८

सातवी ४९,६३७

आठवी ४९,२९३

नववी ४८,४६५

दहावी ४७,२९४