शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
2
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
3
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
4
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
5
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
6
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
7
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
8
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
9
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
10
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
11
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
12
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
13
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
14
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
15
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
16
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
17
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
18
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
19
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
20
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  

चिंता वाढली; रेणा मध्यम प्रकल्पात केवळ १० टक्के पाणीसाठा

By संदीप शिंदे | Updated: March 13, 2024 15:46 IST

उन्हाची दाहकता वाढली, दररोज १० मिलीमीटर पाण्याचे होतेय बाष्पीभवन

रेणापूर : तालुक्यात उन्हाचा पारा वाढत असून, रेणा मध्यम प्रकल्पात सध्या केवळ १०.०६ टक्केच पाणीसाठा उपलब्ध असल्याने आगामी काळात टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या दररोज १० मिलीमीटरने पाण्याचे बाष्पीभवन होत असून, पाच महिन्यांत जवळपास १५ टक्के पाणीसाठा घटला आहे. त्यामुळे आगामी काळात पावसाळा सुरू होईपर्यंत पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे.

रेणापूर तालुक्यात व्हटी व रेणा हे दोन प्रकल्प मोठे आहेत. रेणा मध्यम प्रकल्पावर रेणापूर शहरासह दहा खेडी, पानगाव बारा खेडी, कामखेडा पाच खेडी, पट्टीवडगाव, खरोळा या गावांच्या नळयोजना अवलंबून आहेत. या वर्षी रेणापूर तालुक्यात जूनच्या मृग नक्षत्रात पाऊस पडला नाही. दमदार, मोठा पाऊस न झाल्याने व परतीचाही पाऊस न झाल्याने नदी, नाले, ओढे वाहिलेच नाहीत. त्यामुळे सध्या नद्यांचे पात्र कोरडेठाक आहे. अर्ध्या तालुक्याची तहान भागविणाऱ्या रेणा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातही मोठा दमदार पाऊस न झाल्याने कसलाही पाणीसाठा झाला नाही. सध्या रेणा प्रकल्पात १०.०६ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध असून, नागरिकांतून पुढील काळात पाण्यासाठी चिंता व्यक्त केली जात आहे. दरवर्षी परतीचा पाऊस झाल्यावर रेणा प्रकल्पात मुबलक पाणीसाठा होत होता. मात्र, यंदा परतीचा पाऊस न झाल्याने आगामी काळात टंचाईची दाहकता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे.

रेणा प्रकल्पात २.०६८ दलघमी उपयुक्त साठा...रेणा मध्यम प्रकल्पात सध्या उपयुक्त पाणीसाठा २.०६८ दलघमी, मृत पाणीसाठा १.१३ दलघमी, एकूण पाणीसाठा ३.१९७ दलघमी असून, शिल्लक पाण्याची टक्केवारी १०.०६ टक्के आहे. मागील पाच महिन्यांत १५ टक्के पाणीसाठा कमी झाला असून, ऑक्टोबर महिन्यामध्ये २४.८५ टक्के पाणीसाठा होता. पाच महिन्यांत जवळपास पंधरा टक्के जलसाठ्यात घट झाली आहे. विविध गावांच्या पाणीपुरवठा योजना आहेत, त्यांनी काटकसरीने पाण्याचा वापर करून पाणीटंचाई टाळावी, असे आवाहन प्रकल्पाचे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी केले आहे.

प्रकल्पाखालील तीन बॅरेजेस कोरडे...रेणा मध्यम प्रकल्पाखाली असलेल्या रेणा नदीवर घनसरगाव, रेणापूर, खरोळा बॅरेजेस आहेत. मात्र, नदीपात्रात पाणी नसल्याने व रेणा प्रकल्पातून पाणी न सोडल्याने हे तिन्ही बॅरेजेस कोरडे पडत आहेत. रेणा मध्यम प्रकल्पातून रेणापूर नगरपंचायतींतर्गत येणाऱ्या रेनापूर शहर, तांडे, वाड्यांना याच प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. सध्याच्या घडीला रेणापूरकरांना १३ ते १४ दिवसांनी नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे थोड्या-फार प्रमाणात पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. प्रशासनाने शेतीसाठी होणारा पाणीपुरवठाही बंद केलेला आहे.

टॅग्स :laturलातूरwater shortageपाणीकपात