शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

चिंता वाढली; रेणा मध्यम प्रकल्पात केवळ १० टक्के पाणीसाठा

By संदीप शिंदे | Updated: March 13, 2024 15:46 IST

उन्हाची दाहकता वाढली, दररोज १० मिलीमीटर पाण्याचे होतेय बाष्पीभवन

रेणापूर : तालुक्यात उन्हाचा पारा वाढत असून, रेणा मध्यम प्रकल्पात सध्या केवळ १०.०६ टक्केच पाणीसाठा उपलब्ध असल्याने आगामी काळात टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या दररोज १० मिलीमीटरने पाण्याचे बाष्पीभवन होत असून, पाच महिन्यांत जवळपास १५ टक्के पाणीसाठा घटला आहे. त्यामुळे आगामी काळात पावसाळा सुरू होईपर्यंत पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे.

रेणापूर तालुक्यात व्हटी व रेणा हे दोन प्रकल्प मोठे आहेत. रेणा मध्यम प्रकल्पावर रेणापूर शहरासह दहा खेडी, पानगाव बारा खेडी, कामखेडा पाच खेडी, पट्टीवडगाव, खरोळा या गावांच्या नळयोजना अवलंबून आहेत. या वर्षी रेणापूर तालुक्यात जूनच्या मृग नक्षत्रात पाऊस पडला नाही. दमदार, मोठा पाऊस न झाल्याने व परतीचाही पाऊस न झाल्याने नदी, नाले, ओढे वाहिलेच नाहीत. त्यामुळे सध्या नद्यांचे पात्र कोरडेठाक आहे. अर्ध्या तालुक्याची तहान भागविणाऱ्या रेणा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातही मोठा दमदार पाऊस न झाल्याने कसलाही पाणीसाठा झाला नाही. सध्या रेणा प्रकल्पात १०.०६ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध असून, नागरिकांतून पुढील काळात पाण्यासाठी चिंता व्यक्त केली जात आहे. दरवर्षी परतीचा पाऊस झाल्यावर रेणा प्रकल्पात मुबलक पाणीसाठा होत होता. मात्र, यंदा परतीचा पाऊस न झाल्याने आगामी काळात टंचाईची दाहकता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे.

रेणा प्रकल्पात २.०६८ दलघमी उपयुक्त साठा...रेणा मध्यम प्रकल्पात सध्या उपयुक्त पाणीसाठा २.०६८ दलघमी, मृत पाणीसाठा १.१३ दलघमी, एकूण पाणीसाठा ३.१९७ दलघमी असून, शिल्लक पाण्याची टक्केवारी १०.०६ टक्के आहे. मागील पाच महिन्यांत १५ टक्के पाणीसाठा कमी झाला असून, ऑक्टोबर महिन्यामध्ये २४.८५ टक्के पाणीसाठा होता. पाच महिन्यांत जवळपास पंधरा टक्के जलसाठ्यात घट झाली आहे. विविध गावांच्या पाणीपुरवठा योजना आहेत, त्यांनी काटकसरीने पाण्याचा वापर करून पाणीटंचाई टाळावी, असे आवाहन प्रकल्पाचे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी केले आहे.

प्रकल्पाखालील तीन बॅरेजेस कोरडे...रेणा मध्यम प्रकल्पाखाली असलेल्या रेणा नदीवर घनसरगाव, रेणापूर, खरोळा बॅरेजेस आहेत. मात्र, नदीपात्रात पाणी नसल्याने व रेणा प्रकल्पातून पाणी न सोडल्याने हे तिन्ही बॅरेजेस कोरडे पडत आहेत. रेणा मध्यम प्रकल्पातून रेणापूर नगरपंचायतींतर्गत येणाऱ्या रेनापूर शहर, तांडे, वाड्यांना याच प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. सध्याच्या घडीला रेणापूरकरांना १३ ते १४ दिवसांनी नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे थोड्या-फार प्रमाणात पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. प्रशासनाने शेतीसाठी होणारा पाणीपुरवठाही बंद केलेला आहे.

टॅग्स :laturलातूरwater shortageपाणीकपात