शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

चिंता वाढली; रेणा मध्यम प्रकल्पात केवळ १० टक्के पाणीसाठा

By संदीप शिंदे | Updated: March 13, 2024 15:46 IST

उन्हाची दाहकता वाढली, दररोज १० मिलीमीटर पाण्याचे होतेय बाष्पीभवन

रेणापूर : तालुक्यात उन्हाचा पारा वाढत असून, रेणा मध्यम प्रकल्पात सध्या केवळ १०.०६ टक्केच पाणीसाठा उपलब्ध असल्याने आगामी काळात टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या दररोज १० मिलीमीटरने पाण्याचे बाष्पीभवन होत असून, पाच महिन्यांत जवळपास १५ टक्के पाणीसाठा घटला आहे. त्यामुळे आगामी काळात पावसाळा सुरू होईपर्यंत पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे.

रेणापूर तालुक्यात व्हटी व रेणा हे दोन प्रकल्प मोठे आहेत. रेणा मध्यम प्रकल्पावर रेणापूर शहरासह दहा खेडी, पानगाव बारा खेडी, कामखेडा पाच खेडी, पट्टीवडगाव, खरोळा या गावांच्या नळयोजना अवलंबून आहेत. या वर्षी रेणापूर तालुक्यात जूनच्या मृग नक्षत्रात पाऊस पडला नाही. दमदार, मोठा पाऊस न झाल्याने व परतीचाही पाऊस न झाल्याने नदी, नाले, ओढे वाहिलेच नाहीत. त्यामुळे सध्या नद्यांचे पात्र कोरडेठाक आहे. अर्ध्या तालुक्याची तहान भागविणाऱ्या रेणा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातही मोठा दमदार पाऊस न झाल्याने कसलाही पाणीसाठा झाला नाही. सध्या रेणा प्रकल्पात १०.०६ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध असून, नागरिकांतून पुढील काळात पाण्यासाठी चिंता व्यक्त केली जात आहे. दरवर्षी परतीचा पाऊस झाल्यावर रेणा प्रकल्पात मुबलक पाणीसाठा होत होता. मात्र, यंदा परतीचा पाऊस न झाल्याने आगामी काळात टंचाईची दाहकता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे.

रेणा प्रकल्पात २.०६८ दलघमी उपयुक्त साठा...रेणा मध्यम प्रकल्पात सध्या उपयुक्त पाणीसाठा २.०६८ दलघमी, मृत पाणीसाठा १.१३ दलघमी, एकूण पाणीसाठा ३.१९७ दलघमी असून, शिल्लक पाण्याची टक्केवारी १०.०६ टक्के आहे. मागील पाच महिन्यांत १५ टक्के पाणीसाठा कमी झाला असून, ऑक्टोबर महिन्यामध्ये २४.८५ टक्के पाणीसाठा होता. पाच महिन्यांत जवळपास पंधरा टक्के जलसाठ्यात घट झाली आहे. विविध गावांच्या पाणीपुरवठा योजना आहेत, त्यांनी काटकसरीने पाण्याचा वापर करून पाणीटंचाई टाळावी, असे आवाहन प्रकल्पाचे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी केले आहे.

प्रकल्पाखालील तीन बॅरेजेस कोरडे...रेणा मध्यम प्रकल्पाखाली असलेल्या रेणा नदीवर घनसरगाव, रेणापूर, खरोळा बॅरेजेस आहेत. मात्र, नदीपात्रात पाणी नसल्याने व रेणा प्रकल्पातून पाणी न सोडल्याने हे तिन्ही बॅरेजेस कोरडे पडत आहेत. रेणा मध्यम प्रकल्पातून रेणापूर नगरपंचायतींतर्गत येणाऱ्या रेनापूर शहर, तांडे, वाड्यांना याच प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. सध्याच्या घडीला रेणापूरकरांना १३ ते १४ दिवसांनी नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे थोड्या-फार प्रमाणात पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. प्रशासनाने शेतीसाठी होणारा पाणीपुरवठाही बंद केलेला आहे.

टॅग्स :laturलातूरwater shortageपाणीकपात