शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

उघड्यावर कचरा जाळल्यामुळे गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:20 IST

थकीत वीज बिलाचा भरणा करण्याचे आवाहन लातूर : लातूर परिमंडळातील बीड, उस्मानाबाद आणि लातूर या तीन जिल्ह्यांतील वीजग्राहकांकडे मोठ्या ...

थकीत वीज बिलाचा भरणा करण्याचे आवाहन

लातूर : लातूर परिमंडळातील बीड, उस्मानाबाद आणि लातूर या तीन जिल्ह्यांतील वीजग्राहकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. त्यामुळे ज्या वीज ग्राहकांकडे बिल थकलेले आहे त्यांनी तात्काळ भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. कृषिपंपधारकांचा वीज बिल भरण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत २ लाख १० हजार शेतकऱ्यांनी ८२ कोटींचे वीज बिल भरले आहे. वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन लातूर परिमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

वाढत्या रुग्णसंख्येमुळे शेतशिवाराचा आसरा

लातूर : शहरासह ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. दरम्यान ग्रामीण भागातील अनेक गावांत कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने अनेक ग्रामस्थ कुटुंबासह शेतात राहायला गेल्याचे चित्र आहे. सध्या उन्हाची तीव्रता अधिक असून, शेतातच अनेकांचा मुक्काम आहे. औसा, उदगीर, नागरसोगा, निलंगा, जळकोट, देवणी, शिरूर अनंतपाळ, चाकूर आदी तालुक्यांतील ग्रामीण भागात हीच परिस्थिती आहे. शेतातील गोठ्यात अनेकांचे संसार थाटत असल्याचे चित्र आहे.

ग्रामपंचायतींच्या वतीने निर्जंतुकीकरण फवारणी

लातूर : ग्रामीण भागातील विविध ग्रामपंचायतींच्या वतीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्जंतुकीकरण फवारणी तसेच मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले जात आहे. तसेच दवंडीद्वारे जनजागृती केली जात असून, कोणताही आजार अंगावर न काढता नागरिकांनी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्सचे पालन करावे, विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन ग्रामपंचायतींच्या वतीने करण्यात आले आहे. या उपक्रमाला ग्रामस्थांचे पूर्ण सहकार्य मिळत आहे.

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई

लातूर : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियमावली देण्यात आली आहे. त्यानुसार किराणा दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरू ठेवण्याचे निर्देश आहेत. परिणामी, अनेक ठिकाणी या आदेशाचे उल्लंघन होत असल्याने प्रशासनाच्या वतीने पथकांची नियुक्त करण्यात आली आहे. तसेच पोलिसांच्या वतीने गस्त घातली जात असून, वेळेव्यतिरिक्त दुकाने सुरू असल्यास गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई केली जात आहे. व्यावसायिक, नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रेणापूर नाका परिसरात स्वच्छतेची मागणी

लातूर : शहरातील रेणापूर नाका परिसरात मनपाची घंटागाडी नियमित येत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. परिणामी, अनेक जण रस्त्याच्या कडेला, मोकळ्या प्लाॅटवर कचरा टाकत आहेत. दरम्यान हाच कचरा हवेसोबत रस्त्यावर उडत आहे. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. या भागातील नागरिकांनी वेळोवेळी मनपाच्या स्वच्छता विभागाकडे पाठपुरावा केला आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष असून, तात्काळ स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.

वीजपुरवठा खंडित होत असल्याने गैरसोय

लातूर : शहरासह ग्रामीण भागात सध्या वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे. त्यामुळे महावितरणच्या वतीने पाऊस असलेल्या परिसरातील वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. महावितरणच्या वतीनेही मान्सूनपूर्व कामे केली जात आहेत. दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता अधिक असल्याने अनेक जण कूलरचा आधार घेतात. मात्र, वीज गुल होत असल्याने गैरसोय होत आहे. त्यातच दोन दिवसांपासून वादळी वारे आणि अवकाळी पाऊस काही ठिकाणी असल्याने वीजपुरवठा वारंवार खंडित केला जात आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.