शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
4
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
5
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
6
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
7
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
8
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
9
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
10
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
11
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
12
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
13
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
14
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
15
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
16
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
17
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
18
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
19
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
20
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा

अपुऱ्या वीज अटकाव यंत्रणेमुळे दहा वर्षांत ७९ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 06:00 IST

जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार किमान २० ठिकाणी वीज अटकाव मनोरे उभारणे गरजेचे आहे.

लातूर : जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार किमान २० ठिकाणी वीज अटकाव मनोरे उभारणे गरजेचे आहे. मात्र गेल्या दहा वर्षांत केवळ ४ ठिकाणी हे मनोरे उभारण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत वीज पडून ७९ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद शासनदप्तरी आहे.जिल्ह्यातील बुधोडा, खरोसा (ता. औसा), हेर (ता. उदगीर) आणि वडवळ नागनाथ (ता. चाकूर) या परिसरात गेल्या दहा वर्षांत वीज अटकाव मनोरे उभारण्यात आले आहेत. शासनाकडून पावसाळ्याच्या दिवसात आणि अवेळी पडणाºया पावसात वीज पडून पशुधनांसह मानवी जीवितहानी होते. ती रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची मदत घेऊन वीज अटकाव यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. २००९ मध्ये प्रथम दोन मनोरे उभारण्यात आले. त्यामध्ये वडवळ नागनाथ आणि बुधोडा येथील मनोºयांचा समावेश आहे, त्यानंतर २०१० मध्ये हेर आणि खरोसा येथील उंच भागावर मनोरे उभारण्यात आले. या अटकाव यंत्रणेची देखभाल संबंधित तहसील कार्यालयाकडे आहे. जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार प्रत्येक तालुक्यांत दोन मनोरे उभारण्याची गरज आहे. मात्र २०१० नंतर नव्याने एकही मनोरा उभारण्यात आला नाही. २०१५ या वर्षात झालेल्या गारपिटीमुळे १६ जणांचा वीज पडून मृत्यू झाल्याची नोंद आहे. २००८ ते २०१८ या कालावधीतील २०१५ मध्ये सर्वाधिक जीवितहानी झाल्याचे प्रशासनाने सांगितले.वारसांना आर्थिक मदतपावसाळ्याच्या दिवसात अथवा अवकाळी पावसात वीज पडून मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना २०१५ पर्यंत दीड लाख रुपयांची मदत दिली जात होती. त्यानंतर या मदतीमध्ये २०१५ नंतर अडीच लाखांची वाढ करण्यात आली आहे. २०१५ नंतरच्या मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना चार लाखांची मदत करण्यात आली आहे. २००८ ते २०१४ या कालावधीत ५३ जणांच्या कुटुंबियांना दीड लाख रुपयांप्रमाणे करण्यात आली. तर २०१५ ते २०१८ या कालावधीत २६ जणांच्या कुटुंबियांना १ कोटी ४ लाखांची मदत करण्यात आली.