शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
3
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
4
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
5
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
6
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
7
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
9
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
10
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
11
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
12
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
13
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
14
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
15
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
16
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
17
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
18
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
20
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा

अपुऱ्या वीज अटकाव यंत्रणेमुळे दहा वर्षांत ७९ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 06:00 IST

जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार किमान २० ठिकाणी वीज अटकाव मनोरे उभारणे गरजेचे आहे.

लातूर : जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार किमान २० ठिकाणी वीज अटकाव मनोरे उभारणे गरजेचे आहे. मात्र गेल्या दहा वर्षांत केवळ ४ ठिकाणी हे मनोरे उभारण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत वीज पडून ७९ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद शासनदप्तरी आहे.जिल्ह्यातील बुधोडा, खरोसा (ता. औसा), हेर (ता. उदगीर) आणि वडवळ नागनाथ (ता. चाकूर) या परिसरात गेल्या दहा वर्षांत वीज अटकाव मनोरे उभारण्यात आले आहेत. शासनाकडून पावसाळ्याच्या दिवसात आणि अवेळी पडणाºया पावसात वीज पडून पशुधनांसह मानवी जीवितहानी होते. ती रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची मदत घेऊन वीज अटकाव यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. २००९ मध्ये प्रथम दोन मनोरे उभारण्यात आले. त्यामध्ये वडवळ नागनाथ आणि बुधोडा येथील मनोºयांचा समावेश आहे, त्यानंतर २०१० मध्ये हेर आणि खरोसा येथील उंच भागावर मनोरे उभारण्यात आले. या अटकाव यंत्रणेची देखभाल संबंधित तहसील कार्यालयाकडे आहे. जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार प्रत्येक तालुक्यांत दोन मनोरे उभारण्याची गरज आहे. मात्र २०१० नंतर नव्याने एकही मनोरा उभारण्यात आला नाही. २०१५ या वर्षात झालेल्या गारपिटीमुळे १६ जणांचा वीज पडून मृत्यू झाल्याची नोंद आहे. २००८ ते २०१८ या कालावधीतील २०१५ मध्ये सर्वाधिक जीवितहानी झाल्याचे प्रशासनाने सांगितले.वारसांना आर्थिक मदतपावसाळ्याच्या दिवसात अथवा अवकाळी पावसात वीज पडून मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना २०१५ पर्यंत दीड लाख रुपयांची मदत दिली जात होती. त्यानंतर या मदतीमध्ये २०१५ नंतर अडीच लाखांची वाढ करण्यात आली आहे. २०१५ नंतरच्या मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना चार लाखांची मदत करण्यात आली आहे. २००८ ते २०१४ या कालावधीत ५३ जणांच्या कुटुंबियांना दीड लाख रुपयांप्रमाणे करण्यात आली. तर २०१५ ते २०१८ या कालावधीत २६ जणांच्या कुटुंबियांना १ कोटी ४ लाखांची मदत करण्यात आली.