शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

अपुऱ्या वीज अटकाव यंत्रणेमुळे दहा वर्षांत ७९ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 06:00 IST

जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार किमान २० ठिकाणी वीज अटकाव मनोरे उभारणे गरजेचे आहे.

लातूर : जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार किमान २० ठिकाणी वीज अटकाव मनोरे उभारणे गरजेचे आहे. मात्र गेल्या दहा वर्षांत केवळ ४ ठिकाणी हे मनोरे उभारण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत वीज पडून ७९ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद शासनदप्तरी आहे.जिल्ह्यातील बुधोडा, खरोसा (ता. औसा), हेर (ता. उदगीर) आणि वडवळ नागनाथ (ता. चाकूर) या परिसरात गेल्या दहा वर्षांत वीज अटकाव मनोरे उभारण्यात आले आहेत. शासनाकडून पावसाळ्याच्या दिवसात आणि अवेळी पडणाºया पावसात वीज पडून पशुधनांसह मानवी जीवितहानी होते. ती रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची मदत घेऊन वीज अटकाव यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. २००९ मध्ये प्रथम दोन मनोरे उभारण्यात आले. त्यामध्ये वडवळ नागनाथ आणि बुधोडा येथील मनोºयांचा समावेश आहे, त्यानंतर २०१० मध्ये हेर आणि खरोसा येथील उंच भागावर मनोरे उभारण्यात आले. या अटकाव यंत्रणेची देखभाल संबंधित तहसील कार्यालयाकडे आहे. जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार प्रत्येक तालुक्यांत दोन मनोरे उभारण्याची गरज आहे. मात्र २०१० नंतर नव्याने एकही मनोरा उभारण्यात आला नाही. २०१५ या वर्षात झालेल्या गारपिटीमुळे १६ जणांचा वीज पडून मृत्यू झाल्याची नोंद आहे. २००८ ते २०१८ या कालावधीतील २०१५ मध्ये सर्वाधिक जीवितहानी झाल्याचे प्रशासनाने सांगितले.वारसांना आर्थिक मदतपावसाळ्याच्या दिवसात अथवा अवकाळी पावसात वीज पडून मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना २०१५ पर्यंत दीड लाख रुपयांची मदत दिली जात होती. त्यानंतर या मदतीमध्ये २०१५ नंतर अडीच लाखांची वाढ करण्यात आली आहे. २०१५ नंतरच्या मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना चार लाखांची मदत करण्यात आली आहे. २००८ ते २०१४ या कालावधीत ५३ जणांच्या कुटुंबियांना दीड लाख रुपयांप्रमाणे करण्यात आली. तर २०१५ ते २०१८ या कालावधीत २६ जणांच्या कुटुंबियांना १ कोटी ४ लाखांची मदत करण्यात आली.