शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

वाघनाळवाडीत हरिनाम सप्ताहाच्या प्रसादात भगर खाल्ल्याने २०० जणांना विषबाधा

By हरी मोकाशे | Updated: March 8, 2024 13:37 IST

सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची आरोग्य यंत्रणेची माहिती

लातूर : जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील वाघनाळवाडी येथे भगरीतून २०० जणांना विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी रात्री १ वा. च्या सुमारास घडली. त्यातील दीडशे जणांवर गावातील मंदिरात तर उर्वरित ५० जणांवर वलांडी येथील आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले आहेत. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे यांनी सांगितले.

देवणी तालुक्यातील वाघनाळवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरु आहे. गुरूवारी एकादशी असल्याने सायंकाळी ५ वा.च्या सुमारास भगरीचा फराळ करण्यात आला. या भगरीतून काही जणांना रात्री १२ वा. नंतर अचानक मळमळ होऊन उलट्या होण्यास सुरुवात झाली. तसेच चक्कर येऊन अशक्तपणा जाणवू लागला. त्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य रवि चिलमिले यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील यांना दिली. त्यांनी तातडीने ही माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला दिली. त्यामुळे वलांडी येथील आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एस. काळे यांचे आरोग्य पथकाने वाघनाळवाडी येथे दाखल झाले.

आरोग्य पथक तात्काळ दाखल होऊन उपचार सुरु केले. ज्यांना अधिक त्रास होत आहे, अशांना तातडीने वलांडी येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. उर्वरित रुग्णांवर गावातील मंदिराच्या सभागृहात उपचार सुरू करण्यात आले. आरोग्य पथक तात्काळ दाखल झाले आणि उपचार सुरु केले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे. बरे झालेल्यांना सुटी देण्यात आली आहे. एकही रुग्ण गंभीर नाही, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे यांनी दिली.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाlaturलातूर