शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

वाघनाळवाडीत हरिनाम सप्ताहाच्या प्रसादात भगर खाल्ल्याने २०० जणांना विषबाधा

By हरी मोकाशे | Updated: March 8, 2024 13:37 IST

सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची आरोग्य यंत्रणेची माहिती

लातूर : जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील वाघनाळवाडी येथे भगरीतून २०० जणांना विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी रात्री १ वा. च्या सुमारास घडली. त्यातील दीडशे जणांवर गावातील मंदिरात तर उर्वरित ५० जणांवर वलांडी येथील आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले आहेत. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे यांनी सांगितले.

देवणी तालुक्यातील वाघनाळवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरु आहे. गुरूवारी एकादशी असल्याने सायंकाळी ५ वा.च्या सुमारास भगरीचा फराळ करण्यात आला. या भगरीतून काही जणांना रात्री १२ वा. नंतर अचानक मळमळ होऊन उलट्या होण्यास सुरुवात झाली. तसेच चक्कर येऊन अशक्तपणा जाणवू लागला. त्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य रवि चिलमिले यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील यांना दिली. त्यांनी तातडीने ही माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला दिली. त्यामुळे वलांडी येथील आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एस. काळे यांचे आरोग्य पथकाने वाघनाळवाडी येथे दाखल झाले.

आरोग्य पथक तात्काळ दाखल होऊन उपचार सुरु केले. ज्यांना अधिक त्रास होत आहे, अशांना तातडीने वलांडी येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. उर्वरित रुग्णांवर गावातील मंदिराच्या सभागृहात उपचार सुरू करण्यात आले. आरोग्य पथक तात्काळ दाखल झाले आणि उपचार सुरु केले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे. बरे झालेल्यांना सुटी देण्यात आली आहे. एकही रुग्ण गंभीर नाही, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे यांनी दिली.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाlaturलातूर