शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
4
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
5
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
6
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
7
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
8
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
9
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
10
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
11
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
12
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
13
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
14
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
15
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
16
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
17
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
18
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
20
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण

विद्यार्थ्यांना काय येते? अध्ययन संपादणूक सर्वेक्षणातून होणार उलगडा

By संदीप शिंदे | Updated: March 27, 2023 18:24 IST

दर पाच वर्षांनी शिक्षण विभागाकडून तिसरी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांचे अध्ययन संपादणूक सर्वेक्षण करण्यात येते.

लातूर : तिसरी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांचे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडून अध्ययन संपादणूक सर्वेक्षण करण्यात आले असून, ३७८ शाळांमधील ७ हजार ७६६ विद्यार्थी या सर्वेक्षणाला सामोरे गेले आहेत. उत्तरपत्रिका पुणे येथे जमा करण्यात आल्या असून, आता जिल्ह्याचा या सर्वेक्षणातून काय निकाल समोर येतो, याकडे शाळा आणि शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

दर पाच वर्षांनी शिक्षण विभागाकडून तिसरी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांचे अध्ययन संपादणूक सर्वेक्षण करण्यात येते. त्यानुसार १७ मार्च राेजी सर्वेक्षण घेण्याच्या सुचना होत्या. मात्र, शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्वेक्षण पुढे ढकलण्यात आले होते. २३ ते २४ मार्च दरम्यान जिल्ह्यात सर्वेक्षण घेण्यात आले असून, यामध्ये अहमदपूर तालुक्यातील ४०, औसा ४५, चाकूर ३३, देवणी १५, जळकोट १५, लातूर ९०, निलंगा ४४, रेणापूर २१, शिरुर अनंताळ १६ तर उदगीर तालुक्यातील ५९ शाळांतील विद्यार्थी सर्वेक्षणाला सामोरे गेले आहेत.

विद्यार्थ्यांना काय येते हे समजणार...या सर्वेक्षणामध्ये सकाळी सत्रात सर्वेक्षण करण्यात आले. यातून विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्तीमधील संपादणूक स्थिती जाणून घेण्यात आली. तसेच विद्यार्थीनिहाय गुण कुठेही प्रसिद्ध केले जाणार नाही. विद्यार्थ्यांना काय येते हे या सर्वेक्षणातून समोर येणार आहे. सोबतच सर्वेक्षण मराठी माध्यमासाठीच्या शाळांमध्ये घेण्यात आले. प्रथम भाषा मराठी व गणित या दोन विषयांमधील अध्ययन निष्पतीवर आधारित सर्वेक्षण होते.

आठवी वर्गाचे सर्वाधिक विद्यार्थी...अध्ययन संपादणूक सर्वेक्षणास जिल्ह्यातील ३७८ शाळांमधील ७ हजार ७६६ विद्यार्थी सामोरे गेले आहेत. यामध्ये तिसरीचे १ हजार ९८२, पाचवीचे २ हजार २८३ आणि आठवीच्या ३ हजार ५०१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. निवड झालेल्या शाळांमधील ३० विद्यार्थी या परीक्षेसाठी होते. दरम्यान, परीक्षेचे पेपर पुणे येथे जमा करण्यात आले आहेत. आता त्याची तपासणी होऊन सर्वेक्षणात जिल्ह्याची काय स्थिती आहे, हे समोर येणार आहे.

सर्वेक्षणास शाळा, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद...दर पाच वर्षांनी तिसरी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांचे अध्ययन संपादणूक सर्वेक्षण करण्यात येते. यावर्षीच्या सर्वेक्षणासाठी जिल्ह्यातील ३७८ शाळा निवडण्यात आल्या. यामध्ये ७ हजार ७६६ विद्यार्थी सर्वेक्षणास सामोरे गेले आहे. योग्य नियोजन आणि शाळा, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाल्याने सर्वेक्षण पुर्ण झाले आहे. लवकरच निकाल जाहीर होईल. डॉ. भागिरथी गिरी, प्राचार्य, डायट

टॅग्स :Educationशिक्षणlaturलातूर