शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
2
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
3
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
4
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
5
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
7
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
8
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
9
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
10
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
11
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
12
इवलुशा राखीतून जन्म घेतील वृक्षवेली, आमचे यंदा पर्यावरणाशी रक्षाबंधन! तुमच्या शाळेत?
13
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल
14
राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल; छावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी कारवाई
15
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
16
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
17
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
18
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
19
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
जडीबुटी विकणाऱ्या दोन साधूंना मुले चोरणारे समजून मारहाण; थोडक्यात टळली पालघर घटनेची पुनरावृत्ती

विद्यार्थ्यांना काय येते? अध्ययन संपादणूक सर्वेक्षणातून होणार उलगडा

By संदीप शिंदे | Updated: March 27, 2023 18:24 IST

दर पाच वर्षांनी शिक्षण विभागाकडून तिसरी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांचे अध्ययन संपादणूक सर्वेक्षण करण्यात येते.

लातूर : तिसरी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांचे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडून अध्ययन संपादणूक सर्वेक्षण करण्यात आले असून, ३७८ शाळांमधील ७ हजार ७६६ विद्यार्थी या सर्वेक्षणाला सामोरे गेले आहेत. उत्तरपत्रिका पुणे येथे जमा करण्यात आल्या असून, आता जिल्ह्याचा या सर्वेक्षणातून काय निकाल समोर येतो, याकडे शाळा आणि शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

दर पाच वर्षांनी शिक्षण विभागाकडून तिसरी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांचे अध्ययन संपादणूक सर्वेक्षण करण्यात येते. त्यानुसार १७ मार्च राेजी सर्वेक्षण घेण्याच्या सुचना होत्या. मात्र, शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्वेक्षण पुढे ढकलण्यात आले होते. २३ ते २४ मार्च दरम्यान जिल्ह्यात सर्वेक्षण घेण्यात आले असून, यामध्ये अहमदपूर तालुक्यातील ४०, औसा ४५, चाकूर ३३, देवणी १५, जळकोट १५, लातूर ९०, निलंगा ४४, रेणापूर २१, शिरुर अनंताळ १६ तर उदगीर तालुक्यातील ५९ शाळांतील विद्यार्थी सर्वेक्षणाला सामोरे गेले आहेत.

विद्यार्थ्यांना काय येते हे समजणार...या सर्वेक्षणामध्ये सकाळी सत्रात सर्वेक्षण करण्यात आले. यातून विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्तीमधील संपादणूक स्थिती जाणून घेण्यात आली. तसेच विद्यार्थीनिहाय गुण कुठेही प्रसिद्ध केले जाणार नाही. विद्यार्थ्यांना काय येते हे या सर्वेक्षणातून समोर येणार आहे. सोबतच सर्वेक्षण मराठी माध्यमासाठीच्या शाळांमध्ये घेण्यात आले. प्रथम भाषा मराठी व गणित या दोन विषयांमधील अध्ययन निष्पतीवर आधारित सर्वेक्षण होते.

आठवी वर्गाचे सर्वाधिक विद्यार्थी...अध्ययन संपादणूक सर्वेक्षणास जिल्ह्यातील ३७८ शाळांमधील ७ हजार ७६६ विद्यार्थी सामोरे गेले आहेत. यामध्ये तिसरीचे १ हजार ९८२, पाचवीचे २ हजार २८३ आणि आठवीच्या ३ हजार ५०१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. निवड झालेल्या शाळांमधील ३० विद्यार्थी या परीक्षेसाठी होते. दरम्यान, परीक्षेचे पेपर पुणे येथे जमा करण्यात आले आहेत. आता त्याची तपासणी होऊन सर्वेक्षणात जिल्ह्याची काय स्थिती आहे, हे समोर येणार आहे.

सर्वेक्षणास शाळा, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद...दर पाच वर्षांनी तिसरी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांचे अध्ययन संपादणूक सर्वेक्षण करण्यात येते. यावर्षीच्या सर्वेक्षणासाठी जिल्ह्यातील ३७८ शाळा निवडण्यात आल्या. यामध्ये ७ हजार ७६६ विद्यार्थी सर्वेक्षणास सामोरे गेले आहे. योग्य नियोजन आणि शाळा, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाल्याने सर्वेक्षण पुर्ण झाले आहे. लवकरच निकाल जाहीर होईल. डॉ. भागिरथी गिरी, प्राचार्य, डायट

टॅग्स :Educationशिक्षणlaturलातूर