शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

पीक विम्यासाठी शेतकरी संघटनेचा लातुरात मोर्चा

By संदीप शिंदे | Updated: December 26, 2022 16:42 IST

उसाला पहिली उचल ३ हजार रुपये प्रतिटन एकरकमी देण्याची मागणी

लातूर : जिल्ह्यात सोयाबीन प्रमुख पीक असून, खरिपात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे अंतिम पैसेवारीही ४६ पैसे आली असून, विमा कंपनी संरक्षित रक्कम देण्यास टाळाटाळ करीत असल्याने अनेक शेतकरी विम्यापासून वंचित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन पीक विम्यापोटी हेक्टरी ५४ हजार रुपयांची संरक्षित रक्कम द्यावी. यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 

गळीत हंगाम २०२२-२ साठी उसाला पहिली उचल प्रतिटन ३ हजार रुपये एकरकमी देण्यात यावी,सर्व साखर कारखान्यांचे वजन काटे ऑनलाइन करण्यात यावेत,२०२२ मधील अतिवृष्टीचे शासनाने जाहीर केल्याप्रमाणे हेक्टरी १३ हजार ६०० रुपयांप्रमाणे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ वर्ग करावे, सोयाबीनला ८ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळावा, जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर शासनामार्फत शेतकऱ्याच्या उसातील साखर उतारा तपासण्यासाठी यंत्रणा उभारावी, साखर आयुक्तांच्या आदेशानुसार साखर कारखान्यांच्या वजनकाटा तपासणी समितीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींचा समावेश करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलनात विधी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ॲड. विजयकुमार जाधव,धर्मराज पाटील, माणिक गायकवाड,उषाताई झिंगे,महारुद्र चौंडे,व्यंकट मुळके,काकासाहेब जाधव,बालाजी शिंदे,बबन चव्हाण, प्रकाश रोडगे,रामभाऊ नलावडे,दत्तू टिपे,अशोक दहीफळे, गोविंद बस्तापुरे आदींसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

प्रोत्साहन अनुदानाची तिसरी यादी जाहीर करा...नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येत आहे. आतापर्यंत दोन याद्या जाहीर झाल्या असून,तिसरी यादी तात्काळ जाहीर करून लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान तातडीने वर्ग करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

 

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी