शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पीक विम्यासाठी शेतकरी संघटनेचा लातुरात मोर्चा

By संदीप शिंदे | Updated: December 26, 2022 16:42 IST

उसाला पहिली उचल ३ हजार रुपये प्रतिटन एकरकमी देण्याची मागणी

लातूर : जिल्ह्यात सोयाबीन प्रमुख पीक असून, खरिपात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे अंतिम पैसेवारीही ४६ पैसे आली असून, विमा कंपनी संरक्षित रक्कम देण्यास टाळाटाळ करीत असल्याने अनेक शेतकरी विम्यापासून वंचित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन पीक विम्यापोटी हेक्टरी ५४ हजार रुपयांची संरक्षित रक्कम द्यावी. यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 

गळीत हंगाम २०२२-२ साठी उसाला पहिली उचल प्रतिटन ३ हजार रुपये एकरकमी देण्यात यावी,सर्व साखर कारखान्यांचे वजन काटे ऑनलाइन करण्यात यावेत,२०२२ मधील अतिवृष्टीचे शासनाने जाहीर केल्याप्रमाणे हेक्टरी १३ हजार ६०० रुपयांप्रमाणे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ वर्ग करावे, सोयाबीनला ८ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळावा, जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर शासनामार्फत शेतकऱ्याच्या उसातील साखर उतारा तपासण्यासाठी यंत्रणा उभारावी, साखर आयुक्तांच्या आदेशानुसार साखर कारखान्यांच्या वजनकाटा तपासणी समितीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींचा समावेश करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलनात विधी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ॲड. विजयकुमार जाधव,धर्मराज पाटील, माणिक गायकवाड,उषाताई झिंगे,महारुद्र चौंडे,व्यंकट मुळके,काकासाहेब जाधव,बालाजी शिंदे,बबन चव्हाण, प्रकाश रोडगे,रामभाऊ नलावडे,दत्तू टिपे,अशोक दहीफळे, गोविंद बस्तापुरे आदींसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

प्रोत्साहन अनुदानाची तिसरी यादी जाहीर करा...नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येत आहे. आतापर्यंत दोन याद्या जाहीर झाल्या असून,तिसरी यादी तात्काळ जाहीर करून लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान तातडीने वर्ग करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

 

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी