शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

HSC Result: लातूर विभागात यंदाही मुलांपेक्षा मुलीच सरस; मंडळाचा निकाल ९०.३७ टक्के

By संदीप शिंदे | Updated: May 25, 2023 15:47 IST

लातूर विभागातून ४८ हजार ८३३ मुले, तर ३९ हजार २१८ मुली परीक्षेला सामोरे गेल्या होत्या.

लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला असून, लातूर विभागीय मंडळाचा ९०.३७ टक्के निकाल लागला आहे. यंदाही मुलांपेक्षा मुलीच निकालात सरस ठरल्या असून, मुलींचा ९४.१६, तर मुलांचा ८७.३२ टक्के निकाल लागला आहे.

लातूर विभागीय मंडळांतर्गत उस्मानाबाद, नांदेड आणि लातूर या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो. त्यानुसार बारावी परीक्षेसाठी नांदेड जिल्ह्यातून ३८ हजार २७६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यातील ३३ हजार ९०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, जिल्ह्याचा ८८.५६ टक्के निकाल लागला आहे, तर लातूर जिल्ह्यातील ३४ हजार १४५ विद्यार्थ्यांपैकी ३१ हजार ६४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ९२.६६ टक्के निकाल लागला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातून १५ हजार ६३० पैकी १४ हजार २९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, जिल्ह्याचा ८९.७५ टक्के निकाल लागला आहे. लातूर विभागातून ४८ हजार ८३३ मुले, तर ३९ हजार २१८ मुली परीक्षेला सामोरे गेल्या होत्या. ४२ हजार ६४१ मुले, तर ३६ हजार ९३१ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

विज्ञान शाखेचा ९६.४२ टक्के निकाल...लातूर विभागातून विज्ञान शाखेच्या ४४ हजार २३९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील ४२ हजार ६५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, शाखेचा निकाल ९६.४२ टक्के लागला आहे. कला शाखेतून ३१०२१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील २५ हजार ४१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेचा ८१.९१ टक्के निकाल आहे. वाणिज्य शाखेतून ९०३४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील ८२४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, वाणिज्यचा ९१.२४ टक्के निकाल लागला आहे, तर व्यवसाय अभ्यासक्रमामध्ये ३५८५ पैकी ३१०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ८६.६३ टक्के निकाल लागला आहे.

विभागात लातूर जिल्हा सरस...लातूर विभागीय मंडळाचा मागील वर्षी बारावी परीक्षेचा ९५.२५ टक्के निकाल लागला होता. यंदा मात्र ५ टक्क्यांची घट आहे. यावर्षी मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८७.३२ टक्के, तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.१६ टक्के आहे. विभागात लातूर जिल्हा अव्वल असून, द्वितीय उस्मानाबाद, तर तृतीय स्थानावर नांदेड जिल्हा आहे.

टॅग्स :examपरीक्षाlaturलातूरEducationशिक्षण