शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

लातूर जिल्ह्यात उन्हामुळे विहिरींनी गाठला तळ; साडेतीनशे गावांना घशाला काेरड!

By हरी मोकाशे | Updated: April 15, 2024 18:39 IST

पाणीटंचाई वाढली : जिल्ह्यात ४७६ अधिग्रहणाचे प्रस्ताव

लातूर : चार दिवसांपासून वातावरणात बदल होऊन सतत अवकाळी पाऊस होत आहे. त्यामुळे उन्हाचा पारा उतरला असला तरी पाणीटंचाईचे चटके वाढतच आहेत. सध्या जिल्ह्यातील ३४९ गावांच्या घशाला काेरड पडली आहे. ती कमी करण्यासाठी अधिग्रहणाचे ४७६ प्रस्ताव दाखल झाले आहेत. टंचाईच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर मंजुरी देण्यात येत आहे. मात्र, त्यासाठी काही कालावधी लागत आहे. तोपर्यंत होरपळ सहन करावी लागत आहे.

गत पावसाळ्यात कमी पर्जन्यमान झाल्याने जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये अपेक्षित जलसाठा झाला नाही. परिणामी, भूजल पातळी खालावली आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने तापमानाचा पारा ४० अं. से. पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. तसेच बाष्पीभवनाचा वेगही वाढला आहे. वाढत्या उन्हामुळे जलस्त्रोत काेरडे पडू लागले आहेत तर विहिरींनी तळ गाठला आहे. कुपनलिकाही उचक्या देऊ लागल्या आहेत. परिणामी, पाणीटंचाईची तीव्रता वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील २९८ गावे आणि ५१ वाड्यांवर पाण्याची समस्या जाणवू लागली आहे.

निलंगा तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाई...तालुका - टंचाईग्रस्त गावेलातूर - ३८औसा - ४६निलंगा - ८६रेणापूर - ३४अहमदपूर - ८२चाकूर - २४शिरुर अनं. - ०७उदगीर - २०देवणी - ०१जळकोट - ११

अधिग्रहणाच्या पाण्यावर १६७ गावे...

जिल्ह्यातील २९८ गावे आणि ५१ वाड्यांना पाणीटंचाई जाणवत असून अधिग्रहणाचे ४७६ प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील २० गावांचे ४२ प्रस्ताव प्रत्यक्ष पाहणीनंतर वगळण्यात आले आहेत. उर्वरितपैकी २४९ गावांचे ३१२ प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी १३७ गावे आणि ३० वाड्यांचे अशा एकूण १६७ गावांचे १८३ प्रस्ताव मंजूर करण्यात येऊन तिथे अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे.

शिरुर अनंतपाळात एकही अधिग्रहण नाही...जिल्ह्यातील शिरुर अनंतपाळ तालुक्यातील ७ गावांना पाणीटंचाई जाणवत असल्याने तेथून १२ प्रस्ताव दाखल झाले आहेत. मात्र, अद्याप एकही प्रस्ताव मंजूर करण्यात आला नाही. त्यामुळे केवळ शिरुर अनंतपाळ तालुक्यात अधिग्रहण करण्यात आले नाही. सर्वाधिक अधिग्रहणे अहमदपूर तालुक्यात सुरु असून ४८ अशी संख्या आहे.

२४ गावांची टँकरची मागणी...जिल्ह्यातील २४ गावांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी करीत प्रस्ताव दाखल केला आहे. त्यात २१ गावे आणि तीन वाड्यांचा समावेश आहे. प्रत्यक्ष पाहणीनंतर ३ गावांचे प्रस्ताव वगळण्यात आले आहेत. सध्या ८ गावांना ८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे.त्यात लामजना, खरोसा, मोगरगा, टाका, तांबरवाडी/ राजेवाडी, कार्ला, टेंभूर्णी या गावांचा समावेश आहे. आणखीन एक टँकर मंजूर आहे. परंतु, अद्यापही पाणीपुरवठा सुरु नसल्याचे जिल्हा परिषदेतून सांगण्यात आले.

टॅग्स :laturलातूरWaterपाणी