शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यात उन्हामुळे विहिरींनी गाठला तळ; साडेतीनशे गावांना घशाला काेरड!

By हरी मोकाशे | Updated: April 15, 2024 18:39 IST

पाणीटंचाई वाढली : जिल्ह्यात ४७६ अधिग्रहणाचे प्रस्ताव

लातूर : चार दिवसांपासून वातावरणात बदल होऊन सतत अवकाळी पाऊस होत आहे. त्यामुळे उन्हाचा पारा उतरला असला तरी पाणीटंचाईचे चटके वाढतच आहेत. सध्या जिल्ह्यातील ३४९ गावांच्या घशाला काेरड पडली आहे. ती कमी करण्यासाठी अधिग्रहणाचे ४७६ प्रस्ताव दाखल झाले आहेत. टंचाईच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर मंजुरी देण्यात येत आहे. मात्र, त्यासाठी काही कालावधी लागत आहे. तोपर्यंत होरपळ सहन करावी लागत आहे.

गत पावसाळ्यात कमी पर्जन्यमान झाल्याने जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये अपेक्षित जलसाठा झाला नाही. परिणामी, भूजल पातळी खालावली आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने तापमानाचा पारा ४० अं. से. पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. तसेच बाष्पीभवनाचा वेगही वाढला आहे. वाढत्या उन्हामुळे जलस्त्रोत काेरडे पडू लागले आहेत तर विहिरींनी तळ गाठला आहे. कुपनलिकाही उचक्या देऊ लागल्या आहेत. परिणामी, पाणीटंचाईची तीव्रता वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील २९८ गावे आणि ५१ वाड्यांवर पाण्याची समस्या जाणवू लागली आहे.

निलंगा तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाई...तालुका - टंचाईग्रस्त गावेलातूर - ३८औसा - ४६निलंगा - ८६रेणापूर - ३४अहमदपूर - ८२चाकूर - २४शिरुर अनं. - ०७उदगीर - २०देवणी - ०१जळकोट - ११

अधिग्रहणाच्या पाण्यावर १६७ गावे...

जिल्ह्यातील २९८ गावे आणि ५१ वाड्यांना पाणीटंचाई जाणवत असून अधिग्रहणाचे ४७६ प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील २० गावांचे ४२ प्रस्ताव प्रत्यक्ष पाहणीनंतर वगळण्यात आले आहेत. उर्वरितपैकी २४९ गावांचे ३१२ प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी १३७ गावे आणि ३० वाड्यांचे अशा एकूण १६७ गावांचे १८३ प्रस्ताव मंजूर करण्यात येऊन तिथे अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे.

शिरुर अनंतपाळात एकही अधिग्रहण नाही...जिल्ह्यातील शिरुर अनंतपाळ तालुक्यातील ७ गावांना पाणीटंचाई जाणवत असल्याने तेथून १२ प्रस्ताव दाखल झाले आहेत. मात्र, अद्याप एकही प्रस्ताव मंजूर करण्यात आला नाही. त्यामुळे केवळ शिरुर अनंतपाळ तालुक्यात अधिग्रहण करण्यात आले नाही. सर्वाधिक अधिग्रहणे अहमदपूर तालुक्यात सुरु असून ४८ अशी संख्या आहे.

२४ गावांची टँकरची मागणी...जिल्ह्यातील २४ गावांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी करीत प्रस्ताव दाखल केला आहे. त्यात २१ गावे आणि तीन वाड्यांचा समावेश आहे. प्रत्यक्ष पाहणीनंतर ३ गावांचे प्रस्ताव वगळण्यात आले आहेत. सध्या ८ गावांना ८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे.त्यात लामजना, खरोसा, मोगरगा, टाका, तांबरवाडी/ राजेवाडी, कार्ला, टेंभूर्णी या गावांचा समावेश आहे. आणखीन एक टँकर मंजूर आहे. परंतु, अद्यापही पाणीपुरवठा सुरु नसल्याचे जिल्हा परिषदेतून सांगण्यात आले.

टॅग्स :laturलातूरWaterपाणी