शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

लातूर जिल्ह्यात उन्हामुळे विहिरींनी गाठला तळ; साडेतीनशे गावांना घशाला काेरड!

By हरी मोकाशे | Updated: April 15, 2024 18:39 IST

पाणीटंचाई वाढली : जिल्ह्यात ४७६ अधिग्रहणाचे प्रस्ताव

लातूर : चार दिवसांपासून वातावरणात बदल होऊन सतत अवकाळी पाऊस होत आहे. त्यामुळे उन्हाचा पारा उतरला असला तरी पाणीटंचाईचे चटके वाढतच आहेत. सध्या जिल्ह्यातील ३४९ गावांच्या घशाला काेरड पडली आहे. ती कमी करण्यासाठी अधिग्रहणाचे ४७६ प्रस्ताव दाखल झाले आहेत. टंचाईच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर मंजुरी देण्यात येत आहे. मात्र, त्यासाठी काही कालावधी लागत आहे. तोपर्यंत होरपळ सहन करावी लागत आहे.

गत पावसाळ्यात कमी पर्जन्यमान झाल्याने जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये अपेक्षित जलसाठा झाला नाही. परिणामी, भूजल पातळी खालावली आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने तापमानाचा पारा ४० अं. से. पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. तसेच बाष्पीभवनाचा वेगही वाढला आहे. वाढत्या उन्हामुळे जलस्त्रोत काेरडे पडू लागले आहेत तर विहिरींनी तळ गाठला आहे. कुपनलिकाही उचक्या देऊ लागल्या आहेत. परिणामी, पाणीटंचाईची तीव्रता वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील २९८ गावे आणि ५१ वाड्यांवर पाण्याची समस्या जाणवू लागली आहे.

निलंगा तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाई...तालुका - टंचाईग्रस्त गावेलातूर - ३८औसा - ४६निलंगा - ८६रेणापूर - ३४अहमदपूर - ८२चाकूर - २४शिरुर अनं. - ०७उदगीर - २०देवणी - ०१जळकोट - ११

अधिग्रहणाच्या पाण्यावर १६७ गावे...

जिल्ह्यातील २९८ गावे आणि ५१ वाड्यांना पाणीटंचाई जाणवत असून अधिग्रहणाचे ४७६ प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील २० गावांचे ४२ प्रस्ताव प्रत्यक्ष पाहणीनंतर वगळण्यात आले आहेत. उर्वरितपैकी २४९ गावांचे ३१२ प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी १३७ गावे आणि ३० वाड्यांचे अशा एकूण १६७ गावांचे १८३ प्रस्ताव मंजूर करण्यात येऊन तिथे अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे.

शिरुर अनंतपाळात एकही अधिग्रहण नाही...जिल्ह्यातील शिरुर अनंतपाळ तालुक्यातील ७ गावांना पाणीटंचाई जाणवत असल्याने तेथून १२ प्रस्ताव दाखल झाले आहेत. मात्र, अद्याप एकही प्रस्ताव मंजूर करण्यात आला नाही. त्यामुळे केवळ शिरुर अनंतपाळ तालुक्यात अधिग्रहण करण्यात आले नाही. सर्वाधिक अधिग्रहणे अहमदपूर तालुक्यात सुरु असून ४८ अशी संख्या आहे.

२४ गावांची टँकरची मागणी...जिल्ह्यातील २४ गावांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी करीत प्रस्ताव दाखल केला आहे. त्यात २१ गावे आणि तीन वाड्यांचा समावेश आहे. प्रत्यक्ष पाहणीनंतर ३ गावांचे प्रस्ताव वगळण्यात आले आहेत. सध्या ८ गावांना ८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे.त्यात लामजना, खरोसा, मोगरगा, टाका, तांबरवाडी/ राजेवाडी, कार्ला, टेंभूर्णी या गावांचा समावेश आहे. आणखीन एक टँकर मंजूर आहे. परंतु, अद्यापही पाणीपुरवठा सुरु नसल्याचे जिल्हा परिषदेतून सांगण्यात आले.

टॅग्स :laturलातूरWaterपाणी