शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

लातूर जिल्ह्यात वर्षभरात ११३९ क्षयरुग्ण झाले ठणठणीत

By संदीप शिंदे | Updated: March 16, 2023 17:04 IST

टीबीमुक्त भारत करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहे.

लातूर : प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात मागील वर्षभरात १ हजार १३९ क्षयरुग्ण उपचाराने ठणठणीत झाले आहेत. सध्या १८७१ रुग्णांवर उपचार सुरु असून, जानेवारी ते १५ मार्च २०२३ या कालवधीत ४७५ नव्या क्षयरुग्णांची भर पडली आहे. आरोग्य विभागाच्या वतीने २१ मार्चपर्यंत क्षयरुग्ण शोध मोहीम राबविली जात असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. शिवाजी फुलारी यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.

टीबीमुक्त भारत करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहे. त्याअंतर्गत क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येत आहे. रुग्णांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी निक्षय पोषण आहार योजनेतंर्गत प्रतिमाह ५०० रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. दरम्यान, याचा लाभ जिल्ह्यातील १८७१ क्षयरुग्णांना होत आहे. ८ मार्चपासून सक्रीय क्षयरुग्ण शोधमोहीम राबविली जात असून, २१ मार्चपर्यंत ही मोहीम सुरु राहणार आहे. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., सीईओ अभिवन गोयल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल.एस. देशमुख, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे यांच्या मार्गदर्शनाखाली टीबीमुक्त भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केली जात असल्याचेही डॉ. शिवाजी फुलारी यांनी सांगितले. पत्रपरिषदेस वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षवर्धन राऊत, डॉद्य संजय तेलंग आदींची उपस्थिती होती.

आहार किटसाठी पुढाकार घ्यावा...जिल्ह्यात क्षयरोग निदानाचे ३४ केंद्र असून, एक्सरे सेंटरची संख्या १४ आहे. सध्या ७५ निक्षय मित्रांच्या माध्यमातून २०० क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वितरण करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्वच क्षयरुग्णांना पोषण आहार किट देता यावी, यासाठी दानशुर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

तालुकानिहाय असे आहेत रुग्ण...दोन आठवड्यांपेक्षा अधिक खोकला, ताप असणे, वजनात घट, थुंकीवाटे रक्त पडणे, मानेवर गाठ येणे आदी लक्षणे क्षयरोगाची ओळखली जातात. शासकीय रुग्णालयांतून मोफत तपासणी व औषधोपचार आहेत. जिल्ह्यात १८७१ रुग्ण उपचार घेत असून, यामध्ये अहमदपूर ८६, औसा ११५, चाकूर ५०, देवणी ५४, जळकोट ५३, लातूर ग्रामीण ११९, लातूर शहर ८७३, निलंगा १३१, रेणापूर ४५, शिरुर अनंतपाळ ३४ तर उदगीर तालुक्यात ३११ रुग्ण आहेत.

टॅग्स :laturलातूरHealthआरोग्य