शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
भयंकर! पंजाबमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; ५ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
दे दणादण! IRS अधिकारी आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; ऑफिसमध्ये तुफान राडा
4
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
5
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
6
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
7
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
8
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
9
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
10
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
11
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
12
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
13
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
14
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
15
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
16
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
17
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
18
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
19
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश

भर उन्हाळ्यात अहमदपुरात २५ दिवसाआड अशुद्ध पाणीपुरवठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:24 IST

अहमदपूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या लिंबोटी प्रकल्पात मुबलक जलसाठा असूनही पालिकेच्या नियोजनाअभावी नळाला २५ ते ३० दिवसाआड पाणी येत ...

अहमदपूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या लिंबोटी प्रकल्पात मुबलक जलसाठा असूनही पालिकेच्या नियोजनाअभावी नळाला २५ ते ३० दिवसाआड पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईस सामाेरे जावे लागत आहे. होणारा पाणीपुरवठा हा अशुद्ध नसल्याने रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.

अहमदपूर पालिकेच्या वतीने शहरास जलशुद्धिकरण केंद्रातून पाणीपुरवठा होतो. जवळपास २० वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्चून हे जलशुद्धिकरण केंद्र उभारण्यात आले. परंतु, त्याची देखभाल घेतली जात नसल्याचे दिसत आहे. सध्या शहरातील नळास २५ ते ३० दिवसांतून एकदा पाणी येत आहे. त्यातही शुद्ध पाणीपुरवठा होत नाही. जलशुद्धिकरण केंद्रातून ढोर गल्ली, खाटीक गल्ली, महादेव गल्ली, मारवाडी गल्ली, बागवान गल्ली, पंचशील नगर, हमणे गल्ली, दर्गापुरा, गढी गल्ली, पाटील गल्ली, देशमुख वाडा, फुलेनगर, लाईन गल्ली, बँक कॉलनी, नागोबा नगर, सत्तार कॉलनी, गायकवाड कॉलनी, साईनगर, श्रीनगर व परिसरास पाणीपुरवठा होतो. या केंद्राच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत आहे.

तसेच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या फिल्टरमध्ये २५ दिवसांपासून कोलोरिफाय बंद असल्यामुळे अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. त्यावरच शहरवासीयांना तहान भागवावी लागत आहे. परिणामी, विविध आजारांची भीती व्यक्त होत आहे.

टँकर येताच पाण्यासाठी झुंबड...

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन केेले आहे. परंतु, येथे पाणीटंचाईमुळे नागरिकांना भर उन्हात वणवण भटकंती करावी लागत आहे. पालिकेचे टँकर येताच पाणी भरण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड होत आहे. त्यामुळे फिजिकल डिस्टन्स राखला जात नाही. याकडे पालिकेने लक्ष देऊन उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

२० लाख लिटरच्या जलकुंभाचे काम अर्धवट...

शहरातील ईदगाह रोडवरील २० लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभाचे काम अर्धवट राहिले आहे. या जलकुंभाला नवीन जलवाहिनीची जोडणी न झाल्यामुळे शहरातील निम्म्या नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. या जलकुंभाला नवीन जलवाहिनी जोडण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

महिन्यापूर्वी पॅनल बाेर्ड जळाले...

शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी लिंबोटीहून १९ किमीपर्यंत नवीन जलवाहिनी टाकण्यात आली आहे. १३ किमीच्या जलवाहिनीच्या टेस्टिंगचे काम झाले आहे. ही जलवाहिनी काही ठिकाणी लिकेज आहे. तेथील पॅनल बोर्ड एक महिन्यापासून जळालेले असून, अद्यापही बसविण्यात आले नाही. त्यामुळे ३०० एचपीची एकच मोटार चालू आहे. पॅनल बोर्ड दुरुस्त झाल्यावर ३०० एचपीची दुसरी मोटार सुरू होईल. ज्या ठिकाणी जलवाहिनीला गळती आहे, ती तत्काळ दुरुस्त करून घेणे गरजेचे असल्याचे नगरसेवक अभय मिरकले म्हणाले.

जुन्या जलवाहिनीमुळे समस्या...

लिंबोटी धरणाहून नवीन जलवाहिनीचे काम चालू झाल्यामुळे जुनी जलवाहिनी बंद होती. पुन्हा जुनीच जलवाहिनी सुरू केल्यामुळे जुन्या जलवाहिनीतील पाणी कोलोरीफुलोक्युलेटरमध्ये एकत्र झाले. परिणामी, एका जलकुंभात पाणी सोडण्यात आले होते. ते पाणी तत्काळ बंद करण्यात आले. शहराला शुद्ध पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे, असे पालिकेचे पाणीपुरवठा अभियंता गणेश पुरी यांनी सांगितले.