शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
3
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
5
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
6
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
7
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
8
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
9
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
10
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
11
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
12
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
13
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
14
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
15
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार
16
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
17
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
18
जन्मभर विसरणार नाही असा धडा भारतास शिकवू; सिंधू जल करार स्थगितीमुळे पाकच्या धमक्या वाढल्या
19
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
20
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा

भर उन्हाळ्यात अहमदपुरात २५ दिवसाआड अशुद्ध पाणीपुरवठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:24 IST

अहमदपूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या लिंबोटी प्रकल्पात मुबलक जलसाठा असूनही पालिकेच्या नियोजनाअभावी नळाला २५ ते ३० दिवसाआड पाणी येत ...

अहमदपूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या लिंबोटी प्रकल्पात मुबलक जलसाठा असूनही पालिकेच्या नियोजनाअभावी नळाला २५ ते ३० दिवसाआड पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईस सामाेरे जावे लागत आहे. होणारा पाणीपुरवठा हा अशुद्ध नसल्याने रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.

अहमदपूर पालिकेच्या वतीने शहरास जलशुद्धिकरण केंद्रातून पाणीपुरवठा होतो. जवळपास २० वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्चून हे जलशुद्धिकरण केंद्र उभारण्यात आले. परंतु, त्याची देखभाल घेतली जात नसल्याचे दिसत आहे. सध्या शहरातील नळास २५ ते ३० दिवसांतून एकदा पाणी येत आहे. त्यातही शुद्ध पाणीपुरवठा होत नाही. जलशुद्धिकरण केंद्रातून ढोर गल्ली, खाटीक गल्ली, महादेव गल्ली, मारवाडी गल्ली, बागवान गल्ली, पंचशील नगर, हमणे गल्ली, दर्गापुरा, गढी गल्ली, पाटील गल्ली, देशमुख वाडा, फुलेनगर, लाईन गल्ली, बँक कॉलनी, नागोबा नगर, सत्तार कॉलनी, गायकवाड कॉलनी, साईनगर, श्रीनगर व परिसरास पाणीपुरवठा होतो. या केंद्राच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत आहे.

तसेच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या फिल्टरमध्ये २५ दिवसांपासून कोलोरिफाय बंद असल्यामुळे अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. त्यावरच शहरवासीयांना तहान भागवावी लागत आहे. परिणामी, विविध आजारांची भीती व्यक्त होत आहे.

टँकर येताच पाण्यासाठी झुंबड...

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन केेले आहे. परंतु, येथे पाणीटंचाईमुळे नागरिकांना भर उन्हात वणवण भटकंती करावी लागत आहे. पालिकेचे टँकर येताच पाणी भरण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड होत आहे. त्यामुळे फिजिकल डिस्टन्स राखला जात नाही. याकडे पालिकेने लक्ष देऊन उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

२० लाख लिटरच्या जलकुंभाचे काम अर्धवट...

शहरातील ईदगाह रोडवरील २० लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभाचे काम अर्धवट राहिले आहे. या जलकुंभाला नवीन जलवाहिनीची जोडणी न झाल्यामुळे शहरातील निम्म्या नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. या जलकुंभाला नवीन जलवाहिनी जोडण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

महिन्यापूर्वी पॅनल बाेर्ड जळाले...

शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी लिंबोटीहून १९ किमीपर्यंत नवीन जलवाहिनी टाकण्यात आली आहे. १३ किमीच्या जलवाहिनीच्या टेस्टिंगचे काम झाले आहे. ही जलवाहिनी काही ठिकाणी लिकेज आहे. तेथील पॅनल बोर्ड एक महिन्यापासून जळालेले असून, अद्यापही बसविण्यात आले नाही. त्यामुळे ३०० एचपीची एकच मोटार चालू आहे. पॅनल बोर्ड दुरुस्त झाल्यावर ३०० एचपीची दुसरी मोटार सुरू होईल. ज्या ठिकाणी जलवाहिनीला गळती आहे, ती तत्काळ दुरुस्त करून घेणे गरजेचे असल्याचे नगरसेवक अभय मिरकले म्हणाले.

जुन्या जलवाहिनीमुळे समस्या...

लिंबोटी धरणाहून नवीन जलवाहिनीचे काम चालू झाल्यामुळे जुनी जलवाहिनी बंद होती. पुन्हा जुनीच जलवाहिनी सुरू केल्यामुळे जुन्या जलवाहिनीतील पाणी कोलोरीफुलोक्युलेटरमध्ये एकत्र झाले. परिणामी, एका जलकुंभात पाणी सोडण्यात आले होते. ते पाणी तत्काळ बंद करण्यात आले. शहराला शुद्ध पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे, असे पालिकेचे पाणीपुरवठा अभियंता गणेश पुरी यांनी सांगितले.