शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
2
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
3
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
4
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
5
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
6
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
7
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
8
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
9
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
10
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
11
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
12
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
13
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
14
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
15
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
16
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
17
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
18
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
19
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
20
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

अवैध शस्त्र बाळगणे महागात; लातुरात २३ जणांविराेधात गुन्हे

By राजकुमार जोंधळे | Updated: November 1, 2024 20:19 IST

६६८ जणांनी जमा केले पाेलिस ठाण्यात शस्त्र...

लातूर : अवैध शस्त्र बाळगणाऱ्या २३ जणांविराेधात लातूर जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांत गुन्हे दाखल केले आहेत. विधानसभा निवडणूक आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर एकूण ८९७ पैकी ६६८ जणांनी पाेलिस ठाण्यात शस्त्रे जमा केली आहेत.

निवडणूक आचारसंहिता जाहीर हाेताच परवानाधारक शस्त्र (पिस्टल, रायफल, बंदूक) जमा करून घेण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सर्व पोलिस ठाण्यांना दिले होते. दरम्यान, अग्निशस्त्रे जमा करण्याचे आदेश देताच लातूर जिल्ह्यातील ८९७ पैकी ६६८ जणांनी आपल्याकडील शस्त्रे पोलिस ठाण्यात जमा केली आहेत. शिल्लक शस्त्रे जमा करण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. जमा करण्यात येणारी अग्निशस्त्रे आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर परत देण्यात येणार आहेत. मोठे व्यावसायिक, उद्याेजक, राजकारणी, त्याचबराेबर विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी यांच्याकडून स्वरक्षणासाठी शस्त्रपरवाना काढला जातो. हा शस्त्रपरवाना जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या वतीने दिला जाताे. गृहविभागाच्या परवानगीने ही शस्त्रे दिली जातात.

लातूर जिल्ह्यात ८९७ जणांकडे शस्त्र परवाना...

लातूर जिल्ह्यातील एकूण ८९७ जणांनी शस्त्र परवाने घेतले आहेत. विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू आहे. निवडणूक काळात वादविवाद, वैमनस्य उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांच्या संयुक्त समितीच्या वतीने पिस्तूल, रायफल आणि इतर अग्निशस्त्रे जमा करून घेण्याचे निर्देश सर्व ठाणेदारांना दिले आहेत.

तर सुरक्षारक्षकांना वापरता येईल शस्त्र...

बँक व वित्तीय संस्थांत कार्यरत सुरक्षारक्षकांची अग्निशस्त्रे जमा करण्यात येणार नाहीत. आजपर्यंत ८९७ पैकी ६६८ जणांनी संबंधित ठाण्यात शस्त्रे जमा करण्यात आली आहेत. उर्वरित शस्त्रे येत्या दोन दिवसांमध्ये जमा करण्यात येणार आहेत. निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शस्त्रे जमा करण्यात येत आहेत. याबाबत पोलिस अधीक्षक सोमय मुंडे हे दरराेज आढावा घेत आहेत.

तलवार, गावठी कट्टे वापरणाऱ्यांना दणका...

लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत विनापरवाना गावठी कट्टे, धारदार तलवार, खंजीर, कत्ती, चाकू बाळगणाऱ्या एकूण २३ जणांविराेधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांना पाेलिसांनी चांगलाच हिसका दाखवत अद्दल घडविली आहे. सध्या पाेलिसांकडून विशेष मोहीम राबवून अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविराेधात कारवाई केली जात आहे.