शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
3
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
4
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
5
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
6
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
7
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
8
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
9
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
10
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
12
कार्तिक आर्यनसोबत हेमांगी कवी शेअर करणार स्क्रीन; 'चंदू चॅम्पियन'मध्ये साकारतेय महत्त्वाची भूमिका
13
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
14
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
15
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
16
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
17
खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार, तटरक्षक दलाच्या शाैर्याचे सर्वत्र काैतुक
18
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?
19
विदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा धंदा जोरात, परराष्ट्र मंत्रालयाकडून सावधगिरीचा इशारा
20
आता औषधे संशयाच्या भोवऱ्यात; दर्जाबाबत शंका आल्याने भारतीय कंपन्यांची उत्पादने परत पाठविली

'पाणी देणार असाल तर मागे उभे राहतो, अन्यथा बाजूला सारण्याची धमक'

By आशपाक पठाण | Published: September 26, 2023 11:58 PM

जलसाक्षरता रॅलीचा समारोप : माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर

लातूर : लातूरच्या पाण्यासाठी सर्वपक्षीय आमदारांनी राजकारण बाजूला सारून एकत्रित यावे. पाण्यासाठी आपण एकत्र लढलो तर पाणी येईल. यात राजकारण करायचे नाही. जर तुम्ही पाणी देणार असाल तर मागे उभे राहतो, अन्यथा बाजूला करण्याची धमक आपल्यात आहे, असा इशारा विरोधकांना देत माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, जोपर्यंत लातूरला पाणी आणणार नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही.

लातूर शहरातील हनुमान चौकात जलसाक्षरता रॅलीचा समारोप मंगळवारी रात्री ९. ३० वाजता झाला. यावेळी शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख ॲड. बळवंत जाधव, औशाचे माजी नगराध्यक्ष अफसर शेख, जि.प.चे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे,  भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख, शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, ॲड. शैलेश गोजमगुंडे, अरविंद पाटील निलंगेकर, प्रा. प्रेरणा होनराव, किरण उटगे, अजित पाटील कव्हेकर, ॲड. गणेश गोमचाळे यांची उपस्थिती होती. 

यावेळी माजी मंत्री आ. निलंगेकर म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी विकासासाठी राजकारण न करता एकत्र येतात. त्यामुळे तिथे विकास आहे. पाणी प्रश्नावर मराठवाड्यातील सर्वपक्षीय आमदारांनी एकत्र येण्याची गरज आहे. समुद्रात वाहून जाणारे पाणी आम्ही मराठवाड्याला देतो, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. हे गोदावरी खोऱ्यात येणार आहे. त्यामुळे आपल्याला स्वतंत्र योजना आणायला हवी.

एम्स, आयआयटीसाठी जन आंदोलन करणार..लातूर ही गुणवत्तेची खाण आहे. मेडिकल, इंजिनिअरिंगला सर्वाधिक मुले आपलीच लागतात. याठिकाणी केंद्रीय विद्यापीठासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवाय, एम्स, आयआयटीसारख्या संस्था आणण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जन आंदोलन उभे करू. आपल्याकडे पाण्याची टंचाई कायम राहिली तर व्यापाऱ्यांचेे स्थलांतर होईल. आपण सर्वजण मतभेद विसरून एकत्र जाऊ, लातूरच्या पाण्यासाठी जे जे करावे लागेल ते करू. जोपर्यंत हक्काचे पाणी येणार नाही तोपर्यंत थकायचे नाही, असे माजी मंत्री आ. संभाजी पाटील म्हणाले.

नतद्रष्ट अधिकाऱ्यांनी शेरा मारला...लातूरच्या पाणी योजनेसाठी प्रस्ताव दिला होता. मात्र, काही नतद्रष्ट अधिकाऱ्यांनी ही पाणी योजना खर्चिक आहे, असा शेरा मारला; पण पाणी हा नफा, तोट्याचा विषय नाही हे मी देवेंद्रभाऊंना सांगितले. तेव्हा ते म्हणाले किती जरी पैसे लागले तरी लातूरला पाणी आणण्याची जबाबदारी माझी आहे. आता पाण्यासाठी जनरेटा वाढला पाहिजे. जनरेटा वाढला की सरकार इथे येईल. जोपर्यंत पाणी येणार नाही तोपर्यंत आम्ही कुणाच्या पाठीशी राहणार नाही, अशी भूमिका जनतेने घ्यायला हवी, असे निलंगेकर म्हणाले.

पाण्यासाठी टोकाची भूमिका घ्यावी लागेल...

मांजरा, तेरणा व तावरजा प्रकल्पात पाणी आले की, आपल्या घरात पाणी येईल. पाण्यासासाठी टोकाची भूमिका घ्यावी लागेल. मागच्या काळात मराठवाड्याच्या नेतृत्वाला पश्चिम महाराष्ट्रासमोर झुकावे लागले. त्यामुळे पाणी आले नाही. मी निवेदन देत बसणार नाही. शास्त्रशुद्ध पद्धतीने सांगणार आहे. यासाठी देवेंद्रजी तयार आहेत, अजितदादांना पटविण्याची जबाबदारी अफसर शेख तुम्ही घ्यावी, असे आ. निलंगेकर यांनी सांगितले.

टॅग्स :sambhaji nilangekarसंभाजी निलंगेकर