शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
6
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
7
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
8
Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
9
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
10
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
11
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
12
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
13
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
14
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
15
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
16
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
17
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
18
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
19
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
20
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार

'पाणी देणार असाल तर मागे उभे राहतो, अन्यथा बाजूला सारण्याची धमक'

By आशपाक पठाण | Updated: September 26, 2023 23:58 IST

जलसाक्षरता रॅलीचा समारोप : माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर

लातूर : लातूरच्या पाण्यासाठी सर्वपक्षीय आमदारांनी राजकारण बाजूला सारून एकत्रित यावे. पाण्यासाठी आपण एकत्र लढलो तर पाणी येईल. यात राजकारण करायचे नाही. जर तुम्ही पाणी देणार असाल तर मागे उभे राहतो, अन्यथा बाजूला करण्याची धमक आपल्यात आहे, असा इशारा विरोधकांना देत माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, जोपर्यंत लातूरला पाणी आणणार नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही.

लातूर शहरातील हनुमान चौकात जलसाक्षरता रॅलीचा समारोप मंगळवारी रात्री ९. ३० वाजता झाला. यावेळी शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख ॲड. बळवंत जाधव, औशाचे माजी नगराध्यक्ष अफसर शेख, जि.प.चे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे,  भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख, शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, ॲड. शैलेश गोजमगुंडे, अरविंद पाटील निलंगेकर, प्रा. प्रेरणा होनराव, किरण उटगे, अजित पाटील कव्हेकर, ॲड. गणेश गोमचाळे यांची उपस्थिती होती. 

यावेळी माजी मंत्री आ. निलंगेकर म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी विकासासाठी राजकारण न करता एकत्र येतात. त्यामुळे तिथे विकास आहे. पाणी प्रश्नावर मराठवाड्यातील सर्वपक्षीय आमदारांनी एकत्र येण्याची गरज आहे. समुद्रात वाहून जाणारे पाणी आम्ही मराठवाड्याला देतो, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. हे गोदावरी खोऱ्यात येणार आहे. त्यामुळे आपल्याला स्वतंत्र योजना आणायला हवी.

एम्स, आयआयटीसाठी जन आंदोलन करणार..लातूर ही गुणवत्तेची खाण आहे. मेडिकल, इंजिनिअरिंगला सर्वाधिक मुले आपलीच लागतात. याठिकाणी केंद्रीय विद्यापीठासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवाय, एम्स, आयआयटीसारख्या संस्था आणण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जन आंदोलन उभे करू. आपल्याकडे पाण्याची टंचाई कायम राहिली तर व्यापाऱ्यांचेे स्थलांतर होईल. आपण सर्वजण मतभेद विसरून एकत्र जाऊ, लातूरच्या पाण्यासाठी जे जे करावे लागेल ते करू. जोपर्यंत हक्काचे पाणी येणार नाही तोपर्यंत थकायचे नाही, असे माजी मंत्री आ. संभाजी पाटील म्हणाले.

नतद्रष्ट अधिकाऱ्यांनी शेरा मारला...लातूरच्या पाणी योजनेसाठी प्रस्ताव दिला होता. मात्र, काही नतद्रष्ट अधिकाऱ्यांनी ही पाणी योजना खर्चिक आहे, असा शेरा मारला; पण पाणी हा नफा, तोट्याचा विषय नाही हे मी देवेंद्रभाऊंना सांगितले. तेव्हा ते म्हणाले किती जरी पैसे लागले तरी लातूरला पाणी आणण्याची जबाबदारी माझी आहे. आता पाण्यासाठी जनरेटा वाढला पाहिजे. जनरेटा वाढला की सरकार इथे येईल. जोपर्यंत पाणी येणार नाही तोपर्यंत आम्ही कुणाच्या पाठीशी राहणार नाही, अशी भूमिका जनतेने घ्यायला हवी, असे निलंगेकर म्हणाले.

पाण्यासाठी टोकाची भूमिका घ्यावी लागेल...

मांजरा, तेरणा व तावरजा प्रकल्पात पाणी आले की, आपल्या घरात पाणी येईल. पाण्यासासाठी टोकाची भूमिका घ्यावी लागेल. मागच्या काळात मराठवाड्याच्या नेतृत्वाला पश्चिम महाराष्ट्रासमोर झुकावे लागले. त्यामुळे पाणी आले नाही. मी निवेदन देत बसणार नाही. शास्त्रशुद्ध पद्धतीने सांगणार आहे. यासाठी देवेंद्रजी तयार आहेत, अजितदादांना पटविण्याची जबाबदारी अफसर शेख तुम्ही घ्यावी, असे आ. निलंगेकर यांनी सांगितले.

टॅग्स :sambhaji nilangekarसंभाजी निलंगेकर