शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे बोगीचा कारखाना मी आणला; टिकोजीरावांनी भूमिपूजन केले, सरकारला घरचा अहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 06:03 IST

महाराष्ट्रातील पहिला रेल्वे बोगी निर्मितीचा कारखाना आणण्यासाठी महाराष्ट्राचा उद्योगमंत्री म्हणून मी प्रयत्न केले. या कारखान्यात स्थानिक तरुणांना प्राधान्य देण्यासाठी भरती परीक्षा लातुरात झाली पाहिजे

लातूर : महाराष्ट्रातील पहिला रेल्वे बोगी निर्मितीचा कारखाना आणण्यासाठी महाराष्ट्राचा उद्योगमंत्री म्हणून मी प्रयत्न केले. या कारखान्यात स्थानिक तरुणांना प्राधान्य देण्यासाठी भरती परीक्षा लातुरात झाली पाहिजे, ही अटही आपण टाकली, मात्र ऐनवेळी श्रेय लाटणाऱ्या टिकोजीरावांनी भूमिपूजन उरकले, अशी खरमरीत टीका करीत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी सरकारला घरचा अहेर दिला.मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांचा थेट नामोल्लेख टाळून उद्योगमंत्र्यांनी भूमिपूजन करणाºयांना टिकोजीराव म्हणत मित्र पक्ष भाजपवर परखड टीका केली. लातूर जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते म्हणाले, बोगी निर्मितीचा कारखाना लातूरला व्हावा. तो परराज्यात जाऊ नये, यासाठी आपण त्यावेळी बोललो नाही. तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनीच मंत्रिपद सोडण्यापूर्वी महाराष्ट्रात होत असलेल्या लातूरच्या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली होती. उद्योग विभागाच्या अधीन असलेली जागा आपण तत्पर उपलब्ध करून दिली. तसेच शिवसेनेच्या भूमिकेमुळेच स्थानिकांना या प्रकल्पात रोजगार मिळेल. कोणी काहीही सांगत असले तरी भरती प्रक्रिया रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्राच्या उद्योग विभागाच्या माध्यमातून होईल, असेही देसाई म्हणाले.यावेळी खा. चंद्रकांत खैरे म्हणाले, महाराष्ट्रात १५५ पेक्षा अधिक जागा मिळवून भगवा फडकावयाचा आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी शेवटच्या माणसांपर्यंत जावे. शेतकºयांच्या कर्जासाठी जे अधिकारी सहकार्य करणार नाहीत, त्यांना शिवसेना स्टाईलने सरळ वठणीवर आणा, असेही ते म्हणाले.१५ लाख कसले; १५ चिंचोकेही नाही..!प्रत्येक वर्षी दोन कोटी लोकांना रोजगाराचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात गेल्या चार वर्षांत एका अहवालानुसार २६ लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. शेतमालाला दीडपट हमीभाव देऊ म्हणाले. तिथे आज कवडीमोल भाव मिळत आहे. भाजप नेत्यांना सत्ता म्हणजे जादूची कांडी वाटली आणि ते आश्वासन देत सुटले. खात्यावर १५ लाख टाकायला निघाले होते, आता १५ चिंचोकेही नाहीत. - सुभाष देसाई, उद्योगमंत्री

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाई