शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

रेल्वे बोगीचा कारखाना मी आणला; टिकोजीरावांनी भूमिपूजन केले, सरकारला घरचा अहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 06:03 IST

महाराष्ट्रातील पहिला रेल्वे बोगी निर्मितीचा कारखाना आणण्यासाठी महाराष्ट्राचा उद्योगमंत्री म्हणून मी प्रयत्न केले. या कारखान्यात स्थानिक तरुणांना प्राधान्य देण्यासाठी भरती परीक्षा लातुरात झाली पाहिजे

लातूर : महाराष्ट्रातील पहिला रेल्वे बोगी निर्मितीचा कारखाना आणण्यासाठी महाराष्ट्राचा उद्योगमंत्री म्हणून मी प्रयत्न केले. या कारखान्यात स्थानिक तरुणांना प्राधान्य देण्यासाठी भरती परीक्षा लातुरात झाली पाहिजे, ही अटही आपण टाकली, मात्र ऐनवेळी श्रेय लाटणाऱ्या टिकोजीरावांनी भूमिपूजन उरकले, अशी खरमरीत टीका करीत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी सरकारला घरचा अहेर दिला.मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांचा थेट नामोल्लेख टाळून उद्योगमंत्र्यांनी भूमिपूजन करणाºयांना टिकोजीराव म्हणत मित्र पक्ष भाजपवर परखड टीका केली. लातूर जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते म्हणाले, बोगी निर्मितीचा कारखाना लातूरला व्हावा. तो परराज्यात जाऊ नये, यासाठी आपण त्यावेळी बोललो नाही. तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनीच मंत्रिपद सोडण्यापूर्वी महाराष्ट्रात होत असलेल्या लातूरच्या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली होती. उद्योग विभागाच्या अधीन असलेली जागा आपण तत्पर उपलब्ध करून दिली. तसेच शिवसेनेच्या भूमिकेमुळेच स्थानिकांना या प्रकल्पात रोजगार मिळेल. कोणी काहीही सांगत असले तरी भरती प्रक्रिया रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्राच्या उद्योग विभागाच्या माध्यमातून होईल, असेही देसाई म्हणाले.यावेळी खा. चंद्रकांत खैरे म्हणाले, महाराष्ट्रात १५५ पेक्षा अधिक जागा मिळवून भगवा फडकावयाचा आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी शेवटच्या माणसांपर्यंत जावे. शेतकºयांच्या कर्जासाठी जे अधिकारी सहकार्य करणार नाहीत, त्यांना शिवसेना स्टाईलने सरळ वठणीवर आणा, असेही ते म्हणाले.१५ लाख कसले; १५ चिंचोकेही नाही..!प्रत्येक वर्षी दोन कोटी लोकांना रोजगाराचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात गेल्या चार वर्षांत एका अहवालानुसार २६ लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. शेतमालाला दीडपट हमीभाव देऊ म्हणाले. तिथे आज कवडीमोल भाव मिळत आहे. भाजप नेत्यांना सत्ता म्हणजे जादूची कांडी वाटली आणि ते आश्वासन देत सुटले. खात्यावर १५ लाख टाकायला निघाले होते, आता १५ चिंचोकेही नाहीत. - सुभाष देसाई, उद्योगमंत्री

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाई