शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

मालमत्ता कर धारकांकडे दीडशे कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2016 00:40 IST

लातूर लातूर मनपाच्या हद्दीत ७० हजारांहून अधिक मालमत्ताधारक आणि दीड हजारांहून अधिक भाडेकरू आहेत.

हणमंत गायकवाड लातूरलातूर मनपाच्या हद्दीत ७० हजारांहून अधिक मालमत्ताधारक आणि दीड हजारांहून अधिक भाडेकरू आहेत. मात्र त्यांच्याकडे वर्षानुवर्षांची थकबाकी असून, वसुलीबाबत मनपाचे तीळमात्र नियोजन नाही. नोव्हेंबरअखेर शासनाकडून मिळणारे सहाय्य अनुदान बंद होणार असतानाही स्वउत्पन्न उभे करण्यास मनपा बेफिकीर आहे. मालमत्ता कराचे दीडशे कोटी आणि गाळेधारकांकडे दीडशे कोटी रुपयांचे भाडे थकित आहे. त्याची वसुलीही ४ ते ५ टक्क्यांच्या पुढे नाही.लातूरबरोबर परभणी आणि चंद्रपूर येथे नगरपालिकेचे रुपांतर महानगरपालिकेत करण्यात आले. परभणी महानगरपालिकेने सानुग्रह अनुदान बंद होणार असल्याने गाळेधारकांसाठी ३५ टक्के भाडेवाढ केली आहे. तर त्याच्या वसुलीसाठी नोटिसा पाठवून जप्तीच्या कारवाईचे नियोजन केले आहे. लातूर मनपा मात्र सानुग्रह अनुदान बंद होत असताना स्वउत्पन्नासाठी काहीच नियोजन केलेले नाही. प्राधिकृत अधिकारी असताना विपीन शर्मा यांनी गाळेधारक व मालमत्ता करात १०० टक्के वाढ केली होती. प्रशासकीय ठराव घेऊन त्यांनी वसुलीला प्रारंभ केला होता. मात्र सार्वत्रिक निवडणुकीनंतर मनपात लोकनियुक्त प्रशासन सुरू झाल्यानंतर विपीन शर्मा यांचा ठराव रद्द करून भाडेवाढ रद्द करण्यात आली. पण त्यावेळी सानुग्रह अनुदान होते, आता अनुदान बंद होत आहे. त्यामुळे आकृती बंधानुसार असलेल्या साडेबाराशे कर्मचाऱ्यांचे वेतन कसे करावे, असा प्रश्न निर्माण होणार आहे. महानगरपालिका प्रशासनाकडून वसुली ठप्प आहे. मनपाच्या मालकीच्या गाळ्यांची भाडेवसुलीही ठप्प आहे. दोन्ही मिळून साडेतीनशे कोटींच्या आसपास वसुली थकित आहे. या थकबाकीदारांना कधी नोटीस पाठविली गेली नाही की, वसुलीबाबत प्रशासनाचा व्यक्ती तिथे गेला नाही. सरकारी अनुदानावरच सध्या तरी मनपाचा कारभार सुरू आहे. नोव्हेंबर अखेर अनुदान बंद झाल्यानंतर कारभार कसा चालणार, असा प्रश्न काही नगरसेवकांना पडला आहे.