शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
2
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
3
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
4
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
5
Stock Market Today: शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर शेअर बाजार सुस्साट.., बाजारमूल्य १० लाख कोटी रुपयांहून अधिक वाढलं
6
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
7
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
8
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
9
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
10
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
11
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
12
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
13
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
14
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
15
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
16
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
17
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
18
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
19
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
20
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा

हेल्मेटमुळे वाचले असते २३२ जणांचे प्राण; लातूरमध्ये आठ महिन्यांत ५३९ अपघात

By आशपाक पठाण | Updated: October 7, 2023 18:59 IST

दुचाकीचेच सर्वाधिक ७० टक्के अपघात. वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

लातूर : दुचाकीवर हेल्मेट वापरणे मोटार वाहन कायद्यानुसार बंधनकारक असले तरी आपल्याकडे याकडे कोणी लक्षच देत नाही. परिणामी, अपघातात सर्वाधिक मृत्यू होण्याचे प्रमाण दुचाकी अपघाताचेच असल्याचे समोर आले आहे. मागील आठ महिन्यांत जिल्ह्यात ५३९ अपघात झाले आहेत. त्यात ७० टक्के अपघात दुचाकीचे असून, यात घटनेत दुचाकीवरील २३२ जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यांच्याकडे हेल्मेट असते तर जीव वाचला असता, असे समोर आले आहे.

वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शाळा, कॉलेजला जाण्यासाठी अनेक पालक अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी देत आहेत. ही मुले अनेकदा चढाओढ करून वेगमर्यादेचे उल्लंघन तर करतातच शिवाय, हेल्मेट किंवा इतर वाहतूक नियमांचे पालनही करीत नाहीत. त्यामुळे दुचाकी घसरून पडले तरी डोक्याला गंभीर मार लागून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. लातूर जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत झालेल्या एकूण अपघातात सर्वाधिक जवळपास ३०९ अपघात हे दुचाकीचे झाले आहेत. यात २३२ जणांना जीव गमवावा लागला आहे. हेल्मेट वापराकडे केलेले दुर्लक्ष अनेकांच्या अंगलट आले आहे.

रस्ता ओलांडताना होतात अपघात...राष्ट्रीय महामार्ग, शहरातील मुख्य मार्गावरील डिव्हायडरमधून वळण घेताना दुचाकी अपघाताच्या घटना वाढत आहेत. लातूर एमआयडीसी, उदगीर, औसा, किल्लारी, रेणापूर या भागात दुचाकीचे अपघात जास्त आहेत. वाहनांची वर्दळ अधिक असतानाही नियमांकडे होत असलेले दुर्लक्ष जिवावर बेतत असल्याचे समोर आले आहे.

अल्पवयीन मुलांना वाहन, पालकांना ३ लाख २० हजार दंड...अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये अल्पवयीन मुलांचे प्रमाण जास्त आढळून आल्याने महिनाभरापूर्वी परिवहन विभागाकडून शाळा, कॉलेजमध्ये कारवाई मोहीम राबविण्यात आली. त्यात दुचाकीवरील अल्पवयीन ३२ मुले पकडण्यात आली. त्यांना आरटीओ कार्यालयात आणून पालकांनाही सूचना करण्यात आल्या. त्यांच्याकडून प्रत्येकी १० हजारांप्रमाणे ३ लाख २० हजार दंड वसूल करण्यात आला. तरीही पालक अल्पवयीन मुलांच्या हाती वाहने देतात, आपल्या मुलांचा जीव आपण धोक्यात घालत आहोत, हे समजायला हवे.

मार्गदर्शन शिबिरातून नुसतीच चर्चा...दरवर्षी अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडून रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गत वाहतूक नियमांचे प्रबोधन केले जाते. लातूर, उदगीर व अहमदपूर शहरातील प्रमुख शाळा, महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांसह हेल्मेट, सीटबेल्टचा वापर यावर मार्गदर्शन केले जाते. शिक्षक, पालक, विद्यार्थी तात्पुरते भावनिक होतात, पुन्हा नियमांकडे दुर्लक्ष करीत रस्त्यावर फिरतात.

अपघात रोखण्यासाठी अशी घ्या काळजी...अपघात रोखण्यासाठी प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन करायला पाहिजे. दुचाकीवर हेल्मेट, कारमध्ये सीटबेल्टचा वापर, वेगमर्यादाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी. मद्य प्राशन करून वाहन चालवू नये. पालकांनी अल्पवयीन मुलांच्या हाती कोणतेही वाहन देऊ नये. मुलांपेक्षा पालकांनी अधिक जागरूकता बाळगल्यास अपघात कमी होतील, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये सांगितले.

हेल्मेट नसेल तर १ हजारांचा दंड...दुचाकीवर हेल्मेटचा वापर वाढावा म्हणून खरेदी, नोंदणीच्या वेळी हेल्मेटची सक्ती करण्यात आली. अनेक जण नवीन हेल्मेट घेतात, पण बाहेर पडले की ते आणत नाहीत. हेल्मेट आपल्या सुरक्षेसाठी आहे. विनाहेल्मेट प्रवास करीत असताना आढळल्यास १ हजार रुपये दंडाची तरतूद आहे. 

टॅग्स :Accidentअपघात