शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
3
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
4
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
5
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
6
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
7
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
8
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
9
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
10
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
11
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
12
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
13
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
14
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
15
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
16
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
17
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
18
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
19
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
20
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी

हेल्मेटमुळे वाचले असते २३२ जणांचे प्राण; लातूरमध्ये आठ महिन्यांत ५३९ अपघात

By आशपाक पठाण | Updated: October 7, 2023 18:59 IST

दुचाकीचेच सर्वाधिक ७० टक्के अपघात. वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

लातूर : दुचाकीवर हेल्मेट वापरणे मोटार वाहन कायद्यानुसार बंधनकारक असले तरी आपल्याकडे याकडे कोणी लक्षच देत नाही. परिणामी, अपघातात सर्वाधिक मृत्यू होण्याचे प्रमाण दुचाकी अपघाताचेच असल्याचे समोर आले आहे. मागील आठ महिन्यांत जिल्ह्यात ५३९ अपघात झाले आहेत. त्यात ७० टक्के अपघात दुचाकीचे असून, यात घटनेत दुचाकीवरील २३२ जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यांच्याकडे हेल्मेट असते तर जीव वाचला असता, असे समोर आले आहे.

वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शाळा, कॉलेजला जाण्यासाठी अनेक पालक अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी देत आहेत. ही मुले अनेकदा चढाओढ करून वेगमर्यादेचे उल्लंघन तर करतातच शिवाय, हेल्मेट किंवा इतर वाहतूक नियमांचे पालनही करीत नाहीत. त्यामुळे दुचाकी घसरून पडले तरी डोक्याला गंभीर मार लागून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. लातूर जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत झालेल्या एकूण अपघातात सर्वाधिक जवळपास ३०९ अपघात हे दुचाकीचे झाले आहेत. यात २३२ जणांना जीव गमवावा लागला आहे. हेल्मेट वापराकडे केलेले दुर्लक्ष अनेकांच्या अंगलट आले आहे.

रस्ता ओलांडताना होतात अपघात...राष्ट्रीय महामार्ग, शहरातील मुख्य मार्गावरील डिव्हायडरमधून वळण घेताना दुचाकी अपघाताच्या घटना वाढत आहेत. लातूर एमआयडीसी, उदगीर, औसा, किल्लारी, रेणापूर या भागात दुचाकीचे अपघात जास्त आहेत. वाहनांची वर्दळ अधिक असतानाही नियमांकडे होत असलेले दुर्लक्ष जिवावर बेतत असल्याचे समोर आले आहे.

अल्पवयीन मुलांना वाहन, पालकांना ३ लाख २० हजार दंड...अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये अल्पवयीन मुलांचे प्रमाण जास्त आढळून आल्याने महिनाभरापूर्वी परिवहन विभागाकडून शाळा, कॉलेजमध्ये कारवाई मोहीम राबविण्यात आली. त्यात दुचाकीवरील अल्पवयीन ३२ मुले पकडण्यात आली. त्यांना आरटीओ कार्यालयात आणून पालकांनाही सूचना करण्यात आल्या. त्यांच्याकडून प्रत्येकी १० हजारांप्रमाणे ३ लाख २० हजार दंड वसूल करण्यात आला. तरीही पालक अल्पवयीन मुलांच्या हाती वाहने देतात, आपल्या मुलांचा जीव आपण धोक्यात घालत आहोत, हे समजायला हवे.

मार्गदर्शन शिबिरातून नुसतीच चर्चा...दरवर्षी अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडून रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गत वाहतूक नियमांचे प्रबोधन केले जाते. लातूर, उदगीर व अहमदपूर शहरातील प्रमुख शाळा, महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांसह हेल्मेट, सीटबेल्टचा वापर यावर मार्गदर्शन केले जाते. शिक्षक, पालक, विद्यार्थी तात्पुरते भावनिक होतात, पुन्हा नियमांकडे दुर्लक्ष करीत रस्त्यावर फिरतात.

अपघात रोखण्यासाठी अशी घ्या काळजी...अपघात रोखण्यासाठी प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन करायला पाहिजे. दुचाकीवर हेल्मेट, कारमध्ये सीटबेल्टचा वापर, वेगमर्यादाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी. मद्य प्राशन करून वाहन चालवू नये. पालकांनी अल्पवयीन मुलांच्या हाती कोणतेही वाहन देऊ नये. मुलांपेक्षा पालकांनी अधिक जागरूकता बाळगल्यास अपघात कमी होतील, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये सांगितले.

हेल्मेट नसेल तर १ हजारांचा दंड...दुचाकीवर हेल्मेटचा वापर वाढावा म्हणून खरेदी, नोंदणीच्या वेळी हेल्मेटची सक्ती करण्यात आली. अनेक जण नवीन हेल्मेट घेतात, पण बाहेर पडले की ते आणत नाहीत. हेल्मेट आपल्या सुरक्षेसाठी आहे. विनाहेल्मेट प्रवास करीत असताना आढळल्यास १ हजार रुपये दंडाची तरतूद आहे. 

टॅग्स :Accidentअपघात