शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

जळकोट परिसरात जोरदार अवकाळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:20 IST

वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे शहरातील अनेकांचे पत्रे उडून गेले आहेत. विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाल्याने उन्हामुळे उकाडा होता. आता ...

वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे शहरातील अनेकांचे पत्रे उडून गेले आहेत. विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाल्याने उन्हामुळे उकाडा होता. आता थंड झाला आहे. लोकांनी आता चांगला श्वास घेतला आहे.

दुपारी पावणेतीनच्या दरम्यान आकाशात मोठमोठे ढग आले. विजेचा कडकडाट सुरू झाला. जळकोट शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसामध्ये मोठ्या प्रमाणात वादळी वारे होते. विजेचा कडकडाट होता. जळकोट, हळदवाढवणा, पाटोदा बुद्रुक, कुणकी, कोळनुर, जाम दापका, राजा हिपरगा याठिकाणी मोठा पाऊस मेघगर्जनेसह पडला. शेतकरी आपल्या शेती मशागतीचे काम करण्यासाठी जात आहेत. शुक्रवारी पावसामुळे कामात व्यत्यय आला असून दुपारनंतर शेतकरी आपल्या गुरांसह घरी गेले. गेल्या अनेक दिवसांपासून जळकोट शहरात पाइपलाइन फुटल्याने व दुरुस्तीचे काम सुरू असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. अनेकांनी पत्र्यांवरील पाणी जमा केले असून टंचाईत त्यांना दिलासा मिळाला आहे.

झाडे उन्मळली, वीज पडल्याने बैलाचा मृत्यू...

अतनूर- पाटोदा खुर्दसह अनेक भागांत वादळाने झाडे आडवी पडली आहेत. तर, अनेक घरांसह भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. अतनूर येथील कोंडिबा जाधव यांच्या एका बैलाचा वीज पडून मृत्यू झाल्याने जवळपास ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस व वादळी वारा यामुळे आंब्याच्या बागेचे मोठे नुकसान झाले असून पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी बागायतदार व शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे. दरम्यान, बालाजी केंद्रे, सुरज गीते म्हणाले, प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून शेतक-यांना मदत द्यावी.