शहरं
Join us  
Trending Stories
1
“माझा हक्क आहे, पण विरोधी पक्षनेता असूनही संसेदत बोलू दिले जात नाही”; राहुल गांधींचा आरोप
2
चीनने ब्रह्मपुत्रा नदीवर सर्वात मोठे धरण बांधण्यास सुरुवात केली; भारताने आधीच घेतला आक्षेप
3
Nashik: 'आई, तुला त्रास द्यायचा नाही, तू...'; पोलीस महिलेच्या लेकीने आयुष्य संपवलं, सुसाईड नोटमध्ये काय?
4
भज्जीनं मारलेली ती 'थप्पड' श्रीसंतच्या लेकीच्या मनाला लागलीये! फिरकीपटूनं शेअर केली त्यामागची स्टोरी
5
झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार
6
'ट्रम्प यांनी २४ वेळा...', ऑपरेशन सिंदूरबाबत खरगेंच्या विधानावर जेपी नड्डा संतापले, म्हणाले...
7
Astro Tips: चमचाभर तीळ, मोहरीच्या तेलाचा दिवा, मंगळवारी पिंपळाच्या पारावर ठेवायला हवा; कारण...
8
Ganeshotsav 2025 Train: गुडन्यूज! पश्चिम रेल्वे कोकणसाठी चालवणार 'या' विशेष गाड्या, तिकीट बुकिंग कधीपासून?
9
अजित पवार 'अ‍ॅक्शन मोड'वर! छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण यांना राजीनामा देण्याचे आदेश
10
"मी २५ वर्षं आमदार, १० वर्ष लोकसभेचा खासदार...!"; छावाचे कार्यकर्ते आले, पत्ते टाकले, नंतर काय घडलं? तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
11
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
12
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
13
Shravan Special Recipe: श्रावणात नैवेद्याच्या ताटाची लज्जत वाढवेल 'हा' कोबीचा चटका; कमी साहित्यात चविष्ट रेसेपी 
14
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
15
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
16
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
17
घरात वीज, शौचालय नाही, दिव्याच्या प्रकाशात अभ्यास...; भारताच्या लेकीचं जपानमध्ये कौतुक
18
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
19
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
20
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला

भारनियमनामुळे पिकांना बसतोय फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:32 IST

नागरसोगा : शेती पंपांसाठी महावितरणच्या वतीने भारनियमन करण्यात येत आहे. परिणामी, विहिरीत पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नसल्याने ...

नागरसोगा : शेती पंपांसाठी महावितरणच्या वतीने भारनियमन करण्यात येत आहे. परिणामी, विहिरीत पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नसल्याने ही पिके वाळत आहेत. २४ तासांपैकी केवळ ८ तासच वीजपुरवठा होत असून तोही रात्रीच्यावेळी असल्याने शेतक-यांना कसरत करावी लागत आहे.

यंदाच्या खरीप हंगामात अति पाऊस झाल्याने नगदी पीक असलेल्या सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हतबल झाले. मुसळधार पावसामुळे यंदा या भागातील पाणी पातळीत वाढ झाली असून विहिरी, तलाव तुडूंब भरले आहेत. त्यामुळे या भागात रबीचा पेरा वाढला आहे. सध्या शेतात खरीपातील तुरीचे पीक आहे. विहिरीत पाणी असतानाही शेतक-यांना शेतीला पाणी देणे कठीण झाले आहे.

महावितरणच्या वतीने दर महिन्यास भारनियमनाचे वेळापत्रक जाहीर केले जाते. त्यात दिवसा कमी व रात्री जास्त दाबाने वीज कृषीपंपाना मिळते. वेळापत्रक व विजेचा प्रवाह हा कागदोपत्रीच ठरत आहे. ग्रामीण भागात कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्यामुळे सातत्याने कृषीपंप बंद पडत आहेत. तसेच कृषी पंप जळण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे काही शेतक-यांनी अलिखित नियम केला असून एका बाजूचे शेतकरी एका दिवशी तर दुस-या बाजूचे शेतकरी दुस-या दिवशी वीजपंप सुरु करतात. त्यामुळे एकदिवसाआडा पिकांना पाणी द्यावे लागत आहे. परिणामी, पिके सुकत आहेत. येथील एक डीपी जळून महिना उलटला. मात्र, त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे विहिरीत पाणी असतानाही शेतक-यांना पिकांना पाणी देता येत नाही.

शेतक-यांचा जीव धोक्यात...

भारनियमनाचे वेळापत्रक वारंवार बदलत असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी कसरत करावी लागत आहे. रात्रीच्यावेळी पिकांना पाणी देण्यासाठी दोघांना शेतात जावे लागत आहे. दरम्यान, अंधारामुळे या परिसरातील दोन शेतक-यांना सर्पदंश झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

शेतकरीच टाकतात फ्यूज...

महावितरणकडून पहिल्या आठवड्यात दुपारी ४.५ ते रात्री १२.५, दुस-या आठवड्यात रात्री १२.५ ते सकाळी ८.५, तिस-या आठवड्यात सकाळी ८.५ ते सायंकाळी ४.५ या वेळापत्रकानुसार शेती पंपांना वीजपुरवठा करण्यात येतो. दरम्यान, फ्यूज गेला अथवा वीजपुरवठा खंडित झाल्यास ती कामे शेतक-यांनाच करावी लागत आहेत.