शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

भारनियमनामुळे पिकांना बसतोय फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:32 IST

नागरसोगा : शेती पंपांसाठी महावितरणच्या वतीने भारनियमन करण्यात येत आहे. परिणामी, विहिरीत पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नसल्याने ...

नागरसोगा : शेती पंपांसाठी महावितरणच्या वतीने भारनियमन करण्यात येत आहे. परिणामी, विहिरीत पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नसल्याने ही पिके वाळत आहेत. २४ तासांपैकी केवळ ८ तासच वीजपुरवठा होत असून तोही रात्रीच्यावेळी असल्याने शेतक-यांना कसरत करावी लागत आहे.

यंदाच्या खरीप हंगामात अति पाऊस झाल्याने नगदी पीक असलेल्या सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हतबल झाले. मुसळधार पावसामुळे यंदा या भागातील पाणी पातळीत वाढ झाली असून विहिरी, तलाव तुडूंब भरले आहेत. त्यामुळे या भागात रबीचा पेरा वाढला आहे. सध्या शेतात खरीपातील तुरीचे पीक आहे. विहिरीत पाणी असतानाही शेतक-यांना शेतीला पाणी देणे कठीण झाले आहे.

महावितरणच्या वतीने दर महिन्यास भारनियमनाचे वेळापत्रक जाहीर केले जाते. त्यात दिवसा कमी व रात्री जास्त दाबाने वीज कृषीपंपाना मिळते. वेळापत्रक व विजेचा प्रवाह हा कागदोपत्रीच ठरत आहे. ग्रामीण भागात कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्यामुळे सातत्याने कृषीपंप बंद पडत आहेत. तसेच कृषी पंप जळण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे काही शेतक-यांनी अलिखित नियम केला असून एका बाजूचे शेतकरी एका दिवशी तर दुस-या बाजूचे शेतकरी दुस-या दिवशी वीजपंप सुरु करतात. त्यामुळे एकदिवसाआडा पिकांना पाणी द्यावे लागत आहे. परिणामी, पिके सुकत आहेत. येथील एक डीपी जळून महिना उलटला. मात्र, त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे विहिरीत पाणी असतानाही शेतक-यांना पिकांना पाणी देता येत नाही.

शेतक-यांचा जीव धोक्यात...

भारनियमनाचे वेळापत्रक वारंवार बदलत असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी कसरत करावी लागत आहे. रात्रीच्यावेळी पिकांना पाणी देण्यासाठी दोघांना शेतात जावे लागत आहे. दरम्यान, अंधारामुळे या परिसरातील दोन शेतक-यांना सर्पदंश झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

शेतकरीच टाकतात फ्यूज...

महावितरणकडून पहिल्या आठवड्यात दुपारी ४.५ ते रात्री १२.५, दुस-या आठवड्यात रात्री १२.५ ते सकाळी ८.५, तिस-या आठवड्यात सकाळी ८.५ ते सायंकाळी ४.५ या वेळापत्रकानुसार शेती पंपांना वीजपुरवठा करण्यात येतो. दरम्यान, फ्यूज गेला अथवा वीजपुरवठा खंडित झाल्यास ती कामे शेतक-यांनाच करावी लागत आहेत.