शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

माजी सरपंचाने पाणीपुरवठा तोडला; हरवाडी ग्रामस्थांना अंघोळीलाही पाणी मिळेना!

By हरी मोकाशे | Updated: January 16, 2023 16:22 IST

गावचा पाणीपुरवठा गेल्या १० दिवसांपासून बंद आहे.

लातूर : रेणापूर तालुक्यातील हरवाडीतील माजी सरपंचाने गावचा पाणीपुरवठा बंद केल्याने अंघोळीसाठीही पाणी मिळेनासे झाले आहे. गावास पाणीपुरवठा सुरु करण्यात यावा, या मागणीसाठी विद्यमान उपसरपंचासह नागरिकांनी जिल्हा परिषदेसमोर सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे.

हरवाडी हे तीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी याेजना राबविण्यात आली आहे. त्यामुळे सुरळीत पाणीपुरवठा होत होता. दरम्यान, माजी सरपंचाने संपूर्ण गावचा पाणीपुरवठा बंद केला आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना घागरभर पाण्यासाठीही भटकंती करावी लागत आहे. यासंदर्भात चार दिवसांपूर्वी प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

गावचा पाणीपुरवठा गेल्या १० दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही समस्या सोडवावी, या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर सोमवारपासून नागरिकांनी बेमुदत उपोषण सुरु केले आहे. या आंदोलनात उपसरपंच चंद्रकांत माने, ग्रामपंचायत सदस्य किरण इंगळे, नितीन माने, कल्याण हरवाडीकर, ग्यानदेव कातपुरे, अच्युत माने, बंकट कातपुरे, अशोक गंगथडे, हरिश्चंद्र इंगळे, निखित ताडके, सिध्देश्वर ढोरमारे आदी सहभागी झाले आहेत. 

टॅग्स :laturलातूरWaterपाणी