शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

वातावरण बदलाचा फटका, रेणापुरात गारपीटने रबी पिके मातीमोल

By हरी मोकाशे | Updated: March 18, 2023 17:29 IST

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणात बदल होऊन सतत ढगाळ वातावरण निर्माण होत आहे.

लातूर : जिल्ह्यातील रेणापूर शहरासह तालुक्यातील काही भागात तसेच चाकूर तालुक्यातील जानवळ परिसरात शनिवारी दुपारी दीड तास विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपीट झाली. त्यामुळे हाताशी आलेली रबी पिके मातीमोल झाली.

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणात बदल होऊन सतत ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. तसेच अवकाळी पाऊस होत आहे. सध्या जिल्ह्यातील बहुतांश भागात रबी हंगामातील हरभरा, गहू, करडईची काढणी सुरु आहे तर ज्वारी कणसांनी बहरलेली आहे. या पावसामुळे हाताशी आलेल्या पिकांना फटका बसला आहे. काही ठिकाणीची ज्वारी भुईसपाट झाली आहे.

जिल्ह्यातील रेणापूरसह तालुक्यातील काही भागात शनिवारी दुपारी वादळी वाऱ्यासह दीड तास जोरदार पाऊस झाला. तसेच गारपीट झाली. या पावसामुळे रबी पिकांबरोबरच भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. आंबा, चिंच आणि द्राक्ष बागांनाही मोठा फटका बसला आहे. तसेच चाकूर तालुक्यातील जानवळ, उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी परिसरात गारांचा पाऊस होऊन नुकसान झाले आहे. जळकोट तालुक्यातील अतनूर परिसरातही पाऊस झाला. या नुकसानीची पाहणी करुन पंचनामे करण्यात येतील, असे रेणापूरच्या तहसीलदार डॉ. धम्मप्रिया गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरagricultureशेतीFarmerशेतकरी