शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

पैसे जमा झाल्याच्या एसएमएसने आनंद मात्र बँकेत गेल्यानंतर बसला धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 17:47 IST

खात्यावर टाकलेले पैसे चुकून आल्याने ते परत घेतल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ठळक मुद्देपीकविमा कंपनीचा घोळचुकीमुळे खात्यावर टाकलेले पैसे घेतले परत

लातूर : ५० हजार, लाख, सव्वालाख अशी रक्कम काही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याचा बँकेचा एसएमएस आला. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंद निर्माण झाला. काही शेतकऱ्यांनी बँकेत तात्काळ चौकशी केल्यानंतर पैसे जमा झाल्याचे समजले. परंतु, आठ दिवसांनी पैसे काढण्यासाठी गेलेल्या या शेतकऱ्यांना धक्काच बसला. पीकविमा कंपनीने खात्यावर टाकलेले पैसे चुकून आल्याने ते परत घेतल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

डिसेंबर महिना उलटत आला असतानाही गेल्या वर्षीच्या हंगामातील प्रधानमंत्री पीकविम्याचा घोळ संपुष्टात आला नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी खरिपाचा पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी अडीचशे कोटी रुपये मंजूर झाल्याचे जाहीर करण्यात आले. प्रत्यक्षात जूनपासून वाटपास सुरुवात झाल्यानंतर शंभर कोटींची तफावत झाली. पहिल्या टप्प्यात २ लाख ७५ हजार शेतकऱ्यांना १३४ कोटी, दुसऱ्या टप्प्यात १ लाख ७६ हजार शेतकऱ्यांना ५९ कोटी, तिसऱ्या टप्प्यात २ लाख १० हजार शेतकऱ्यांना ३९ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. तरीही काही शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहिल्याचे पाहून ‘लोकमत’ ने वारंवार वृत्त प्रकाशित केल्याने आणि शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर गत नोव्हेंबरच्या सुरुवातीस चौथ्या टप्प्यात २१ कोटी ७५ लाख रुपये मंजूर करण्यात आले. त्याचे वितरण सुरु झाले.

दरम्यान, पीकविमा कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा भरला नव्हता अशा जळकोट, रेणापूर, लातूर आणि औसा तालुक्यातील काही भागातील शेतकऱ्यांच्या नावावरही पीकविम्याची रक्कम टाकण्यात आली. ही रक्कम सदरील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाली. त्याचे एसएमएस शेतकऱ्यांना आले. अचानपकपणे पैसे कशाचे आले याची उत्सुकता शेतकऱ्यांत निर्माण झाली तर काही शेतकऱ्यांनी खरोखरच पैसे जमा झाले का? याची बँकेत जाऊन खात्री करुन घेतली. तेव्हा बँक अधिकाऱ्यांनी पैसे जमा झाल्याचे सांगितले.

आठवडाभराचा कालावधी उलटताच हे पैसे काढण्यासाठी सदरील शेतकरी गेले असता विमा कंपनीने पुन्हा पैसे परत घेतले असल्याचे बँक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे या शेतकऱ्यांची निराशाच झाली. मात्र, आपण गेल्या वर्षी पीकविमाच भरला नव्हता. त्यामुळे आपल्याला विम्याची रक्कम कशी मिळणार? असा स्वत:शीच सवाल करीत हे शेतकरी परतले.

चार तालुक्यांत घडला प्रकारगतवर्षीच्या खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा भरला नव्हता, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरही चुकून रक्कम जमा झाली होती़. जळकोट, रेणापूर, लातूर आणि औसा तालुक्यातील काही भागांत हा प्रकार घडला. ही रक्कम कंपनीने परत घेतली असल्याचे नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे शाखा व्यवस्थापक विजय पस्तापूरे यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीfraudधोकेबाजीbankबँक