शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

पैसे जमा झाल्याच्या एसएमएसने आनंद मात्र बँकेत गेल्यानंतर बसला धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 17:47 IST

खात्यावर टाकलेले पैसे चुकून आल्याने ते परत घेतल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ठळक मुद्देपीकविमा कंपनीचा घोळचुकीमुळे खात्यावर टाकलेले पैसे घेतले परत

लातूर : ५० हजार, लाख, सव्वालाख अशी रक्कम काही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याचा बँकेचा एसएमएस आला. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंद निर्माण झाला. काही शेतकऱ्यांनी बँकेत तात्काळ चौकशी केल्यानंतर पैसे जमा झाल्याचे समजले. परंतु, आठ दिवसांनी पैसे काढण्यासाठी गेलेल्या या शेतकऱ्यांना धक्काच बसला. पीकविमा कंपनीने खात्यावर टाकलेले पैसे चुकून आल्याने ते परत घेतल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

डिसेंबर महिना उलटत आला असतानाही गेल्या वर्षीच्या हंगामातील प्रधानमंत्री पीकविम्याचा घोळ संपुष्टात आला नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी खरिपाचा पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी अडीचशे कोटी रुपये मंजूर झाल्याचे जाहीर करण्यात आले. प्रत्यक्षात जूनपासून वाटपास सुरुवात झाल्यानंतर शंभर कोटींची तफावत झाली. पहिल्या टप्प्यात २ लाख ७५ हजार शेतकऱ्यांना १३४ कोटी, दुसऱ्या टप्प्यात १ लाख ७६ हजार शेतकऱ्यांना ५९ कोटी, तिसऱ्या टप्प्यात २ लाख १० हजार शेतकऱ्यांना ३९ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. तरीही काही शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहिल्याचे पाहून ‘लोकमत’ ने वारंवार वृत्त प्रकाशित केल्याने आणि शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर गत नोव्हेंबरच्या सुरुवातीस चौथ्या टप्प्यात २१ कोटी ७५ लाख रुपये मंजूर करण्यात आले. त्याचे वितरण सुरु झाले.

दरम्यान, पीकविमा कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा भरला नव्हता अशा जळकोट, रेणापूर, लातूर आणि औसा तालुक्यातील काही भागातील शेतकऱ्यांच्या नावावरही पीकविम्याची रक्कम टाकण्यात आली. ही रक्कम सदरील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाली. त्याचे एसएमएस शेतकऱ्यांना आले. अचानपकपणे पैसे कशाचे आले याची उत्सुकता शेतकऱ्यांत निर्माण झाली तर काही शेतकऱ्यांनी खरोखरच पैसे जमा झाले का? याची बँकेत जाऊन खात्री करुन घेतली. तेव्हा बँक अधिकाऱ्यांनी पैसे जमा झाल्याचे सांगितले.

आठवडाभराचा कालावधी उलटताच हे पैसे काढण्यासाठी सदरील शेतकरी गेले असता विमा कंपनीने पुन्हा पैसे परत घेतले असल्याचे बँक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे या शेतकऱ्यांची निराशाच झाली. मात्र, आपण गेल्या वर्षी पीकविमाच भरला नव्हता. त्यामुळे आपल्याला विम्याची रक्कम कशी मिळणार? असा स्वत:शीच सवाल करीत हे शेतकरी परतले.

चार तालुक्यांत घडला प्रकारगतवर्षीच्या खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा भरला नव्हता, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरही चुकून रक्कम जमा झाली होती़. जळकोट, रेणापूर, लातूर आणि औसा तालुक्यातील काही भागांत हा प्रकार घडला. ही रक्कम कंपनीने परत घेतली असल्याचे नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे शाखा व्यवस्थापक विजय पस्तापूरे यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीfraudधोकेबाजीbankबँक