शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
4
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
5
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
7
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
8
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
9
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
10
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
11
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
12
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
13
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
14
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
15
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
16
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
17
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
18
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
19
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
20
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?

पैसे जमा झाल्याच्या एसएमएसने आनंद मात्र बँकेत गेल्यानंतर बसला धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 17:47 IST

खात्यावर टाकलेले पैसे चुकून आल्याने ते परत घेतल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ठळक मुद्देपीकविमा कंपनीचा घोळचुकीमुळे खात्यावर टाकलेले पैसे घेतले परत

लातूर : ५० हजार, लाख, सव्वालाख अशी रक्कम काही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याचा बँकेचा एसएमएस आला. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंद निर्माण झाला. काही शेतकऱ्यांनी बँकेत तात्काळ चौकशी केल्यानंतर पैसे जमा झाल्याचे समजले. परंतु, आठ दिवसांनी पैसे काढण्यासाठी गेलेल्या या शेतकऱ्यांना धक्काच बसला. पीकविमा कंपनीने खात्यावर टाकलेले पैसे चुकून आल्याने ते परत घेतल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

डिसेंबर महिना उलटत आला असतानाही गेल्या वर्षीच्या हंगामातील प्रधानमंत्री पीकविम्याचा घोळ संपुष्टात आला नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी खरिपाचा पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी अडीचशे कोटी रुपये मंजूर झाल्याचे जाहीर करण्यात आले. प्रत्यक्षात जूनपासून वाटपास सुरुवात झाल्यानंतर शंभर कोटींची तफावत झाली. पहिल्या टप्प्यात २ लाख ७५ हजार शेतकऱ्यांना १३४ कोटी, दुसऱ्या टप्प्यात १ लाख ७६ हजार शेतकऱ्यांना ५९ कोटी, तिसऱ्या टप्प्यात २ लाख १० हजार शेतकऱ्यांना ३९ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. तरीही काही शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहिल्याचे पाहून ‘लोकमत’ ने वारंवार वृत्त प्रकाशित केल्याने आणि शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर गत नोव्हेंबरच्या सुरुवातीस चौथ्या टप्प्यात २१ कोटी ७५ लाख रुपये मंजूर करण्यात आले. त्याचे वितरण सुरु झाले.

दरम्यान, पीकविमा कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा भरला नव्हता अशा जळकोट, रेणापूर, लातूर आणि औसा तालुक्यातील काही भागातील शेतकऱ्यांच्या नावावरही पीकविम्याची रक्कम टाकण्यात आली. ही रक्कम सदरील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाली. त्याचे एसएमएस शेतकऱ्यांना आले. अचानपकपणे पैसे कशाचे आले याची उत्सुकता शेतकऱ्यांत निर्माण झाली तर काही शेतकऱ्यांनी खरोखरच पैसे जमा झाले का? याची बँकेत जाऊन खात्री करुन घेतली. तेव्हा बँक अधिकाऱ्यांनी पैसे जमा झाल्याचे सांगितले.

आठवडाभराचा कालावधी उलटताच हे पैसे काढण्यासाठी सदरील शेतकरी गेले असता विमा कंपनीने पुन्हा पैसे परत घेतले असल्याचे बँक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे या शेतकऱ्यांची निराशाच झाली. मात्र, आपण गेल्या वर्षी पीकविमाच भरला नव्हता. त्यामुळे आपल्याला विम्याची रक्कम कशी मिळणार? असा स्वत:शीच सवाल करीत हे शेतकरी परतले.

चार तालुक्यांत घडला प्रकारगतवर्षीच्या खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा भरला नव्हता, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरही चुकून रक्कम जमा झाली होती़. जळकोट, रेणापूर, लातूर आणि औसा तालुक्यातील काही भागांत हा प्रकार घडला. ही रक्कम कंपनीने परत घेतली असल्याचे नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे शाखा व्यवस्थापक विजय पस्तापूरे यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीfraudधोकेबाजीbankबँक