शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

रयत क्रांती संघटनेचे हलगीनाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:21 IST

रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव पेठे यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन झाले. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना मागील वर्षातील पीकविमा मिळाला नाही. ...

रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव पेठे यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन झाले. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना मागील वर्षातील पीकविमा मिळाला नाही. तसेच यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, मुगाचे पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांचा ऊस भुईसपाट झाला आहे. नदी- नाल्यांना आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या पिकांची नासाडी झाली आहे. तसेच जमिनीची खरडण झाली आहे. त्यामुळे उसासह इतर पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी, अशी मागणी करीत हलगीनाद आंदोलन करण्यात आले. त्यानंतर मागण्यांचे निवेदन तहसीलदार अतुल जटाळे यांना देण्यात आले. निवेदनावर शिवाजीराव पेठे, ओमप्रकाश सारूळे यांच्यासह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

शेतकऱ्यांना पीकविमा द्यावा...

मागील वर्षात पीकविमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरित पीकविमा देण्यात यावा. यंदा खरीप हंगामातील पिकांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चालू वर्षातील २५ टक्के पीकविमा रक्कम देण्यात यावी, भुईसपाट झालेल्या उसाला हेक्टरी २५ हजारांची मदत देण्यात यावी. प्रत्येक शेतकऱ्याकडे मोबाईल नसल्याने ई-पीक पाहणी पूर्वीप्रमाणे करावी. शिरूर अनंतपाळ येथे १३२ केव्ही वीज वितरण कार्यालय सुरू करावे. शिवपूर येथे ३३ केव्ही उपकेंद्र मंजूर करावे. चालू बाकीदारांस ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.