शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
3
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
4
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
5
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
6
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
7
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
8
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
9
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
10
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
11
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
12
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
13
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
14
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
15
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
16
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
17
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
18
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
19
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
20
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...

बांबू लागवडीतून एकरी एक लाखाच्या उत्पादनाची हमी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:18 IST

शिरूर अनंतपाळ : बांबू लागवड शेतकऱ्यांसाठी अत्यंत फलदायी असून, कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवून देणारे पीक असल्याने बांबूच्या ...

शिरूर अनंतपाळ : बांबू लागवड शेतकऱ्यांसाठी अत्यंत फलदायी असून, कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवून देणारे पीक असल्याने बांबूच्या लागवडीतून शेतकऱ्यांना एकरी एक लाखांपेक्षा अधिक उत्पादनाची हमी असल्याचे प्रतिपादन कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले आहे.

तालुक्यातील दैठणा येथे गुरुवारी किसान कट्ट्यावर त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी बांबू उत्पादनातील अग्रगण्य काॅनबॅक संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कर्पे होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक व्यंकटराव पाटील, प्रा. मनोहर सांगवे, भाऊराव पाटील, मेजर दिलीप बिरादार, बालाजी तोटे, कल्याणराव बिरादार, मेजर लक्ष्मण सांगवे, विनायक बिरादार, संदीपान पाटील, विश्वजित सांगवे, राजकुमार गुडे, हरिश्चंद्र बिरादार, गणेश पाटील, प्रकाश पाटील यांची उपस्थिती होती.

यावेळी पाशा पटेल म्हणाले, बांबूपासून इथेनॉलची निर्मिती करता येते. बांबू हे शंभर टक्के कार्बनडायऑक्साईड शोषून घेते आणि शंभर टक्के ऑक्सिजन देते. त्यामुळे ऑक्सिजन निर्मितीसाठी बांबूचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. म्हणून शेतकऱ्यांनी आता पारंपरिक पिकाला फाटा देऊन किमान एक-दोन हेक्टर तरी बांबूची लागवड केली पाहिजे. लोदगा येथील अटल डिप्लोमा इंजिनिअरिंग काॅलेजच्या माध्यमातून टिश्यू कल्चर लॅबोरेटरीमध्ये ३० लाख बांबूची रोपे तयार करण्यात येत आहेत. त्यामुळे एकरी एक लाखापेक्षा जास्त उत्पादन मिळविण्यासाठी आता बांबू लागवडीशिवाय पर्याय नसल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी संजीव कर्पे यांनी काॅनबॅक संस्थेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात बांबूपासून अनेक व्यवसाय उभे केले जात असल्याचे सांगितले. रमेश मुळे यांनी सूत्रसंचालन केले.

जागतिक तापमान नियंत्रणासाठी पर्याय...

जागतिक तापमानात वाढ होत असल्याने जगात आज अनेक समस्या निर्माण होत आहेत. ऋतूचक्रही बिघडले आहे. त्यामुळे जागतिक तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी बांबू लागवड हा एकमेव पर्याय आहे. बांधकाम व्यवसायात आता बांबूच्या वापरासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे बांबूची अत्यंत रेखीव घरे तयार केली जात आहेत. एवढेच नव्हे, तर बांबूपासून तयार करण्यात आलेल्या फर्निचरला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. बांबूपासून सीएनजी, फर्निचर तर तयार होत आहेच. शिवाय कपडे, लोणचे, मुरंबा, राईस, ब्रश, आदी खाण्यापासून ते वापरापर्यंतच्या अनेक वस्तू तयार केल्या जात आहेत. बांबू रोटी, कपडा और मकान या मूलभूत गरजा भागविणारे पीक आहे, असेही पाशा पटेल म्हणाले.