शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
2
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
3
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
4
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
5
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
6
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
7
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
8
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
9
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
10
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
11
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
12
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
13
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
14
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
15
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
16
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
17
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
18
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
19
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
20
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
Daily Top 2Weekly Top 5

बांबू लागवडीतून एकरी एक लाखाच्या उत्पादनाची हमी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:18 IST

शिरूर अनंतपाळ : बांबू लागवड शेतकऱ्यांसाठी अत्यंत फलदायी असून, कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवून देणारे पीक असल्याने बांबूच्या ...

शिरूर अनंतपाळ : बांबू लागवड शेतकऱ्यांसाठी अत्यंत फलदायी असून, कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवून देणारे पीक असल्याने बांबूच्या लागवडीतून शेतकऱ्यांना एकरी एक लाखांपेक्षा अधिक उत्पादनाची हमी असल्याचे प्रतिपादन कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले आहे.

तालुक्यातील दैठणा येथे गुरुवारी किसान कट्ट्यावर त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी बांबू उत्पादनातील अग्रगण्य काॅनबॅक संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कर्पे होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक व्यंकटराव पाटील, प्रा. मनोहर सांगवे, भाऊराव पाटील, मेजर दिलीप बिरादार, बालाजी तोटे, कल्याणराव बिरादार, मेजर लक्ष्मण सांगवे, विनायक बिरादार, संदीपान पाटील, विश्वजित सांगवे, राजकुमार गुडे, हरिश्चंद्र बिरादार, गणेश पाटील, प्रकाश पाटील यांची उपस्थिती होती.

यावेळी पाशा पटेल म्हणाले, बांबूपासून इथेनॉलची निर्मिती करता येते. बांबू हे शंभर टक्के कार्बनडायऑक्साईड शोषून घेते आणि शंभर टक्के ऑक्सिजन देते. त्यामुळे ऑक्सिजन निर्मितीसाठी बांबूचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. म्हणून शेतकऱ्यांनी आता पारंपरिक पिकाला फाटा देऊन किमान एक-दोन हेक्टर तरी बांबूची लागवड केली पाहिजे. लोदगा येथील अटल डिप्लोमा इंजिनिअरिंग काॅलेजच्या माध्यमातून टिश्यू कल्चर लॅबोरेटरीमध्ये ३० लाख बांबूची रोपे तयार करण्यात येत आहेत. त्यामुळे एकरी एक लाखापेक्षा जास्त उत्पादन मिळविण्यासाठी आता बांबू लागवडीशिवाय पर्याय नसल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी संजीव कर्पे यांनी काॅनबॅक संस्थेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात बांबूपासून अनेक व्यवसाय उभे केले जात असल्याचे सांगितले. रमेश मुळे यांनी सूत्रसंचालन केले.

जागतिक तापमान नियंत्रणासाठी पर्याय...

जागतिक तापमानात वाढ होत असल्याने जगात आज अनेक समस्या निर्माण होत आहेत. ऋतूचक्रही बिघडले आहे. त्यामुळे जागतिक तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी बांबू लागवड हा एकमेव पर्याय आहे. बांधकाम व्यवसायात आता बांबूच्या वापरासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे बांबूची अत्यंत रेखीव घरे तयार केली जात आहेत. एवढेच नव्हे, तर बांबूपासून तयार करण्यात आलेल्या फर्निचरला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. बांबूपासून सीएनजी, फर्निचर तर तयार होत आहेच. शिवाय कपडे, लोणचे, मुरंबा, राईस, ब्रश, आदी खाण्यापासून ते वापरापर्यंतच्या अनेक वस्तू तयार केल्या जात आहेत. बांबू रोटी, कपडा और मकान या मूलभूत गरजा भागविणारे पीक आहे, असेही पाशा पटेल म्हणाले.