शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

बांबू लागवडीतून एकरी एक लाखाच्या उत्पादनाची हमी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:18 IST

शिरूर अनंतपाळ : बांबू लागवड शेतकऱ्यांसाठी अत्यंत फलदायी असून, कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवून देणारे पीक असल्याने बांबूच्या ...

शिरूर अनंतपाळ : बांबू लागवड शेतकऱ्यांसाठी अत्यंत फलदायी असून, कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवून देणारे पीक असल्याने बांबूच्या लागवडीतून शेतकऱ्यांना एकरी एक लाखांपेक्षा अधिक उत्पादनाची हमी असल्याचे प्रतिपादन कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले आहे.

तालुक्यातील दैठणा येथे गुरुवारी किसान कट्ट्यावर त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी बांबू उत्पादनातील अग्रगण्य काॅनबॅक संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कर्पे होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक व्यंकटराव पाटील, प्रा. मनोहर सांगवे, भाऊराव पाटील, मेजर दिलीप बिरादार, बालाजी तोटे, कल्याणराव बिरादार, मेजर लक्ष्मण सांगवे, विनायक बिरादार, संदीपान पाटील, विश्वजित सांगवे, राजकुमार गुडे, हरिश्चंद्र बिरादार, गणेश पाटील, प्रकाश पाटील यांची उपस्थिती होती.

यावेळी पाशा पटेल म्हणाले, बांबूपासून इथेनॉलची निर्मिती करता येते. बांबू हे शंभर टक्के कार्बनडायऑक्साईड शोषून घेते आणि शंभर टक्के ऑक्सिजन देते. त्यामुळे ऑक्सिजन निर्मितीसाठी बांबूचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. म्हणून शेतकऱ्यांनी आता पारंपरिक पिकाला फाटा देऊन किमान एक-दोन हेक्टर तरी बांबूची लागवड केली पाहिजे. लोदगा येथील अटल डिप्लोमा इंजिनिअरिंग काॅलेजच्या माध्यमातून टिश्यू कल्चर लॅबोरेटरीमध्ये ३० लाख बांबूची रोपे तयार करण्यात येत आहेत. त्यामुळे एकरी एक लाखापेक्षा जास्त उत्पादन मिळविण्यासाठी आता बांबू लागवडीशिवाय पर्याय नसल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी संजीव कर्पे यांनी काॅनबॅक संस्थेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात बांबूपासून अनेक व्यवसाय उभे केले जात असल्याचे सांगितले. रमेश मुळे यांनी सूत्रसंचालन केले.

जागतिक तापमान नियंत्रणासाठी पर्याय...

जागतिक तापमानात वाढ होत असल्याने जगात आज अनेक समस्या निर्माण होत आहेत. ऋतूचक्रही बिघडले आहे. त्यामुळे जागतिक तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी बांबू लागवड हा एकमेव पर्याय आहे. बांधकाम व्यवसायात आता बांबूच्या वापरासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे बांबूची अत्यंत रेखीव घरे तयार केली जात आहेत. एवढेच नव्हे, तर बांबूपासून तयार करण्यात आलेल्या फर्निचरला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. बांबूपासून सीएनजी, फर्निचर तर तयार होत आहेच. शिवाय कपडे, लोणचे, मुरंबा, राईस, ब्रश, आदी खाण्यापासून ते वापरापर्यंतच्या अनेक वस्तू तयार केल्या जात आहेत. बांबू रोटी, कपडा और मकान या मूलभूत गरजा भागविणारे पीक आहे, असेही पाशा पटेल म्हणाले.