गटविकास अधिकारी म्हणून मनोज राऊत यांनी अल्पकाळात तालुक्यात वृक्षलागवड चळवळ, बाला उपक्रम राबवून जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता वाढवली, पंचायत समिती कार्यालयाला आयएसओ दर्जा मिळवून दिला. कर्मचारी ग्रंथालय स्थापन करून वाचनसंस्कृती वाढवली. तालुक्यातील अंगणवाडी दर्जा सुधारला, बचत गट प्रगती आदी उत्कृष्ट कार्य केले. या वेळी सहायक गटविकास अधिकारी अच्युत पाटील, कनिष्ठ प्रशासन अधिकारी जयवंत डोईजडे, उपाभियंता कानडे, आरोग्य पर्यवेक्षक दीपक मस्के, ग्रामविकास अधिकारी बिरादार, बी. जी.जाधव, एस. एस. माने, विष्णू माने, बालाजी घोडके,, कनिष्ठ आरेखक अमित वेदपाठक, लिपिक बिरादार, सेवक श्रवणकुमार जिरोबे, पशुधन पर्यवेक्षक विजयकुमार गायकवाड यांनाही बदली झाल्याने सत्कार करून निरोप देण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सभापती सविता धनराज पाटील, उपसभापती शंकर पाटील, जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र तिरुके, प्रशांत पाटील, नायब तहसीलदार विलास तरंगे,उपाभियंता वागलगावे, गटशिक्षणाधिकारी व्यंकट बोईनवाड, आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप गुरमे, विस्तार अधिकारी व्ही. एस. कांबळे, अशोक कट्टेवार, नरसिंग गोपनवाड, अमोल गायकवाड तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी मुख्याध्यापक, शिक्षक, आशा वर्कर आदींसह मान्यवर नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन ग्रामसेवक श्रीकांत पताळे तर आभार विस्तार अधिकारी अमोल गायकवाड यांनी मानले.