शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा, विदर्भाच्या विकासात निलंगेकराचं मोठे योगदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 05:41 IST

श्रद्धांजली । शिवाजीराव पाटील निलंगेकर

लातूर : मुख्यमंत्री तसेच मंत्री असताना डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. ते स्वातंत्र्यसेनानी होते. मराठवाडा, विदर्भ विकासाची त्यांनी पायाभरणी केली. मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी ४२ कलमी, विदर्भासाठी ३३ कलमी तर कोकण विकासासाठी ४० कलमी कार्यक्रम राबविला. रोजगार हमीवरच्या मजुरांना मजुरीशिवाय दररोज धान्य देण्याची क्रांतिकारी योजना त्यांनी राबविली. तालुक्याच्या ठिकाणी एमआयडीसी सुरू करण्याचा निर्णय डॉ. निलंगेकर यांचाच होता. लोकन्यायालय, प्रशासकीय न्यायाधिकरण, मागासवर्गीय वस्त्यांचे विद्युतीकरण यासह राज्यातील १० जिल्हा व तालुका न्यायालयांच्या इमारतीचे काम त्यांच्याच कार्यकाळात पूर्ण झाले. शिक्षणसंस्थांचे जाळे निर्माण केले. गुणवत्तेवर नियुक्त्या आणि शासनमान्य शुल्कावरच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा पायंडा निर्माण केला.

लातूर येथील जवाहर सहकारी सूतगिरणीचे ते संस्थापक होते. लातूर व जालना जिल्ह्याच्या निर्मितीत, औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ उभारणीमध्ये त्यांचे योगदान मोलाचे राहिले. औरंगाबाद महापालिका, नव्या विधानसभेची इमारत हे त्यांच्याच निर्णयाचे फलित आहे. महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्रात दीर्घकाळ परिणाम करणारे काम केले. मोठ्या व लघु प्रकल्पांची उभारणी केली. लोअर तेरणा, उजनी, सिंदफणा, कुकडी, कृष्णा, मांजरा, डिग्वे, अप्परवर्धा, धनेगाव, मदनसुरीसह अनेक लघु प्रकल्प साकारले.एक हृद्य आठवणमाजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे लोकमत परिवाराशी खूप जिव्हाळ्याचे नाते होते. ते मुख्यमंत्री असताना एका कार्यक्रमप्रसंगी टिपलेल्या छायाचित्रात त्यांच्या समवेत तत्कालीन मंत्री स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा, लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा आणि लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डाराजकीयकारकीर्दमाजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी १९६२ पासून सातत्याने निलंगा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. नऊवेळा विधानसभेवर तर एकदा विधान परिषदेवर निवडून गेले.असे एकूण ते ४१ वर्षे विधिमंडळात राहिले. ३ जून १९८५ ते ७ मार्च १९८६ या कालावधीत ते राज्याचे मुख्यमंत्री तर १९९२ मध्ये ते काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. राज्याच्या मंत्रिमंडळात प्रदीर्घकाळ अनेक खात्यांचा पदभार सांभाळला. प्रामुख्याने गृह, महसूल, आरोग्य, जलसिंचन, सार्वजनिक बांधकाम यासारख्या महत्त्वाच्या खात्यांचे काम पाहताना जनहिताचे निर्णय घेतले.डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एक लोकाभिमुख नेता गमावला. राज्यातील शेतकऱ्यांसाठी, गरीब व कष्टकऱ्यांसाठी डॉ. निलंगेकर यांनी पथदर्शी काम केले.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

स्वातंत्र्य लढ्यात आणि महाराष्ट्राच्या उभारणीत योगदान देणाºया नेतृत्वात ज्येष्ठ नेते डॉ. निलंगेकर यांचा समावेश होता. बाणेदार आणि ठाम विचारसरणीचे नेते अशी त्यांची ओळख होती. मराठवाड्याच्या विकासाला गती देण्यासाठी नेहमी आग्रही असणाºया डॉ. शिवाजीराव पाटील यांनी तितक्याच तडफेने राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केले.- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

टॅग्स :laturलातूरShivajirao Patil Nilangekarशिवाजीराव पाटील निलंगेकर