शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

आशांच्या प्रोत्साहनपर भत्त्याचा ग्रामसेवकांना विसर; सीईओंच्या पत्राला केराची टोपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 19:12 IST

कोरोना काळात आपल्या कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता गावस्तरावर आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक सर्वेक्षणाचे काम करत आहेत.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांनी आशा व गटप्रवर्तकांना मासिक १ हजार प्रोत्साहनपर भत्ता देण्याचे आदेश मे महिन्यात काढले.जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी अद्याप छदामही दिली नसल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.

- आशपाक पठाणलातूर : गावस्तरावर कोरोना सर्वेक्षणाचे काम करणाऱ्या आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना ग्रामनिधी, वित्त आयोगातून मासिक १ हजार रूपये प्रोत्साहनपर भत्ता देण्याचे आदेश दोन महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी काढले होते. मात्र, अद्याप बोटावर मोजण्याइतक्याही ग्रामपंचायतींनी हा भत्ता दिलेला नाही. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढलेल्या पत्राला ग्रामसेवकांनी केराची टोपली दाखवली आहे.

कोरोना काळात आपल्या कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता गावस्तरावर आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक सर्वेक्षणाचे काम करत आहेत. त्यांना शासनाकडून मिळणारा मोबदला मासिक केवळ १ हजार रूपये आहे. यातून त्यांना दैनंदिन रोजगार केवळ ३५ रूपये पडत होता. तरीही जीवाची पर्वा न करता आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांनी सर्व जोखीम पत्करून काम सुरूच ठेवले. अत्यंत तोकडा मोबदला असल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांनी आशा व गटप्रवर्तकांना मासिक १ हजार प्रोत्साहनपर भत्ता देण्याचे आदेश मे महिन्यात काढले. त्यामुळे आशा स्वंयसेवकांनी उत्स्फूर्तपणे जोमाने काम सुरू केले. मात्र, जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी अद्याप छदामही दिली नसल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. जीवाची पर्वा न करता गावाची काळजी घेणाऱ्या आशांची यामुळे परवड होत आहे.

पत्र दाखवूनही कोणी दखल घेईना...महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार कोरोना महामारीच्या काळात संबंधित आरोग्यविषयक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त मदत करणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी ठरते. त्यामुळे प्रोत्साहनपर भत्ता म्हणून मासिक १ हजार द्यावेत, असे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांनी काढले. ही भत्त्याची रक्कम मिळावी, यासाठी आशा स्वंयसेविका, गटप्रवर्तकांनी ग्रामसेवकांना आदेशाची प्रतही दाखवली. मात्र, त्याचा काहीही उपयोग होत नसल्याचे आशांकडून सांगण्यात येत आहे.

सीईओ कारवाई करतील का?लातूर जिल्ह्यात एकूण १,८९५ आशा व ८८ गटप्रवर्तक कार्यरत आहेत. त्यांनी प्रोत्साहनपर भत्त्यासाठी ग्रामसेवकांना वेळोवेळी आठवण करून देऊनही त्याची दखल घेतली जात नाही. स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी काढलेल्या पत्राला ग्रामसेवक दाद देत नाहीत. त्यामुळे पत्राकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्रामसेवकांवर मुख्य कार्यकारी अधिकारी काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :laturलातूरMONEYपैसाcorona virusकोरोना वायरस बातम्या