शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

आशांच्या प्रोत्साहनपर भत्त्याचा ग्रामसेवकांना विसर; सीईओंच्या पत्राला केराची टोपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 19:12 IST

कोरोना काळात आपल्या कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता गावस्तरावर आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक सर्वेक्षणाचे काम करत आहेत.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांनी आशा व गटप्रवर्तकांना मासिक १ हजार प्रोत्साहनपर भत्ता देण्याचे आदेश मे महिन्यात काढले.जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी अद्याप छदामही दिली नसल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.

- आशपाक पठाणलातूर : गावस्तरावर कोरोना सर्वेक्षणाचे काम करणाऱ्या आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना ग्रामनिधी, वित्त आयोगातून मासिक १ हजार रूपये प्रोत्साहनपर भत्ता देण्याचे आदेश दोन महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी काढले होते. मात्र, अद्याप बोटावर मोजण्याइतक्याही ग्रामपंचायतींनी हा भत्ता दिलेला नाही. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढलेल्या पत्राला ग्रामसेवकांनी केराची टोपली दाखवली आहे.

कोरोना काळात आपल्या कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता गावस्तरावर आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक सर्वेक्षणाचे काम करत आहेत. त्यांना शासनाकडून मिळणारा मोबदला मासिक केवळ १ हजार रूपये आहे. यातून त्यांना दैनंदिन रोजगार केवळ ३५ रूपये पडत होता. तरीही जीवाची पर्वा न करता आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांनी सर्व जोखीम पत्करून काम सुरूच ठेवले. अत्यंत तोकडा मोबदला असल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांनी आशा व गटप्रवर्तकांना मासिक १ हजार प्रोत्साहनपर भत्ता देण्याचे आदेश मे महिन्यात काढले. त्यामुळे आशा स्वंयसेवकांनी उत्स्फूर्तपणे जोमाने काम सुरू केले. मात्र, जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी अद्याप छदामही दिली नसल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. जीवाची पर्वा न करता गावाची काळजी घेणाऱ्या आशांची यामुळे परवड होत आहे.

पत्र दाखवूनही कोणी दखल घेईना...महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार कोरोना महामारीच्या काळात संबंधित आरोग्यविषयक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त मदत करणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी ठरते. त्यामुळे प्रोत्साहनपर भत्ता म्हणून मासिक १ हजार द्यावेत, असे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांनी काढले. ही भत्त्याची रक्कम मिळावी, यासाठी आशा स्वंयसेविका, गटप्रवर्तकांनी ग्रामसेवकांना आदेशाची प्रतही दाखवली. मात्र, त्याचा काहीही उपयोग होत नसल्याचे आशांकडून सांगण्यात येत आहे.

सीईओ कारवाई करतील का?लातूर जिल्ह्यात एकूण १,८९५ आशा व ८८ गटप्रवर्तक कार्यरत आहेत. त्यांनी प्रोत्साहनपर भत्त्यासाठी ग्रामसेवकांना वेळोवेळी आठवण करून देऊनही त्याची दखल घेतली जात नाही. स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी काढलेल्या पत्राला ग्रामसेवक दाद देत नाहीत. त्यामुळे पत्राकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्रामसेवकांवर मुख्य कार्यकारी अधिकारी काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :laturलातूरMONEYपैसाcorona virusकोरोना वायरस बातम्या