शहरं
Join us  
Trending Stories
1
पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच भाजपाने तीन ठिकाणी उधळला गुलाल
2
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
3
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
4
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
5
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
6
सावधान! ChatGPT वर तुमची माहिती गुप्तपणे सेव्ह होते; टाळायचे असेल तर या ५ स्टेप्स फॉलो करा
7
अर्ज दाखल करताच अजित पवारांच्या उमेदवाराचा मृत्यू, ३ जणांना रात्री प्रवेश, सकाळी तिकीट; काँग्रेसचे २६ उमेदवार गेले कुठे...?
8
VHT 2025 : महाराष्ट्र संघासाठी 'संकटमोचक' ठरला ऋतुराज! शतकी खेळीसह टीम इंडियातील जागेवरही टाकला रुमाल
9
झटपट, पटापट! स्मार्टफोन, इंटरनेट नसेल तरी नो टेन्शन; 'हा' नंबर डायल, काही सेकंदात UPI पेमेंट
10
“राज ठाकरेंच्या जास्त जागा जिंकून याव्यात ही आमची इच्छा, आम्ही बहुमत मिळवू”: संजय राऊत
11
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
12
नववर्षाच्या आदल्या दिवशीच गुड न्यूज; सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, पटापट चेक करा १८, २२, २४ कॅरेटचे दर
13
Nashik Municipal Corporation Election : आयारामांची चांदी! भाजपचे २२, शिंदेसेनेचे १९; निष्ठावंतांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचीच वेळ
14
'ताज'चे नाव आता 'जीव्हीके' हॉटेल्सवरून हटणार; टाटा समुहाने संपूर्ण हिस्सा विकला, कोण आहे खरेदीदार?
15
बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार...
16
जिभेचे चोचले की निसर्गाचा चमत्कार? जगातला असा एकमेव बेट, जिथे चक्क माती खातात लोक!
17
"आमदार मेहतांच्या घमेंडीमुळे मीरा भाईंदरमध्ये महायुती तुटली"; मंत्री प्रताप सरनाईकांचा घणाघात
18
एबी फॉर्म दिला, जल्लोष झाला अन् तासाभरात उमेदवारी रद्द
19
संप सुरू होण्यापूर्वी Swiggy, Zomato बॅकफुटवर; डिलिव्हरी बॉईजसाठी आली चांगली बातमी
20
पैशांची चणचण, कर्जाचा डोंगर... यूट्यूबवरुन शिकले अन् पती-पत्नीने घरातच छापल्या नकली नोटा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत, पालकांच्या ‘एनओसी’नंतरच वाजणार शाळांची घंटा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने हळूहळू निर्बंध शिथिल होत आहेत. ग्रामपंचायत, पालकांच्या नाहरकतीनंतर शाळांचीही घंटा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने हळूहळू निर्बंध शिथिल होत आहेत. ग्रामपंचायत, पालकांच्या नाहरकतीनंतर शाळांचीही घंटा वाजेल, असे सूतोवाच शासनाने केल्याने अनेक गावांना शाळा सुरू होण्याचे वेध लागले आहेत. त्यादृष्टीने अनेक ग्रामपंचायतींनी शिक्षण विभागाशी संपर्क करून ठरावाच्या अनुषंगाने हालचाली सुरू केल्या आहेत.

लातूर जिल्ह्यात एकूण ९२८ गावे आहेत. त्यापैकी ८७३ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. ५५ पेक्षा कमी गावांमध्ये कोरोनाचे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनामुक्त झालेल्या गावांमध्ये शाळा सुरू करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत; मात्र त्यासाठी आता ग्रामपंचायतींचा ठराव आणि पालकांची नाहरकत घ्यावी लागणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी गटस्तरावर व शाळास्तरावर ग्रामपंचायतींना ठराव घेण्याबाबत कळविण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या गावात रुग्ण नाहीत, अशा गावांतील शाळा सुरू करता येणार आहेत. मात्र ग्रामपंचायतींचा आणि पालकांची नाहरकत त्यासाठी महत्त्वाची असल्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विशाल दशवंत यांनी सांगितले.

जिल्ह्यात २७१५ शाळा

जिल्ह्यात २ हजार ७१५ शाळा असून, यातील ग्रामीण भागात १२०० च्या आसपास शाळांची संख्या आहे.

ग्रामीण भागातील ज्या गावात रुग्ण नाहीत, अशा गावांत असणाऱ्या शाळांची संख्या बाराशेच्या आसपास आहे. त्या शाळांची तयारी असल्याचे अनेकांनी सांगितले.

जिल्हा परिषदेने कोविड काळात प्रत्येक गावांत कोविड कॅप्टन विद्यार्थ्यांची नियुक्ती करून शिक्षण चालू ठेवले होते. त्या गावांतील शाळा सुरू करण्यास सहमती दर्शवतील.

ग्रामपंचायतींना शाळास्तरावरून माहिती

जिल्हा परिषदेच्या तसेच खासगी अनुदानित, विनाअनुदानित ग्रामीण भागात असलेल्या शाळास्तरावरून ग्रामपंचायतींना ठराव घेण्याची माहिती दिली जात आहे. त्यानुसार अनेक ग्रामपंचायतींची विचारणा ठरावाबाबत शिक्षण विभागाकडे होत आहे. आतापर्यंत दहा ते पंधरा ग्रामपंचायतींनी शिक्षण विभागाशी संपर्क करून ठराव घेण्यास सहमती दर्शविली आहे.

दीड-पावणेदोन वर्षापासून शाळा बंद आहेत. आता कोविडची रुग्णसंख्या घटली आहे. तरीपण काळजी आणि नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्यास हरकत नाही. सगळ्यांनी जबाबदारीने वागल्यास शाळा सुरू करता येतील. - सुनील भंडारे, पालक

शाळा बंद असल्याने मुलांचे नुकसान होत आहे. आता जिल्ह्यात शंभरच्या आत ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे ज्या गावात रुग्ण नाहीत, त्या गावातील शाळा सुरू करण्यास काही हरकत नसावी. आमचीही त्यासाठी संमती असेल. मुलांचे नुकसान टाळण्यासाठी खबरदारीने आणि नियमांचे पालन व्हावे. - हमीद मुजावर, पालक

शासनाचे पत्र नुकतेच आले आहे. ग्रामपंचायतीचा ठराव आणि पालकांची सहमती शाळा सुरू करण्यासाठी लागणार आहे. त्या अनुषंगाने गट आणि शाळास्तरावर याबाबत माहिती कळवलेली आहे. शाळा, ग्रामपंचायतीला आणि पालकांना कळवून शासनाच्या निर्देशानुसार कार्यवाही केली जाईल. - विशाल दशवंत, शिक्षणाधिकारी, प्राथमिक