शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद; जोरदार घोषणांनी लातूर जिल्हा परिषद परिसर दणाणला

By हरी मोकाशे | Updated: February 26, 2024 19:04 IST

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्यावतीने करण्यात आले आंदोलन

लातूर : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी मंजूर करावी, यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्यावतीने सोमवारपासून काम बंद करीत जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करण्यात यावे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतन अनुदानासाठी लागू केलेली वसुलीची अट पूर्णपणे रद्द करण्यात यावी, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुधारित किमान वेतनातील १० ऑगस्ट २०२० पासून ते मार्च २०२२ पर्यंतची थकित फरकाची रक्कम तात्काळ अदा करण्यात यावी, अशा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. ग्रामपंचायत कर्मचारी हे सफाई कामगार, पाणीपुरवठा कामगार, वीज पुरवठा कामगार, कर वसुली कर्मचारी, लिपिक अशा विविध काम करीत आहेत. मात्र, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहे.

हे प्रश्न निकाली काढावेत म्हणून सोमवारपासून आंदोलन सुरु करण्यात आले आहे. २९ फेब्रुवारीपर्यंत आंदोलन सुरु राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. आंदोलनात महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचे राज्य सरचिटणीस दयानंद येरंडे, मराठवाडा अध्यक्ष नवनाथ नरवडे, जिल्हाध्यक्ष सतीश मस्के, जिल्हा उपाध्यक्ष गोविंद लोभे, सचिव किशोर मस्ने, सहसचिव मंगेश जाधव आदी सहभागी झाले आहेत.

टॅग्स :laturलातूरagitationआंदोलन