शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

लातूर जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या इमारती खिळखिळ्या; भिंती, छताकडे पाहत गावचा कारभार!

By हरी मोकाशे | Updated: August 23, 2023 17:48 IST

नवीन इमारतींसाठी पदाधिकाऱ्यांची धावाधाव

लातूर : प्रत्येक गावचा आत्मा ही ग्रामपंचायत असते. त्यामुळे विविध कामानिमित्ताने गावातील नागरिकांची सतत वर्दळ असते. मात्र, जिल्ह्यातील १७२ गावांतील ग्रामपंचायतीच्या इमारती जीर्ण होऊन त्या मोडकळीस आल्या आहेत. परिणामी, गाव कारभाऱ्यांना खिळखिळ्या इमारतींच्या भिंती अन् छताकडे पाहत गावचा कारभार हाकावा लागत आहे.

गावासह वाडी- वस्ती, तांड्यांच्या विकासासाठी ग्रामपंचायत ही केंद्रबिंदू आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावच्या विकासाची ध्येय- धोरणे ठरविली जातात. गावातील नागरिकांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्याचे काम ग्रामपंचायतींद्वारे होते. प्रत्येक ग्रामपंचायत ही अधिक सक्षम व्हावी म्हणून शासनाच्या वतीने विविध प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक गावांच्या सर्वांगिण विकासासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

गेल्या काही वर्षांपासून १५ व्या वित्त आयोगातून कोट्यवधीचा निधी हा थेट ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा होत आहे. मात्र, जिल्ह्यातील ४४ गावांत सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामसेवकांना बसण्यासाठी ग्रामपंचायतीस इमारत नाही. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील १७२ ग्रामपंचायतीच्या इमारती जीर्ण झाल्या असून त्या मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे तिथे बसण्यास गाव कारभाऱ्यांचा जीव धजावत नाही.

४४ गावांमध्ये ग्रामपंचायतीसाठी इमारत नाही...जिल्ह्यात एकूण ७८६ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी १७२ गावांतील ग्रामपंचायतीच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. तसेच ४४ ग्रामपंचायतींसाठी इमारत नाही. त्यात लातूर- ५, औसा- १०, निलंगा- ९, देवणी- ४, उदगीर- १०, अहमदपूर- ३, चाकूर - २ आणि रेणापूर तालुक्यातील एका गावात ग्रामपंचायतीची इमारत नाही.

इमारतीसाठी पाठपुरावा...गावात ग्रामपंचायतीची इमारत आहे. मात्र, ती फार जुनी आहे. त्यामुळे मोडकळीस आली आहे. काही वेळेस छताचा गिलावा गळत आहे तर भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या इमारतीत बसण्यासाठीही भीती वाटत आहे. नवीन इमारत बांधण्यात यावी म्हणून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे, असे सरपंच, उपसरपंचांनी सांगितले.

लवकरच अडचण दूर...आझादी का अमृत महोत्सवनिमित्ताने जिल्ह्यातील ७५ गावांमध्ये ग्रामपंचायतींसाठी नव्या इमारती बांधण्यात येणार आहेत. तसेच १५ व्या वित्त आयोेगातूनही काही इमारती बांधल्या जाणार आहेत. त्यासाठी प्रक्रिया पूर्ण अंतिम टप्प्यात आहे. लवकरच अडचण दूर होईल.- दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत.

निलंग्यातील सर्वाधिक इमारती जीर्ण...तालुका - ग्रामपंचायती - जीर्ण इमारतीलातूर - १११ - २४औसा - १०९- २६निलंगा - ११६ - २७शिरुर अनं.- ४२ - ०९देवणी - ४५ - ११उदगीर- ८७ - १८जळकोट - ४३ - ०८अहमदपूर - ९७ - १९चाकूर - ७१ - १४रेणापूर - ६५ - १६एकूण - ७८६ - १७२

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतlaturलातूर