शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
5
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
6
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
7
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
8
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
9
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
10
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
11
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
12
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
13
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
14
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
15
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
16
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
17
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
18
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
19
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
20
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...

लातूर जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या इमारती खिळखिळ्या; भिंती, छताकडे पाहत गावचा कारभार!

By हरी मोकाशे | Updated: August 23, 2023 17:48 IST

नवीन इमारतींसाठी पदाधिकाऱ्यांची धावाधाव

लातूर : प्रत्येक गावचा आत्मा ही ग्रामपंचायत असते. त्यामुळे विविध कामानिमित्ताने गावातील नागरिकांची सतत वर्दळ असते. मात्र, जिल्ह्यातील १७२ गावांतील ग्रामपंचायतीच्या इमारती जीर्ण होऊन त्या मोडकळीस आल्या आहेत. परिणामी, गाव कारभाऱ्यांना खिळखिळ्या इमारतींच्या भिंती अन् छताकडे पाहत गावचा कारभार हाकावा लागत आहे.

गावासह वाडी- वस्ती, तांड्यांच्या विकासासाठी ग्रामपंचायत ही केंद्रबिंदू आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावच्या विकासाची ध्येय- धोरणे ठरविली जातात. गावातील नागरिकांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्याचे काम ग्रामपंचायतींद्वारे होते. प्रत्येक ग्रामपंचायत ही अधिक सक्षम व्हावी म्हणून शासनाच्या वतीने विविध प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक गावांच्या सर्वांगिण विकासासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

गेल्या काही वर्षांपासून १५ व्या वित्त आयोगातून कोट्यवधीचा निधी हा थेट ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा होत आहे. मात्र, जिल्ह्यातील ४४ गावांत सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामसेवकांना बसण्यासाठी ग्रामपंचायतीस इमारत नाही. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील १७२ ग्रामपंचायतीच्या इमारती जीर्ण झाल्या असून त्या मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे तिथे बसण्यास गाव कारभाऱ्यांचा जीव धजावत नाही.

४४ गावांमध्ये ग्रामपंचायतीसाठी इमारत नाही...जिल्ह्यात एकूण ७८६ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी १७२ गावांतील ग्रामपंचायतीच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. तसेच ४४ ग्रामपंचायतींसाठी इमारत नाही. त्यात लातूर- ५, औसा- १०, निलंगा- ९, देवणी- ४, उदगीर- १०, अहमदपूर- ३, चाकूर - २ आणि रेणापूर तालुक्यातील एका गावात ग्रामपंचायतीची इमारत नाही.

इमारतीसाठी पाठपुरावा...गावात ग्रामपंचायतीची इमारत आहे. मात्र, ती फार जुनी आहे. त्यामुळे मोडकळीस आली आहे. काही वेळेस छताचा गिलावा गळत आहे तर भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या इमारतीत बसण्यासाठीही भीती वाटत आहे. नवीन इमारत बांधण्यात यावी म्हणून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे, असे सरपंच, उपसरपंचांनी सांगितले.

लवकरच अडचण दूर...आझादी का अमृत महोत्सवनिमित्ताने जिल्ह्यातील ७५ गावांमध्ये ग्रामपंचायतींसाठी नव्या इमारती बांधण्यात येणार आहेत. तसेच १५ व्या वित्त आयोेगातूनही काही इमारती बांधल्या जाणार आहेत. त्यासाठी प्रक्रिया पूर्ण अंतिम टप्प्यात आहे. लवकरच अडचण दूर होईल.- दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत.

निलंग्यातील सर्वाधिक इमारती जीर्ण...तालुका - ग्रामपंचायती - जीर्ण इमारतीलातूर - १११ - २४औसा - १०९- २६निलंगा - ११६ - २७शिरुर अनं.- ४२ - ०९देवणी - ४५ - ११उदगीर- ८७ - १८जळकोट - ४३ - ०८अहमदपूर - ९७ - १९चाकूर - ७१ - १४रेणापूर - ६५ - १६एकूण - ७८६ - १७२

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतlaturलातूर