शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

सरकारची काटकसर; पूरक पोषण आहारात तेलाऐवजी साखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:15 IST

लातूर : दिवसेंदिवस महागाई वाढत असून, खाद्यतेलाचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे शासनाने काटकसर सुरू केली असून, पूरक ...

लातूर : दिवसेंदिवस महागाई वाढत असून, खाद्यतेलाचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे शासनाने काटकसर सुरू केली असून, पूरक पोषण आहारातील कोरड्या शिध्यात बदल केला आहे. परिणामी, लाभार्थ्यांना चार महिन्यांपासून खाद्यतेलाऐवजी एक किलो साखर देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, हा बदल करताना प्रथिने, कॅलरीज मिळत असले तरी पोषण आहाराला खाद्यतेलाविनाच फोडणी द्यावी लागत आहे.

पूरक पोषण योजनेअंतर्गत जिल्ह्यात १ लाख ७५ हजार ३०५ लाभर्थी आहेत. यामध्ये सहा महिने ते तीन वर्षे वयोगटांतील ६५ हजार ९८१, तीन महिने ते सहा वर्षे वयोगटातील ८१ हजार ९८१, तर १३ हजार ५९३ गरोदरमाता आहेत, तर १३ हजार ७४१ स्तनदा माता असून, लॉकडाऊनच्या काळातही घरपोच कोरडा शिधा दिला जात आहे. दरम्यान, दिवसेंदिवस महागाई वाढत असून, खाद्यतेलाच्या वाढत्या दरामुळे पूरक पोषण आहारात तेलाऐवजी साखर दिली जात असल्याने लाभार्थ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

फोडणी कशी द्यायची

गेल्या चार महिन्यांपासून तेलाऐवजी साखर दिली जात आहे. त्यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, शासनाने गरोदर माता आणि स्तनदा मातांचा विचार करून नियमितपणे अर्धा लिटर तेल पूर्वीप्रमाणे द्यावे.

- अनिता कांबळे

पूरक पोषण आहारामध्ये बदल करण्यात आल्याने तेलाऐवजी साखर मिळत आहे. कोरोनामुळे आधीच लॉकडाऊन आहे. त्यात आर्थिक उत्पन्न नाही. कोरडा शिधा मिळत होता. त्यातही आता तेल गायब झाले आहे.

- वैष्णवी शिंदे

लहान मुलांना पोषण आहार दिला जात आहे. मात्र त्यामध्ये आता तेल बंद करण्यात आले आहे. त्याऐवजी साखर दिली जात आहे. शासनाने याबाबत पुनर्विचार करण्याची गरज असून, लाभार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच तेल द्यावे. म्हणजे गैरसोय दूर होईल.

- ऋषिकेश कांबळे

शासनाच्या निर्णयानुसार वाटप

चार महिन्यांपासून शासनाने खाद्यतेलाऐवजी साखर देण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार पोषण आहाराचे साहित्य उपलब्ध होत आहे. सदरील साहित्याचे नियोजितपणे वाटप केले जात आहे. लाभार्थ्यांच्या तक्रारी नाहीत. शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसारच लाभार्थ्यांना पूरक पोषण आहाराचे साहित्य पोहोच केले जात आहे. यासाठी कोरोना नियमांची पुरेपूर अंमलबजावणी केली जात आहे.

- देवदत्त गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी

पूरक पोषण आहार योजना

एकूण लाभार्थी १,७५,३०५

६ ते ३ वर्षे वयोगट लाभार्थी : ६५,९८९

गरोदर महिला : १३,५९६

स्तनदा माता : १३७४१

वितरण करताना नियमांचे पालन

जिल्ह्यात जवळपास १ लाख ७५ हजार ३०५ लाभार्थी आहेत. त्यांना सकस आहार मिळावा आणि सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने पूरक पोषण आहार दिला जातो. यामध्ये गहू, तांदूळ, मूग दाळ, हरभरा डाळ, मीठ, हळदी, मिरची आणि गोडतेलाचा समावेश होता. मात्र आता गोडतेल पूरक पोषण आहारातून गायब झाले आहे.