शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील गुड मार्निंग पथके गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:23 IST

अहमदपूर : अस्वच्छता, दुर्गंधीमुळे विविध आजार उद्भवतात. त्यामुळे गाव व गावचा परिसर स्वच्छ रहावा म्हणून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ...

अहमदपूर : अस्वच्छता, दुर्गंधीमुळे विविध आजार उद्भवतात. त्यामुळे गाव व गावचा परिसर स्वच्छ रहावा म्हणून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहराबरोबरच ग्रामीण भागात घरोघरी स्वच्छतागृह बांधण्यात आले. त्याचा नागरिकांनी वापर करावा म्हणून विविध प्रयत्न करण्यात आले. याशिवाय, सकाळच्या वेळी उघड्यावर प्रातर्विधीसाठी जाणा-यांना रोखण्यासाठी गावोगावी गुडमॉर्निंग पथके नियुक्त करण्यात आली. परंतु, सध्या ही पथक गायब असल्याने ग्रामीण भागातील नागरिक शौचासाठी उघड्यावर जात असल्याचे दिसून येत आहे.

कुठलाही आजार हा अस्वच्छतेमुळे होतो. त्यामुळे स्वच्छता रहावी तसेच नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे. साथीचे आजार पसरू नयेत म्हणून केंद्र शासनाने स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालय बांधण्यासाठी जनजागृती करण्यात आली. तसेच घरोघरी शौचालय बांधण्याकरिता अनुदान देण्यात आले. त्यामुळे घरोघरी शौचालय बांधण्यात आले. परंतु, सध्या बहुतांश नागरिक स्वच्छतागृहाचा वापर करीत नसल्याचे पहावयास मिळत आहे. तालुक्यातील बहुतांश गावांत प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.

स्वच्छता अभियानच्या सुरुवातीच्या काळात सकाळी उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना रोखण्यासाठी गुडमॉर्निंग पथकाची स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांना धास्ती बसली होती. परिणामी, नागरिक शौचालयाचा वापर करीत होते.

परंतु, स्थानिक प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याने उघड्यावर प्रात:विधीसाठी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच गुडमॉर्निंग पथक स्थापन करावेत आणि दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

शासनाच्या अनुदानातून तालुक्यातील प्रत्येक घरात स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. परंतु, त्याचा वापर होत नाही. सध्या तालुक्यात डेंग्यू, मलेरियासारखे आजार वाढले आहेत. त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी गर्दी होत आहे. अशा परिस्थितीत गावात स्वच्छता राखण्यासाठी ग्रामपंचायतींनी गुड मॉर्निंग पथक स्थापन करणे गरजेचे ठरत आहे.

स्वच्छतागृहात भंगार साहित्य...

वैयक्तिक शौचालयासाठी शासनाकडून लाभार्थ्यास १२ हजारांचे अनुदान देण्यात आले. हे अनुदान मिळविण्यासाठी काहींनी स्वच्छतागृहाच्या चार भिंती उभारल्या. कागदोपत्री शौचालय उभारल्याचे दाखवून अनुदान मिळविले आहे. तसेच काहीजण शौचालय बांधले असले तरी त्याचा वापर हा भंगार साहित्य, जळतण ठेवण्यासाठी करीत असल्याचे दिसून येत आहे.

ग्रामसेवकांना सूचना करु...

ज्या गावातील नागरिक उघड्यावर शौचास जात आहेत, त्या गावातील ग्रामसेवकांना सूचना करण्यात येईल. गावात तात्काळ गुड मॉर्निंग पथक स्थापन करून कोणीही उघड्यावर शौचास जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना केल्या जातील, असे गटविकास अधिकारी अमोलकुमार आंदेलवाड यांनी सांगितले.