शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

५६ शिक्षकांना गौरवाची प्रतीक्षा; दोन वर्षांपासून आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा रखडला

By हरी मोकाशे | Updated: September 8, 2022 15:09 IST

दरवर्षी पंचायत समिती व गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील प्रत्येक केंद्रातून दोन अशा १४ केंद्रांतील २८ शिक्षकांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो.

औसा (जि. लातूर) : औसा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा दोन वर्षांपासून रखडला आहे. त्यामुळे पुरस्कार जाहीर झालेल्या ५६ शिक्षकांना गौरवाची प्रतीक्षा लागली आहे. तालुक्यातील शिक्षकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

दरवर्षी पंचायत समिती व गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील प्रत्येक केंद्रातून दोन अशा १४ केंद्रांतील २८ शिक्षकांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. मात्र, कोविडच्या प्रादुर्भावाच्या अगोदरपासून पुरस्कार वितरणासाठी पदाधिकारी व अधिकाऱ्यांत उत्सुकता नसल्याचे दिसून येत आहे. राजकीय हेवेदावे, मानपान अशा विविध कारणांमुळे वर्षअखेरीस पुरस्कार वितरण होते. परंतु, मागील दोन वर्षांत काही कारणास्तव शिक्षकांचा गौरव सोहळा झाला नाही. त्यामुळे पुरस्कार जाहीर झालेल्या शिक्षकांमध्ये असलेली आतुरता कमी झाल्याचे पहावयास मिळत आहे.

प्रस्ताव सादर करणाऱ्या शिक्षकांतही नाराजी पसरली आहे. सुरुवातीस कोविडच्या निर्बंधामुळे आणि त्यानंतर पुरस्कार वितरणासाठी आवश्यक निधी पंचायत समितीकडून उपलब्ध झाला नसल्याने सन्मान सोहळा झाला नाही. यंदा तिन्ही वर्षाचे पुरस्कार वितरण सोहळा एकत्र घेतला जाणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी अनुपमा भंडारी यांनी सांगितले. दरम्यान, अधिकारी व पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत राजकारणाचा फटका शिक्षकांना बसल्याचे ऐकावयास मिळत आहे.

पुरस्कारासाठी बैठकही झाली होती...सन २०२१- २२ या वर्षातील तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणासंदर्भात झालेल्या बैठकीत निधीची विशेष तरतूद केली. तसेच तत्कालीन पदाधिकारी व सदस्यांनी स्वच्छेने ५ ते १० हजार देणार असल्याचे सांगितले. त्यानुसार नियोजन ठरले. शिक्षक संघटनांनीही होकार दिला. शिक्षकांची निवड झाली. दरम्यान, अधिकाऱ्यांनी निधी नसल्याचे सांगितले. मात्र, ते चुकीचे आहे. आजही सभेच्या प्रोसिंडिंग बुकमध्ये त्याचा उल्लेख दिसेल, असे भाजपाचे तत्कालिन गटनेते दीपक चाबुकस्वार व माजी उपसभापती रेखा नागराळे यांनी सांगितले.

पुरस्कारामुळे शिक्षकांना प्रोत्साहन...शिक्षकदिनी अथवा सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाला वेगळे महत्त्व आहे. पुरस्कारामुळे शिक्षकांना आणखीन काम करण्याची उर्जा, प्रोत्साहन मिळते. शिक्षकांच्या कामाचा गौरव वेळेवर झाल्यास त्याला महत्त्व राहते. तीन- तीन वर्षे पुरस्कार न मिळाल्याने इच्छुक शिक्षकही नाउमेद होतात, असे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिवलिंग नागापुरे यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरTeacherशिक्षक