शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

घरणी- साकोळच्या जलसाठ्यावर होणार २ हजार ६७२ हेक्टर्सचे सिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:16 IST

शिरुर अनंतपाळ : तालुक्यातील घरणी आणि साकोळ मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले असल्याने पाटबंधारे विभागाच्या वतीने सन २०२०- २०२१ ...

शिरुर अनंतपाळ : तालुक्यातील घरणी आणि साकोळ मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले असल्याने पाटबंधारे विभागाच्या वतीने सन २०२०- २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या रब्बी हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. कालवा सल्लागार समितीची बैठक घेण्यात येऊन २ हजार ६७२ हेक्टर्सचे सिंचन पाणी वापर संस्थाच्या मदतीने करण्यात येणार असल्याचे नियोजन येथील पाटबंधारे उपविभागीय कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

शिरुर अनंतपाळ तालुक्यातील घरणी, साकोळ, पांढरवाडी, डोंगरगाव हे चारही प्रकल्प यंदा शंभर टक्के पूर्ण क्षमतेने भरले आहेत. घरणी आणि साकोळच्या पाणी साठ्यावर सन २०२०- २०२१ च्या रब्बी हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ए.एन. मदने यांच्या अध्यक्षतेखाली येथील अनंतपाळ नूतन विद्यालयात पाणी पुरवठा सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी ॲड. संभाजीराव पाटील, ॲड. विश्वंभराव माने, प्रभाकरराव कुलकर्णी, नामदेवराव जगताप, विठ्ठल उंबरगे, उपविभागीय अभियंता गोरख जाधव, शाखाधिकारी पी.व्ही. पाटील, मंडळ कृषी अधिकारी बी.एस. गाढवे, नितीन जुंबड, संग्राम डोंगरे यांची उपस्थिती होती.

यावेळी कालवा आणि साठा सिंचन करण्यासाठी पाणी वापर संस्थांनी मदत केल्यास पाटबंधारे विभाग सिंचनाचे नियोजन करू शकते, अशी भूमिका गोरख जाधव यांनी मांडली. त्यामुळे पाणी वापर संस्थानी मदत करण्याची हमी दिली. २ हजार ६७२ हेक्टर्सवर सिंचन योजना राबविण्यात येऊन रब्बी हंगाम यशस्वी करण्यात येणार आहे. यावेळी विठ्ठल पाटील, जगदीश सूर्यवंशी, विठ्ठल शिंदे, अण्णाराव जाधव, माधव शिरुरे, बबन जाधव, गणेश पेठे, सद्विवेक मिरकले, शिवा डोंगरे, अंगद माने, पंडित लवटे, सुरेश पेठे आदींची उपस्थिती होती.

कालवा सिंचनाचे दोन आवर्तन...

रब्बी हंगामासाठी घरणी धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्याद्वारे सिंचनाच्या दोन फेऱ्या घेण्यात येणार असून कालवा सिंचनाच्या माध्यमातून ६३७ हेक्टरचे सिंचन करण्यात येणार आहे. घरणी आणि साकोळच्या पाणीसाठ्यावर २ हजार ३५ हेक्टर्स अशा एकूण २ हजार ६७२ हेक्टर्सचे सिंचन नियोजन करण्यात आले आहे.

घरणी प्रकल्पाचे उजवा आणि डावा असे दोन कालवे असून, दोन्ही कालव्याचे महिनाभराच्या अंतराने दोन आवर्तन घेण्यात येणार आहेत. त्यासाठी चंद्रहास माने, राजेंद्र पांचाळ, मनोज जामगे, एस.पी. केजकर, अंजना होळकर, बस्वराज बिराजदार, बी.एम. मरे, गोविंद मोरे आदींनी पुढाकार घेतला आहे.