शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

पाण्यासाठी नगरपंचायतीवर घागर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:25 IST

शिरूर-अनंतपाळ शहरास घरणी धरणावरून पाणी पुरवठा होतो. ऐन पावसाळ्यात पाणी पुरवठ्याची यंत्रणा कोलमडली आहे. त्यामुळे पंधरा दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा ...

शिरूर-अनंतपाळ शहरास घरणी धरणावरून पाणी पुरवठा होतो. ऐन पावसाळ्यात पाणी पुरवठ्याची यंत्रणा कोलमडली आहे. त्यामुळे पंधरा दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. शहराचा पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा, अशी मागणी विविध प्रभागातील नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभागाकडे वेळोवेळी करून निवेदन दिले. परंतु, त्याकडे नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाने दुर्लक्ष केले. त्यामुळे पंधरा दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. नागरिकांना घागरभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नगरपंचायत प्रशासनाच्या अशा कारभाराचा निषेध करण्यासाठी सोमवारी शहरातील विविध प्रभागातील नागरिक, महिला, युवकांनी येथील महात्मा बसवेश्वर चौकातून मुख्य रस्त्याने रिकाम्या घागरी घेऊन नगरपंचायतीवर घागर मोर्चा काढला. यावेळी नागरिकांनी नगरपंचायत कार्यालयासमोर ठिय्या मांडून रिकाम्या घागरी उलट्या दिशेने उंचावत प्रशासनाचा निषेध केला. यावेळी अशोक कोरे, बाबूराव तोरणे, आनंदा कामगुंडा, गोपाळ हंद्राळे, अनंत काळे, अमर आवाळे, औदुंबर सिंदाळकर, उदय बावगे, पांडुरंग ऐतनबोने, सुलभा ऐतनबोने, संदीप धुमाळे, गोविंद श्रीमंगल, संभाजी हत्तरगे, महादेव खरटमोल, सचिन गुगळे, शुभम ऐतनबोने, प्रसाद शिवणे, महादेव आवाळे, विठ्ठल चाळकीकर, हणमंत जगताप, मकबुल तांबोळी, यश दुरूगकर, सुचित लासुने, उदय बावगे, केदार लोंढे, सतीश शिवणे आदींची उपस्थिती होती.

पाणीपुरवठा लवकर सुरू करा...

शिरूर-अनंतपाळ शहरासाठी घरणी प्रकल्पावरून लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा. अन्यथा पुन्हा हालगी नाद मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागास देण्यात आलेल्या लेखी निवेदनात दिला आहे.

विद्युत जोडणीसाठी महावितरणला पत्र...

घरणी प्रकल्पावरून शिरूर-अनंतपाळ शहरासह विविध पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे इतर गावातील पाणी पुरवठा योजनेचे वीजबिल थकित आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यासाठी नगरपंचायतच्यावतीने महावितरणला पत्र देऊन शिरूर-अनंतपाळचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी केल्याचे पाणी पुरवठा अभियंता व्ही. एस. विभुते, सोमनाथ जांगठे यांनी सांगितले.