शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

तिरूच्या डाव्या, उजव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी लवकरच निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:23 IST

तिरु मध्यम प्रकल्पाच्या माध्यमातून या भागातील १० ते १२ गावांतील सिंचन क्षेत्र वाढावे म्हणून प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्याच्या ...

तिरु मध्यम प्रकल्पाच्या माध्यमातून या भागातील १० ते १२ गावांतील सिंचन क्षेत्र वाढावे म्हणून प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्याच्या विशेष दुरुस्ती करण्याची मागणी मंगरूळचे सरपंच तथा सरपंच संघटनेचे अध्यक्ष महेताब बेग यांनी राज्यमंत्री संजय बनसोडे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. दरम्यान, कालव्याच्या विशेष दुरुस्तीचा प्रस्ताव संबंधित विभागाकडून राज्य शासनाकडे सादर करण्यात आला होता.

या दोन्ही कालव्यांची विशेष दुरुस्ती झाल्यास मंगरूळ, लाळी खु., लाळी बु., बेळसांगवी, येवरी, वाढवणा खु., वाढवणा बु., बोरगाव, शिवणखेड आदी गावांतील शेतकऱ्यांच्या शेतीला या पाण्याचा लाभ होईल. त्यातून शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत होण्यास मदत होणार आहे, अशी मागणी महेताब बेग यांनी केली होती. त्यामुळे जलसंपदा अधिकाऱ्यांची विशेष बैठक झाली होती. तेव्हा तिरु प्रकल्पाच्या कालवा दुरुस्तीचा प्रस्ताव, वितरण प्रणालीद्वारे सिंचनाचा प्रस्तावावर अभ्यास करण्याबरोबर सर्वेक्षण, अंदाजपत्रकाची कार्यवाही करण्यात आली आहे. येत्या दोन महिन्यात सर्वेक्षण पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सर्वेक्षणाचे काम पूर्ण होताच सर्वसमावेशक प्रकल्प अहवाल मंजुरीसाठी सादर करण्यात येईल. सर्व बाबींचा अभ्यास करून प्रकल्पाच्या पुढील कामास सुरुवात करण्यात येईल, असे संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

जळकोट येथे सिंचन विभागाचे उपविभागीय कार्यालय सुरू करण्याचे निर्देश राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले आहे. या दोन्ही कालव्याचे काम सुरू झाल्यास सिंचन क्षेत्र वाढेल. तसेच पिण्याच्या पाणी सोय होण्यास मदत होईल. जमिनीतील पाणी पातळी वाढेल. या बाबींचा विचार करून या प्रस्तावास हिरवा कंदील दाखविला असल्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे व सरपंच महेताब बेग यांनी सांगितले.