शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

तिरूच्या डाव्या, उजव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी लवकरच निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:23 IST

तिरु मध्यम प्रकल्पाच्या माध्यमातून या भागातील १० ते १२ गावांतील सिंचन क्षेत्र वाढावे म्हणून प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्याच्या ...

तिरु मध्यम प्रकल्पाच्या माध्यमातून या भागातील १० ते १२ गावांतील सिंचन क्षेत्र वाढावे म्हणून प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्याच्या विशेष दुरुस्ती करण्याची मागणी मंगरूळचे सरपंच तथा सरपंच संघटनेचे अध्यक्ष महेताब बेग यांनी राज्यमंत्री संजय बनसोडे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. दरम्यान, कालव्याच्या विशेष दुरुस्तीचा प्रस्ताव संबंधित विभागाकडून राज्य शासनाकडे सादर करण्यात आला होता.

या दोन्ही कालव्यांची विशेष दुरुस्ती झाल्यास मंगरूळ, लाळी खु., लाळी बु., बेळसांगवी, येवरी, वाढवणा खु., वाढवणा बु., बोरगाव, शिवणखेड आदी गावांतील शेतकऱ्यांच्या शेतीला या पाण्याचा लाभ होईल. त्यातून शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत होण्यास मदत होणार आहे, अशी मागणी महेताब बेग यांनी केली होती. त्यामुळे जलसंपदा अधिकाऱ्यांची विशेष बैठक झाली होती. तेव्हा तिरु प्रकल्पाच्या कालवा दुरुस्तीचा प्रस्ताव, वितरण प्रणालीद्वारे सिंचनाचा प्रस्तावावर अभ्यास करण्याबरोबर सर्वेक्षण, अंदाजपत्रकाची कार्यवाही करण्यात आली आहे. येत्या दोन महिन्यात सर्वेक्षण पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सर्वेक्षणाचे काम पूर्ण होताच सर्वसमावेशक प्रकल्प अहवाल मंजुरीसाठी सादर करण्यात येईल. सर्व बाबींचा अभ्यास करून प्रकल्पाच्या पुढील कामास सुरुवात करण्यात येईल, असे संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

जळकोट येथे सिंचन विभागाचे उपविभागीय कार्यालय सुरू करण्याचे निर्देश राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले आहे. या दोन्ही कालव्याचे काम सुरू झाल्यास सिंचन क्षेत्र वाढेल. तसेच पिण्याच्या पाणी सोय होण्यास मदत होईल. जमिनीतील पाणी पातळी वाढेल. या बाबींचा विचार करून या प्रस्तावास हिरवा कंदील दाखविला असल्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे व सरपंच महेताब बेग यांनी सांगितले.