शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लातूरच्या अपना ग्रुपकडून दररोज ३०० जणांना मोफत जेवण; पहाटे ३ पर्यंत घरपोच डबा

By आशपाक पठाण | Updated: April 6, 2024 20:57 IST

रमजान विशेष - आलमपुरा चौकात दररोज रात्री ९ वाजण्याच्या सुमारास स्वयंपाकाला सुरुवात केली जाते, पहाटे ३ वाजेपर्यंत स्वयंपाक तयार होतो. 

लातूर : रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लीम समाजाकडून अधिकचा सेवाभाव जोपासला जातो. यानिमित्त रोजा (उपवास) करणाऱ्यांना पहाटेच्या जेवणाची सोय नसलेल्या नागरिकांना घरपोच मोफत डबा पुरविण्याचे काम केले जात आहे. लातूर शहरातील अंबाजोगाई रोडवर असलेल्या रेणापूर नाका येथे अपना नाका ग्रुपच्या वतीने दररोज ३०० जणांना घरपाेच मोफत जेवण पुरविण्याचे काम केले जात आहे. त्यांचा हा उपक्रम मागील दहा वर्षांपासून सुरू आहे.

शैक्षणिक शहर म्हणून ओळख असलेल्या लातूरमध्ये रमजान महिन्यात अनेक मुलांना पहाटेच्या सहेरची व्यवस्था होत नाही. ही बाब लक्षात आल्याने अपना ग्रुपच्या सदस्यांनी २०१२ मध्ये काही विद्यार्थ्यांना डबे पोहचविण्याचे काम सुरू केले होते. त्यानंतर दरवर्षी याला प्रतिसाद वाढत गेला. ग्रुपसोबत अनेक तरुणही जाेडले गेले. मागील तीन वर्षांत डब्याची मागणी वाढल्याने सर्वांना वेळेत डबा पुरविण्याचे नियोजन केले जात आहे. आलमपुरा चौकात दररोज रात्री ९ वाजण्याच्या सुमारास स्वयंपाकाला सुरुवात केली जाते, पहाटे ३ वाजेपर्यंत स्वयंपाक तयार होतो.  त्यानंतर १० मुले दररोज दुचाकीवर हॉस्पिटल, ट्युशन एरिया, तसेच अनेक गरजूंना घरपोच डबा देऊन येतात, असे ग्रुपचे असद मामू, सय्यद रियाज खतीब, मिनहाज खान, जाकेर शेख यांनी सांगितले.

चौघांनी केली होती सुरुवात...

गरजूंना पहाटेच्या वेळी डबा देण्याची सुरुवात अपना नाका ग्रुपचे असद मामू, रियाज खतीब, मिनहाज खान, जाकेर शेख यांनी १० ते १२ वर्षांपूर्वी केली होती. कोराेनानंतर ग्रुपच्या वतीने रमजान महिन्यात यासंदर्भात जनजागृती करण्यात आल्यानंतर मागणी वाढली. यावर्षी दररोज ३०० डबे घरपोच दिले जात असल्याचे सांगण्यात आले. केवळ ईश्वर सेवा म्हणून हा उपक्रम राबविला जात असून, रमजान महिन्यात कोणीही उपाशीपोटी सहेर (उपवास) करू नये, एवढीच यामागची भावना असल्याचे त्यांनी सांगितले.

चपाती, भात, भाजीचा ताजा स्वयंपाक...दररोज चपाती, एक सुकी भाजी, वरण, भात व अन्य भाजी डब्यात दिली जाते. जेवण बनविण्यासाठी लागणारे साहित्य ताजे असते. जेवणावर विशेष लक्ष दिले जाते. जवळपास ५० स्वयंसेवक दररोज यासाठी राबतात. शहरात अनेक ठिकाणी फलक लावले आहेत, आमच्याकडे कोणी संपर्क केला की, त्यांना डबा घरपोच देण्यात येत असल्याचे रियाज खतीब यांनी सांगितले.