शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

लातूरच्या अपना ग्रुपकडून दररोज ३०० जणांना मोफत जेवण; पहाटे ३ पर्यंत घरपोच डबा

By आशपाक पठाण | Updated: April 6, 2024 20:57 IST

रमजान विशेष - आलमपुरा चौकात दररोज रात्री ९ वाजण्याच्या सुमारास स्वयंपाकाला सुरुवात केली जाते, पहाटे ३ वाजेपर्यंत स्वयंपाक तयार होतो. 

लातूर : रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लीम समाजाकडून अधिकचा सेवाभाव जोपासला जातो. यानिमित्त रोजा (उपवास) करणाऱ्यांना पहाटेच्या जेवणाची सोय नसलेल्या नागरिकांना घरपोच मोफत डबा पुरविण्याचे काम केले जात आहे. लातूर शहरातील अंबाजोगाई रोडवर असलेल्या रेणापूर नाका येथे अपना नाका ग्रुपच्या वतीने दररोज ३०० जणांना घरपाेच मोफत जेवण पुरविण्याचे काम केले जात आहे. त्यांचा हा उपक्रम मागील दहा वर्षांपासून सुरू आहे.

शैक्षणिक शहर म्हणून ओळख असलेल्या लातूरमध्ये रमजान महिन्यात अनेक मुलांना पहाटेच्या सहेरची व्यवस्था होत नाही. ही बाब लक्षात आल्याने अपना ग्रुपच्या सदस्यांनी २०१२ मध्ये काही विद्यार्थ्यांना डबे पोहचविण्याचे काम सुरू केले होते. त्यानंतर दरवर्षी याला प्रतिसाद वाढत गेला. ग्रुपसोबत अनेक तरुणही जाेडले गेले. मागील तीन वर्षांत डब्याची मागणी वाढल्याने सर्वांना वेळेत डबा पुरविण्याचे नियोजन केले जात आहे. आलमपुरा चौकात दररोज रात्री ९ वाजण्याच्या सुमारास स्वयंपाकाला सुरुवात केली जाते, पहाटे ३ वाजेपर्यंत स्वयंपाक तयार होतो.  त्यानंतर १० मुले दररोज दुचाकीवर हॉस्पिटल, ट्युशन एरिया, तसेच अनेक गरजूंना घरपोच डबा देऊन येतात, असे ग्रुपचे असद मामू, सय्यद रियाज खतीब, मिनहाज खान, जाकेर शेख यांनी सांगितले.

चौघांनी केली होती सुरुवात...

गरजूंना पहाटेच्या वेळी डबा देण्याची सुरुवात अपना नाका ग्रुपचे असद मामू, रियाज खतीब, मिनहाज खान, जाकेर शेख यांनी १० ते १२ वर्षांपूर्वी केली होती. कोराेनानंतर ग्रुपच्या वतीने रमजान महिन्यात यासंदर्भात जनजागृती करण्यात आल्यानंतर मागणी वाढली. यावर्षी दररोज ३०० डबे घरपोच दिले जात असल्याचे सांगण्यात आले. केवळ ईश्वर सेवा म्हणून हा उपक्रम राबविला जात असून, रमजान महिन्यात कोणीही उपाशीपोटी सहेर (उपवास) करू नये, एवढीच यामागची भावना असल्याचे त्यांनी सांगितले.

चपाती, भात, भाजीचा ताजा स्वयंपाक...दररोज चपाती, एक सुकी भाजी, वरण, भात व अन्य भाजी डब्यात दिली जाते. जेवण बनविण्यासाठी लागणारे साहित्य ताजे असते. जेवणावर विशेष लक्ष दिले जाते. जवळपास ५० स्वयंसेवक दररोज यासाठी राबतात. शहरात अनेक ठिकाणी फलक लावले आहेत, आमच्याकडे कोणी संपर्क केला की, त्यांना डबा घरपोच देण्यात येत असल्याचे रियाज खतीब यांनी सांगितले.