शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

लातूरच्या अपना ग्रुपकडून दररोज ३०० जणांना मोफत जेवण; पहाटे ३ पर्यंत घरपोच डबा

By आशपाक पठाण | Updated: April 6, 2024 20:57 IST

रमजान विशेष - आलमपुरा चौकात दररोज रात्री ९ वाजण्याच्या सुमारास स्वयंपाकाला सुरुवात केली जाते, पहाटे ३ वाजेपर्यंत स्वयंपाक तयार होतो. 

लातूर : रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लीम समाजाकडून अधिकचा सेवाभाव जोपासला जातो. यानिमित्त रोजा (उपवास) करणाऱ्यांना पहाटेच्या जेवणाची सोय नसलेल्या नागरिकांना घरपोच मोफत डबा पुरविण्याचे काम केले जात आहे. लातूर शहरातील अंबाजोगाई रोडवर असलेल्या रेणापूर नाका येथे अपना नाका ग्रुपच्या वतीने दररोज ३०० जणांना घरपाेच मोफत जेवण पुरविण्याचे काम केले जात आहे. त्यांचा हा उपक्रम मागील दहा वर्षांपासून सुरू आहे.

शैक्षणिक शहर म्हणून ओळख असलेल्या लातूरमध्ये रमजान महिन्यात अनेक मुलांना पहाटेच्या सहेरची व्यवस्था होत नाही. ही बाब लक्षात आल्याने अपना ग्रुपच्या सदस्यांनी २०१२ मध्ये काही विद्यार्थ्यांना डबे पोहचविण्याचे काम सुरू केले होते. त्यानंतर दरवर्षी याला प्रतिसाद वाढत गेला. ग्रुपसोबत अनेक तरुणही जाेडले गेले. मागील तीन वर्षांत डब्याची मागणी वाढल्याने सर्वांना वेळेत डबा पुरविण्याचे नियोजन केले जात आहे. आलमपुरा चौकात दररोज रात्री ९ वाजण्याच्या सुमारास स्वयंपाकाला सुरुवात केली जाते, पहाटे ३ वाजेपर्यंत स्वयंपाक तयार होतो.  त्यानंतर १० मुले दररोज दुचाकीवर हॉस्पिटल, ट्युशन एरिया, तसेच अनेक गरजूंना घरपोच डबा देऊन येतात, असे ग्रुपचे असद मामू, सय्यद रियाज खतीब, मिनहाज खान, जाकेर शेख यांनी सांगितले.

चौघांनी केली होती सुरुवात...

गरजूंना पहाटेच्या वेळी डबा देण्याची सुरुवात अपना नाका ग्रुपचे असद मामू, रियाज खतीब, मिनहाज खान, जाकेर शेख यांनी १० ते १२ वर्षांपूर्वी केली होती. कोराेनानंतर ग्रुपच्या वतीने रमजान महिन्यात यासंदर्भात जनजागृती करण्यात आल्यानंतर मागणी वाढली. यावर्षी दररोज ३०० डबे घरपोच दिले जात असल्याचे सांगण्यात आले. केवळ ईश्वर सेवा म्हणून हा उपक्रम राबविला जात असून, रमजान महिन्यात कोणीही उपाशीपोटी सहेर (उपवास) करू नये, एवढीच यामागची भावना असल्याचे त्यांनी सांगितले.

चपाती, भात, भाजीचा ताजा स्वयंपाक...दररोज चपाती, एक सुकी भाजी, वरण, भात व अन्य भाजी डब्यात दिली जाते. जेवण बनविण्यासाठी लागणारे साहित्य ताजे असते. जेवणावर विशेष लक्ष दिले जाते. जवळपास ५० स्वयंसेवक दररोज यासाठी राबतात. शहरात अनेक ठिकाणी फलक लावले आहेत, आमच्याकडे कोणी संपर्क केला की, त्यांना डबा घरपोच देण्यात येत असल्याचे रियाज खतीब यांनी सांगितले.