शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह चौघांना सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:19 IST

याबाबत सरकारी वकील ॲड. एस.आय. बिरादार यांनी दिलेली माहिती अशी की, येथील संत कबीर नगरात वर्षा हिचा विवाह बालाजी ...

याबाबत सरकारी वकील ॲड. एस.आय. बिरादार यांनी दिलेली माहिती अशी की, येथील संत कबीर नगरात वर्षा हिचा विवाह बालाजी कांबळे याच्यासोबत सन २०१६ मध्ये झाला होता. लग्नानंतर जेमतेम दोन महिने वर्षा हिला सासरच्या मंडळींनी व्यवस्थित नांदविले. त्यानंतर माहेरहून घर बांधकामासाठी ५ लाख रुपये घेऊन ये म्हणून सासरच्या मंडळींनी छळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान, काही दिवसांत मयत वर्षा ही गरोदर राहिली. त्यानंतर डोहाळे जेवणात पती बालाजी कांबळे यास सोन्याचे लॉकेट व अंगठी आण म्हणून पुन्हा शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरुवात झाली. सततच्या त्रासाला कंटाळून वर्षा हिने ३१ डिसेंबर २०१६ रोजी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मयत वर्षा यांचा चुलता विलास विठ्ठलराव शिंदे (रा. संत कबीर नगर) यांनी १ जानेवारी २०१७ रोजी सासरच्या मंडळींविरुद्ध फिर्याद दिल्याने ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यांमध्ये एकूण नऊ आरोपी होते. गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. नमूद ९ पैकी पती बालाजी दत्तात्रय कांबळे, सासरा दत्तात्रय कोंडिबा कांबळे, नणंद कमळाबाई दत्तात्रय कांबळे व रमाबाई सूर्यकांत कांबळे (सर्वजण रा. संत कबीर नगर) या चार आरोपींना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय क्र. दोनचे न्या. वाय.पी. मणाठकर यांनी १० वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी वीस हजार रुपये दंड ठोठावला आहे. सदरील खटल्यात साक्षीदारांनी योग्य साक्ष दिल्याची माहिती सरकारी वकील ॲड. शिवाजी बिरादार यांनी दिली.