शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

पंधरा दिवसांत होणार साडेचार लाख घनमीटर गाळ उपसा; स्वयंसेवी संस्थांनी घेतला पुढाकार

By आशपाक पठाण | Updated: May 25, 2024 18:58 IST

५२ प्रकल्पातून उद्दिष्ट : स्वयंसेवी संस्थांनी घेतला पुढाकार

लातूर : जिल्ह्यात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानाला गती देण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त सिंचन प्रकल्पातील गाळ उपसा करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार पुढील पंधरा दिवसांत जिल्ह्यातील जवळपास ५२ प्रकल्पांतून साडेचार लाख घनमीटर गाळ उपसा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, या कामाला गती आली आहे.

लातूर तालुक्यातील धानाेरी येथील तावरजा मध्यम प्रकल्पातील गाळ उपसा करण्याच्या कामाला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अमर पाटील, जिल्हा जलसंधारण अधिकारी अनिल कांबळे, तहसीलदार सौदागर तांदळे, नाम फाउंडेशनचे विलास चामे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून हे काम होणार आहे.

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील जास्तीत जास्त सिंचन प्रकल्पातील गाळ उपसा करून शेतात टाकण्यासाठी शेतकरी, स्वयंसेवी संस्था यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील जवळपास ५२ प्रकल्पांतील गाळ उपसा करण्यास सुरुवात झाली आहे. लोकसहभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ही कामे सुरु असून, याच्या माध्यमातून गाळ उपसा झाल्याने सिंचन प्रकल्पांची साठवण क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. तसेच हा गाळ शेतात टाकल्याने जमीन सुपीक होऊन शेतीतील उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.

अभियानामुळे शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा : जिल्हाधिकारीशेतजमीन सुपीक बनविणारी आणि सिंचन प्रकल्पांच्या साठवण क्षमतेत वाढ करणारे गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियान जिल्ह्यात अधिक व्यापक स्वरुपात राबविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा होणार असल्याने येत्या पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या अभियानात सहभागी होऊन तलाव गाळमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा. यासोबत स्वयंसेवी संस्था, शासकीय यंत्रणांनी प्रकल्पातील गाळ उपसा अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी केले.

टॅग्स :laturलातूर