शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘उडान’मधूनही मिळेना लातूरला उड्डाण; २००९ मध्ये उडाले होते शेवटचे प्रवासी विमान

By संदीप शिंदे | Updated: February 23, 2023 07:15 IST

लातूर विमानतळाचे काम २००७ मध्ये पूर्ण झाले. तर १० ऑक्टोबर २००८ रोजी पहिले विमान लँडिंग झाले होते.

लातूर : सर्वसामान्यांना हवाई सफरीचा लाभ मिळावा, विमानतळांचा विस्तार व्हावा, हवाई कनेक्टिव्हिटी वाढावी, यासाठी केंद्र शासनाने ‘उडान’ योजना सुरू केली. या योजनेमुळे अनेक विमानतळांना नवसंजीवनी मिळाली असून, या ठिकाणाहून विमानसेवा सुरू झाली आहे. मात्र, या योजनेत अद्यापपर्यंत लातूरच्या विमानतळाचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे आगामी काळात ‘उडान’मधून तरी लातूर विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवा सुरू होणार का? असा प्रश्न लातूरकरांमधून विचारला जात आहे.

लातूर-बार्शी मार्गावरील बारा नंबर पाटीनजीक ३०० एकर क्षेत्रावर लातूर विमानतळ आहे. १९९८ मध्ये या विमानतळाच्या कामाला सुरुवात झाली होती. हे काम २००७ मध्ये पूर्ण झाले. तर १० ऑक्टोबर २००८ रोजी पहिले विमान लँडिंग झाले होते. दरम्यान, पुढील वर्षभर लातूर ते मुंबई प्रवासी विमानसेवा सुरू होती. तर २५ ऑगस्ट २००९ मध्ये या विमानतळावरून शेवटच्या प्रवासी विमानाचे उड्डाण झाले. तेव्हापासून आतापर्यंत या विमानतळावरून प्रवासी विमानांची वाहतूक झालेली नाही. सध्या दररोज ३ ते ४ प्रशिक्षणार्थींची विमाने या ठिकाणी येत असून, महिन्यात तीन ते चार चार्टर विमानांचे लँडिंग होते.केंद्र शासनाने विमानतळांच्या विकासासाठी तसेच प्रवाशांना परवडेल यासाठी उडान योजना सुरू केली आहे. या अंतर्गत अनेक विमानतळांना इतर शहरांशी जोडण्यात आले. मात्र, लातूरच्या विमानतळाला या योजनेंतर्गत अद्यापही उभारी मिळालेली नाही. आगामी काळात तरी या योजनेंतर्गत प्रवासी वाहतूक सेवा सुरू होईल, अशी अपेक्षा लातूरकरांना आहे.

मुंबई, तिरुपतीसाठी प्रवाशांची मागणी...लातूर व परिसरातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. तसेच तिरुपती दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक जातात. त्यामुळे उडान योजनेंतर्गत या विमानतळावरून लातूर-मुंबई व लातूर-तिरुपती विमानसेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

विमानतळावर सर्व सुविधा उपलब्ध...लातूर विमानतळावर प्रवासी वाहतूक करण्यासाठी १७०० मीटर अंतराची धावपट्टी आहे. ३०० मीटरचा सुरक्षित परिसरही आहे. याच परिसरात मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीचे काम पूर्ण झाले आहे. तसेच व्यावसायिक पायलट ट्रेनिंग सेंटरही विमानतळ परिसरात सुरू होणार आहे. प्रवासी वाहतुकीसाठी सर्व सुविधा उपलब्ध असल्याने विमान वाहतूक सुरू करण्यासाठी कोणतीही अडचण नाही.

७२ प्रवाशांचे विमान उतरू शकते...लातूर विमानतळाच्या धावपट्टीवर ७२ प्रवासी क्षमता असलेले विमान लँडिंग किंवा उड्डाण करू शकते. उडान योजनेंतर्गत प्रवाशांना तिकीट परवडणारे आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रतिसादही चांगला मिळणार आहे. आता केवळ उडान योजनेसाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून लातूर विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी सुरू करावे, अशी मागणीही होत आहे.

टॅग्स :laturलातूरairplaneविमान