शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

‘उडान’मधूनही मिळेना लातूरला उड्डाण; २००९ मध्ये उडाले होते शेवटचे प्रवासी विमान

By संदीप शिंदे | Updated: February 23, 2023 07:15 IST

लातूर विमानतळाचे काम २००७ मध्ये पूर्ण झाले. तर १० ऑक्टोबर २००८ रोजी पहिले विमान लँडिंग झाले होते.

लातूर : सर्वसामान्यांना हवाई सफरीचा लाभ मिळावा, विमानतळांचा विस्तार व्हावा, हवाई कनेक्टिव्हिटी वाढावी, यासाठी केंद्र शासनाने ‘उडान’ योजना सुरू केली. या योजनेमुळे अनेक विमानतळांना नवसंजीवनी मिळाली असून, या ठिकाणाहून विमानसेवा सुरू झाली आहे. मात्र, या योजनेत अद्यापपर्यंत लातूरच्या विमानतळाचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे आगामी काळात ‘उडान’मधून तरी लातूर विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवा सुरू होणार का? असा प्रश्न लातूरकरांमधून विचारला जात आहे.

लातूर-बार्शी मार्गावरील बारा नंबर पाटीनजीक ३०० एकर क्षेत्रावर लातूर विमानतळ आहे. १९९८ मध्ये या विमानतळाच्या कामाला सुरुवात झाली होती. हे काम २००७ मध्ये पूर्ण झाले. तर १० ऑक्टोबर २००८ रोजी पहिले विमान लँडिंग झाले होते. दरम्यान, पुढील वर्षभर लातूर ते मुंबई प्रवासी विमानसेवा सुरू होती. तर २५ ऑगस्ट २००९ मध्ये या विमानतळावरून शेवटच्या प्रवासी विमानाचे उड्डाण झाले. तेव्हापासून आतापर्यंत या विमानतळावरून प्रवासी विमानांची वाहतूक झालेली नाही. सध्या दररोज ३ ते ४ प्रशिक्षणार्थींची विमाने या ठिकाणी येत असून, महिन्यात तीन ते चार चार्टर विमानांचे लँडिंग होते.केंद्र शासनाने विमानतळांच्या विकासासाठी तसेच प्रवाशांना परवडेल यासाठी उडान योजना सुरू केली आहे. या अंतर्गत अनेक विमानतळांना इतर शहरांशी जोडण्यात आले. मात्र, लातूरच्या विमानतळाला या योजनेंतर्गत अद्यापही उभारी मिळालेली नाही. आगामी काळात तरी या योजनेंतर्गत प्रवासी वाहतूक सेवा सुरू होईल, अशी अपेक्षा लातूरकरांना आहे.

मुंबई, तिरुपतीसाठी प्रवाशांची मागणी...लातूर व परिसरातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. तसेच तिरुपती दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक जातात. त्यामुळे उडान योजनेंतर्गत या विमानतळावरून लातूर-मुंबई व लातूर-तिरुपती विमानसेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

विमानतळावर सर्व सुविधा उपलब्ध...लातूर विमानतळावर प्रवासी वाहतूक करण्यासाठी १७०० मीटर अंतराची धावपट्टी आहे. ३०० मीटरचा सुरक्षित परिसरही आहे. याच परिसरात मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीचे काम पूर्ण झाले आहे. तसेच व्यावसायिक पायलट ट्रेनिंग सेंटरही विमानतळ परिसरात सुरू होणार आहे. प्रवासी वाहतुकीसाठी सर्व सुविधा उपलब्ध असल्याने विमान वाहतूक सुरू करण्यासाठी कोणतीही अडचण नाही.

७२ प्रवाशांचे विमान उतरू शकते...लातूर विमानतळाच्या धावपट्टीवर ७२ प्रवासी क्षमता असलेले विमान लँडिंग किंवा उड्डाण करू शकते. उडान योजनेंतर्गत प्रवाशांना तिकीट परवडणारे आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रतिसादही चांगला मिळणार आहे. आता केवळ उडान योजनेसाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून लातूर विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी सुरू करावे, अशी मागणीही होत आहे.

टॅग्स :laturलातूरairplaneविमान