शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

काेथिंबीर शेतकऱ्यांकडून दहाला पाच, ग्राहकांच्या पदरी मात्र दहाला दाेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:22 IST

लातूर शहरातील महात्मा फुले भाजी मंडई, रयतू बाजार आणि गंजगाेालाइत दरदिन सकाळी माेठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची आवक हाेत आहे. शेतकऱ्यांकडून ...

लातूर शहरातील महात्मा फुले भाजी मंडई, रयतू बाजार आणि गंजगाेालाइत दरदिन सकाळी माेठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची आवक हाेत आहे. शेतकऱ्यांकडून कवडीमाेल भावात व्यापारी भाजीपाला खरेदी करत आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना माेठा आर्थिक फटका सहन करण्याची वेळ आली आहे. मेहन तरुन उत्पादन घेतलेल्या भाजीपाल्याने शेतकऱ्यांची कंबरडेच माेडले आहे.

शेतकऱ्यांच्या पदरी लावगड खर्चही पडेना...

शेतात टाेमॅटाेची लावकड केली हाेती. शिवाय, इतर भाजीपालाही घेतला हाेता. मात्र, गत पंधरा दिवसांपासून रिमझिप पावसाने हजेरी लावली. यातून काढणीचा खर्चही पदरी पडला नाही. बाजारात आवक वाढल्याने भावही घसरले आहेत.

- रामचंद्र वाढवणकर, उदगीर

सध्याला शेतात भाजीपाल्यांची लागवड केली आहे. मात्र, सध्याला बाजारात हाेणारी आवक आणि मिळाणारा दर कवडीमाेल आहे. यातून लागवडीसाठी केलेला खर्चही निघणार नाही, अशी परिस्थिती आहे. भाव चांगला मिळाला असता, तर शेतकऱ्यांचा फायदा झाला असता. - शंकर कांबळे, लातूर

आणि ग्राहकांच्या खिशाला झळ...

जिल्ह्यातील आठवडी बाजारात माेठ्या प्रमाणावर भाजीपाल्यांची आवक हाेत आहे. याचा फायदा प्रत्यक्षात ग्राहकांना मिळत नाही. शेतकऱ्यांकडून व्यापारी कवडीमाेल भावात खरेदी करतात. मात्र, ग्राहकांना चढ्या दरानेच भाजीपाला खरेदी करावा लागत आहे. - अविनाश गायकवाड, लातूर

सध्याला भाजीपाल्याची बाजारात आवक वाढली असून, दर घसरले आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आहे. यातून व्यापारी, दलालांचा फायदा हाेत आहे. ग्राहकांना आहे त्याच भावात भाजीपाला विक्री केला जात आहे. - साहेबराव किनीकर, उदगीर

भावामध्ये एवढा फरक कशासाठी...

शेतकऱ्यांकडून जिल्ह्यात यंदा माेठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची लागवड करण्यात आली आहे. अनेकांच्या बांधावर काढणीचा खर्चही निघत नाही म्हणून टाेमॅटाेचा लाल चिखल झाला आहे. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांचा एकाचवेळी भाजीपाला खरेदी केला जाताे. त्यावेळी बाेली लावली जाते. दर पाडून भाजीपाला मागितला जाताे. शेतकरीही एकाचवेळी सर्व माल विक्री करताे. मात्र, हा भाजीपाला विक्री करताना दर वाढविले जातात. व्यापारी, वाहतूक खर्च आणि इतर खर्च लागताे असे सांगून दर पाडले जातात. त्यापुढे जात किरकाेळ विक्रेत्यांकडून हाच भाजीपाला चढ्या दाराने विक्री केला जाताे. यातून सामान्यांच्या खिशाला झळ बसते.