शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

काेथिंबीर शेतकऱ्यांकडून दहाला पाच, ग्राहकांच्या पदरी मात्र दहाला दाेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:22 IST

लातूर शहरातील महात्मा फुले भाजी मंडई, रयतू बाजार आणि गंजगाेालाइत दरदिन सकाळी माेठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची आवक हाेत आहे. शेतकऱ्यांकडून ...

लातूर शहरातील महात्मा फुले भाजी मंडई, रयतू बाजार आणि गंजगाेालाइत दरदिन सकाळी माेठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची आवक हाेत आहे. शेतकऱ्यांकडून कवडीमाेल भावात व्यापारी भाजीपाला खरेदी करत आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना माेठा आर्थिक फटका सहन करण्याची वेळ आली आहे. मेहन तरुन उत्पादन घेतलेल्या भाजीपाल्याने शेतकऱ्यांची कंबरडेच माेडले आहे.

शेतकऱ्यांच्या पदरी लावगड खर्चही पडेना...

शेतात टाेमॅटाेची लावकड केली हाेती. शिवाय, इतर भाजीपालाही घेतला हाेता. मात्र, गत पंधरा दिवसांपासून रिमझिप पावसाने हजेरी लावली. यातून काढणीचा खर्चही पदरी पडला नाही. बाजारात आवक वाढल्याने भावही घसरले आहेत.

- रामचंद्र वाढवणकर, उदगीर

सध्याला शेतात भाजीपाल्यांची लागवड केली आहे. मात्र, सध्याला बाजारात हाेणारी आवक आणि मिळाणारा दर कवडीमाेल आहे. यातून लागवडीसाठी केलेला खर्चही निघणार नाही, अशी परिस्थिती आहे. भाव चांगला मिळाला असता, तर शेतकऱ्यांचा फायदा झाला असता. - शंकर कांबळे, लातूर

आणि ग्राहकांच्या खिशाला झळ...

जिल्ह्यातील आठवडी बाजारात माेठ्या प्रमाणावर भाजीपाल्यांची आवक हाेत आहे. याचा फायदा प्रत्यक्षात ग्राहकांना मिळत नाही. शेतकऱ्यांकडून व्यापारी कवडीमाेल भावात खरेदी करतात. मात्र, ग्राहकांना चढ्या दरानेच भाजीपाला खरेदी करावा लागत आहे. - अविनाश गायकवाड, लातूर

सध्याला भाजीपाल्याची बाजारात आवक वाढली असून, दर घसरले आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आहे. यातून व्यापारी, दलालांचा फायदा हाेत आहे. ग्राहकांना आहे त्याच भावात भाजीपाला विक्री केला जात आहे. - साहेबराव किनीकर, उदगीर

भावामध्ये एवढा फरक कशासाठी...

शेतकऱ्यांकडून जिल्ह्यात यंदा माेठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची लागवड करण्यात आली आहे. अनेकांच्या बांधावर काढणीचा खर्चही निघत नाही म्हणून टाेमॅटाेचा लाल चिखल झाला आहे. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांचा एकाचवेळी भाजीपाला खरेदी केला जाताे. त्यावेळी बाेली लावली जाते. दर पाडून भाजीपाला मागितला जाताे. शेतकरीही एकाचवेळी सर्व माल विक्री करताे. मात्र, हा भाजीपाला विक्री करताना दर वाढविले जातात. व्यापारी, वाहतूक खर्च आणि इतर खर्च लागताे असे सांगून दर पाडले जातात. त्यापुढे जात किरकाेळ विक्रेत्यांकडून हाच भाजीपाला चढ्या दाराने विक्री केला जाताे. यातून सामान्यांच्या खिशाला झळ बसते.