शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

लातूरात पहिला बुधवार तक्रार निवारण दिन; थेट झेडपी सीईओंच जाणून घेणार नागरिकांच्या तक्रारी

By हरी मोकाशे | Updated: February 7, 2024 16:44 IST

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेत दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी तक्रार निवारण दिन राबविण्यात येणार आहे.

लातूर : जिल्हा परिषदेअंतर्गतच्या अडचणी, तक्रारींचा तात्काळ निपटारा करुन समस्याग्रस्तांचे विनाविलंब समाधान करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आता प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी तक्रार निवारण दिन सुरु केला आहे. या दिवशी ग्रामीण भागातील नागरिकांना थेट सीईओंसमोर तक्रारी मांडता येणार आहेत.

जिल्हा परिषदेस मिनी मंत्रालय म्हणून संबोधले जाते. जिल्हा परिषदेअंतर्गत सामान्य प्रशासन, अर्थ, शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण, पंचायत, बांधकाम, कृषी व पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण, लघुपाटबंधारे व पाणीपुरवठा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा असे विविध विभाग आहेत. तसेच जिल्ह्यात एकूण ७८६ गावे आहेत. गाव पातळीवर अथवा पंचायत समिती स्तरावर अडीअडचणींची न सुटल्यास सदरील नागरिक जिल्हा परिषदेकडे धाव घेतात. त्यामुळे विविध कामानिमित्ताने दररोज ग्रामीण भागातील नागरिकांची रेलचेल असते. तक्रारी घेऊन आलेल्यांना लवकर समस्या दूर व्हाव्यात अशी अपेक्षा असते.

सीईओंसह सर्व विभागप्रमुख...जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेत दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी तक्रार निवारण दिन राबविण्यात येणार आहे. या दिवशी सीईओ यांच्यासह जिल्हा परिषदेतील प्रत्येक विभागाचे विभागप्रमुख उपस्थित राहणार आहेत. हे सर्वजण नागरिकांच्या तक्रारी जाणून घेऊन त्या तात्काळ सोडविण्यासाठी कार्यवाही सुरु करणार आहेत.

पहिल्या दिवशी चार तक्रार...जिल्हा परिषदेत सीईओ अनमोल सागर यांच्या समोर प्रयोगिक तत्त्वावर हा उपक्रम सुरु करण्यात आला. गेल्या महिनाभरात तक्रार दाखल केलेल्यांपैकी काही जणांना बुधवारी बोलाविण्यात आले होते. त्यापैकी चौघजण उपस्थित होते. त्यातील एका प्रकरणासंदर्भात तात्काळ तपासणीचे आदेश सीईओंनी बांधकाम विभागास दिले.

अशा प्रकरणांवर होणार नाही सुनावणी...ग्रामीण भागातील नागरिकांनी आपली तक्रार जर मुख्यमंत्री कार्यालय, आपले सरकार, लोकशाही दिन, न्यायालयात अथवा लोकायुक्त अथवा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली असल्यास त्या प्रकरणांवर जिल्हा परिषदेत सुनावणी होणार नाही.

ग्रामीण जनतेसाठी उपयुक्त उपक्रम...सीईओ अनमोल सागर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेतही आता दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी तक्रार निवारण दिन सुरु करण्यात येत आहे. हा उपक्रम ग्रामीण जनतेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे तक्रारी, समस्यांचा जलद गतीने निपटारा होईल.- नितीन दाताळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन.

टॅग्स :laturलातूरLatur z pलातूर जिल्हा परिषद