शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

लातूरात पहिला बुधवार तक्रार निवारण दिन; थेट झेडपी सीईओंच जाणून घेणार नागरिकांच्या तक्रारी

By हरी मोकाशे | Updated: February 7, 2024 16:44 IST

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेत दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी तक्रार निवारण दिन राबविण्यात येणार आहे.

लातूर : जिल्हा परिषदेअंतर्गतच्या अडचणी, तक्रारींचा तात्काळ निपटारा करुन समस्याग्रस्तांचे विनाविलंब समाधान करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आता प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी तक्रार निवारण दिन सुरु केला आहे. या दिवशी ग्रामीण भागातील नागरिकांना थेट सीईओंसमोर तक्रारी मांडता येणार आहेत.

जिल्हा परिषदेस मिनी मंत्रालय म्हणून संबोधले जाते. जिल्हा परिषदेअंतर्गत सामान्य प्रशासन, अर्थ, शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण, पंचायत, बांधकाम, कृषी व पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण, लघुपाटबंधारे व पाणीपुरवठा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा असे विविध विभाग आहेत. तसेच जिल्ह्यात एकूण ७८६ गावे आहेत. गाव पातळीवर अथवा पंचायत समिती स्तरावर अडीअडचणींची न सुटल्यास सदरील नागरिक जिल्हा परिषदेकडे धाव घेतात. त्यामुळे विविध कामानिमित्ताने दररोज ग्रामीण भागातील नागरिकांची रेलचेल असते. तक्रारी घेऊन आलेल्यांना लवकर समस्या दूर व्हाव्यात अशी अपेक्षा असते.

सीईओंसह सर्व विभागप्रमुख...जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेत दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी तक्रार निवारण दिन राबविण्यात येणार आहे. या दिवशी सीईओ यांच्यासह जिल्हा परिषदेतील प्रत्येक विभागाचे विभागप्रमुख उपस्थित राहणार आहेत. हे सर्वजण नागरिकांच्या तक्रारी जाणून घेऊन त्या तात्काळ सोडविण्यासाठी कार्यवाही सुरु करणार आहेत.

पहिल्या दिवशी चार तक्रार...जिल्हा परिषदेत सीईओ अनमोल सागर यांच्या समोर प्रयोगिक तत्त्वावर हा उपक्रम सुरु करण्यात आला. गेल्या महिनाभरात तक्रार दाखल केलेल्यांपैकी काही जणांना बुधवारी बोलाविण्यात आले होते. त्यापैकी चौघजण उपस्थित होते. त्यातील एका प्रकरणासंदर्भात तात्काळ तपासणीचे आदेश सीईओंनी बांधकाम विभागास दिले.

अशा प्रकरणांवर होणार नाही सुनावणी...ग्रामीण भागातील नागरिकांनी आपली तक्रार जर मुख्यमंत्री कार्यालय, आपले सरकार, लोकशाही दिन, न्यायालयात अथवा लोकायुक्त अथवा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली असल्यास त्या प्रकरणांवर जिल्हा परिषदेत सुनावणी होणार नाही.

ग्रामीण जनतेसाठी उपयुक्त उपक्रम...सीईओ अनमोल सागर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेतही आता दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी तक्रार निवारण दिन सुरु करण्यात येत आहे. हा उपक्रम ग्रामीण जनतेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे तक्रारी, समस्यांचा जलद गतीने निपटारा होईल.- नितीन दाताळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन.

टॅग्स :laturलातूरLatur z pलातूर जिल्हा परिषद