शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लातूरची गुणवंत विद्यार्थिनी रेणुकाच्या मदतीला सरसावले फिरोदिया फाऊंडेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 14:39 IST

माता-पित्याविना पोरक्या मुलींना मिळाला मोठा आधार

ठळक मुद्देशिक्षणमंत्र्यांनीही दूरध्वनी करून घेतली दखल तिन्ही बहिणींच्या शिक्षणाला मिळणार मदत 

लातूर : बालपणी वडील गेले अन् दहावी निकालाच्या पूर्वसंध्येला सर्पदंशाने आईही गेली. घरात तीन बहिणींशिवाय कोणीच नाही. सर्वात मोठी रेणुका दिलीप गुंडरे ही ९३.२० टक्के गुण मिळवून गुणवंत ठरली. मात्र, तिचे कौतुक पाहायला आई नव्हती. तिची ही हृदयद्रावक कहाणी ‘लोकमत’मधून उमटल्यानंतर अहमदनगरच्या शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशनने मदतीचा हात पुढे केला आहे. 

फाऊंडेशनचे मुख्य विश्वस्त नरेंद्र फिरोदिया यांनी अहमदनगर तसेच लातूर लोकमत कार्यालयात दूरध्वनी करून रेणुकाची अधिक माहिती जाणून घेतली. रेणुका दहावी उत्तीर्ण झाली आहे. तिच्या दोन लहान बहिणी चौथी व सातवी वर्गात शिकतात. त्या तिघींचाही सांभाळ करायला घरात वडील नव्हते आणि आईही गेली. रेणुका हुशार आहे. ती लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयात प्रवेश घेऊन पुढे सनदी अधिकारी होऊ इच्छिते. पाठीमागे दोन लहान बहिणींना लातूरमध्येच एखाद्या वसतिगृहात प्रवेश देऊन पुढील शिक्षण द्यावे, असा तिचा मानस आहे. निकटचे नातेवाईक तिला धैर्य देत आहेत. काही व्यक्ती व संस्थांनीही मदत केली आहे. अहमदनगरच्या फिरोदिया फाऊंडेशनने तर तिन्ही बहिणींच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची ग्वाही दिली आहे. 

शिक्षणमंत्र्यांचे मदतीचे आश्वासनरेणुकाच्या या हृदयद्रावक कहाणीचे वृत्त ‘लोकमत’च्या दिल्ली, मुंबई, अहमदनगर, पुणे, सोलापूर, लातूरसह सर्वच आवृत्त्यांमध्ये उमटले होते. त्यानंतर शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी तातडीने दखल घेतली. ‘लोकमत’चे वृत्त वाचून स्वत: शिक्षणमंत्र्यांनी रेणुकाला दूरध्वनी करून सर्व तऱ्हेची मदत केली जाईल, असे आश्वासन दिले. तात्पुरत्या स्वरूपात काही मदतही पोहोचविल्याचे अमर खानापुरे यांनी सांगितले. 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालlaturलातूरsocial workerसमाजसेवक