शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

मोफतच्या शिवभोजन थाळीचा आस्वाद घेण्यासाठी आर्थिक सक्षमही रांगेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:19 IST

चाकूर : कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे राज्य सरकारने राज्यातील गोरगरिबांसाठी मोफत शिवभोजन थाळी उपलब्ध करुन दिली आहे. परंतु, येथील केंद्रावर ...

चाकूर : कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे राज्य सरकारने राज्यातील गोरगरिबांसाठी मोफत शिवभोजन थाळी उपलब्ध करुन दिली आहे. परंतु, येथील केंद्रावर आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले व्यक्तीही या थाळीचा आस्वाद घेण्यासाठी रांगेत उभे राहत असल्याचे दिसून येत आहे. घरात दोनवेळेचे अन्न मिळत असलेलेही शिवभोजनासाठी येत असल्याने उदरनिर्वाह न होणा-या व्यक्तींपुढे नवा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने गोरगरिबांना अत्यल्प दरात भोजन मिळावे म्हणून १० रुपयांत शिवभोजन थाळी देण्यास सुरुवात केली. चाकुरातील बसस्थानकात ही थाळी एप्रिल २०२० पासून सुरु झाली. चालक गणेश नरवटे यांना दररोज शंभर ताटाप्रमाणे थाळी देण्याची सरकारी मान्यता मिळाली. त्यामुळे शहरासह तालुक्यात मोलमजुरी करणारे तसेच ज्यांना कुठलेही काम होत नाही, अशा व्यक्तींना आधार मिळाला. १० रुपयांप्रमाणे दररोज ५० ते ७० जण या थाळीचा आस्वाद घेत असत.

गत जुलैपासून शिवभोजन थाळी ५ रुपयांत देण्यास सुरुवात झाली. तेव्हा दररोज ५० ते ८० जण त्याचा लाभ घेत असत. दरम्यान, कोरोनाचे संकट निर्माण झाल्यामुळे राज्य शासनाने शिवभोजन थाळी १५ एप्रिल ते १५ मे या कालावधीत मोफत देण्याचे जाहीर केले. त्यानुसार या केंद्रातून मोफत शिवभोजन थाळी देण्यास सुरुवात झाली. शिवभोजन थाळी ऑनलाईन ही सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मिळते. आता या थाळीचा आस्वाद घेण्याच्या आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेलेही व्यक्ती येत आहेत. त्यामुळे थाळींना मागणी वाढली असून दररोज ९० ते १०० जवळपास दिली जात आहे. ज्यांना घरी आनंदाने भोजन मिळते, अशीही मंडळी मोफतच्या शिवभोजन थाळीचा स्वाद चाखत आहेत. त्यामुळे गरिबांना हक्काची थाळी मिळणे कठीण झाले आहे.

थाळीसाठी मागणी वाढली...

येथील शिवभोजन थाळी केंद्रात सीसीटीव्ही आहे. त्यात प्रत्येकाचा चेहरा कैद होतो. त्याची अनेकांना माहिती नाही. येथील स्थिती ऑनलाईनच्या माध्यमातून थेट जिल्हाधिकारी, तहसील कार्यालयात पहावयास मिळते. पूर्वी शिवभोजन थाळीला मागणी कमी होती. परंतु, आता चांगले व्यक्तीही येथे येत आहेत. थाळीची दररोजची क्षमता शंभरची आहे. थाळी घेण्यासाठी कोण गरीब, कोण श्रीमंत हे आम्ही पाहत नाही. शंभर थाळी संपल्या की केंद्र बंद करतो.

- गणेश नरवटे, शिवभोजन थाळी केंद्रचालक

गरजूंसाठी शिवभोजन थाळी...

शिवभोजन थाळी ही समाजातील अत्यंत गरजूंसाठी आहे. कोरोनाच्या संकटाच्या काळात ज्यांना पाच रुपये देणे शक्य नाही, अशांसाठी शासनाने ही थाळी मोफत केली आहे. परंतु ज्यांना पोटभर जेवण मिळते, असे व्यक्ती रांगेत थांबत असतील तर दुसरे दुदैव नाही. ज्यांचे पोट हातावर आहे, अशा व्यक्तींनी शिवभोजन थाळीचा लाभ घ्यावा

- डॉ. शिवानंद बिडवे, तहसीलदार.