शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

शेतरस्त्यांची संकल्पना पूर्णत्वास आल्यास शेतकरी समृद्ध होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:18 IST

औसा मतदारसंघातील अनेक गावांत शेतरस्ते कामास सुरुवात झाली आहे. तालुक्यात १२० व मतदारसंघातील निलंगा तालुक्यात ३० कि.मी. लांबीच्या अंतराचे ...

औसा मतदारसंघातील अनेक गावांत शेतरस्ते कामास सुरुवात झाली आहे. तालुक्यात १२० व मतदारसंघातील निलंगा तालुक्यात ३० कि.मी. लांबीच्या अंतराचे शेतरस्ते कामाचे मातीकाम व दबई काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत, असे सांगून आ. अभिमन्यू पवार म्हणाले, आपला स्थानिक विकास निधी शेवटचा शेतरस्ता होईपर्यंत समर्पित केला जाईल. पहिल्या टप्प्यात ६१ गावांतील रस्त्याची कामे हाती घेतली असून, ८८५ कि.मी. अंतराचे शेतरस्ते प्रस्तावित आहेत. शेतरस्त्यांअभावी शेतमाल पिकवून शेतकऱ्यांना शेतात ठेवावे लागत आहे. प्रत्येक शेताला रस्ता झाल्यास शेतमालाची वेळेत ने-आण करणे, रास वेळेत होणे, शेतीची कामे वेळेत पूर्ण होणार आहेत. शेतरस्त्यांमुळे शेतीच्या किमतीत वाढ होईल. शेतीमालाची वाहतूक वेळेत करुन बाजारपेठेत आणता येणार असल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध होईल. शेतरस्त्याची कामे पूर्ण झालेल्या रस्त्यावर माती कामानंतर मनरेगातून खडीकरण हाती घेण्यात येईल. पाणंद, शेतरस्ते व शिवरस्ता कामासाठी भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथ्था हे २० ते २५ पोकलेन मशीनची मदत करणार असल्याचे सांगून शेतरस्ते कामात जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांवर प्रशासन कायदेशीर कारवाई करून शेतरस्ते मोकळे करून देईल. मतदारसंघात या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आ. अभिमन्यू पवार यांनी सांगितले. याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, शहराध्यक्ष लहू कांबळे, गटनेते सुनील उटगे, संतोषअप्पा मुक्ता, प्रा. भीमाशंकर राचट्टे, प्रा. शिव मुरगे, फहीम शेख आदी उपस्थित होते.