शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

नापिकी आणि कर्जबाजारीपणास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 19:13 IST

पेरणीसाठी म्हैस विकून खत आणि बियाणे आणले होते.

ठळक मुद्दे पाऊसच नसल्याने पेरणीही झाली नाही़

लातूर : तालुक्यातील रायवाडी येथे नापिकी व कर्जबाजारीणास कंटाळून एका शेतकऱ्याने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी सांगितले, रायवाडी येथील शिवाजी ज्ञानोबा पवार (४५) यांनी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास विषारी द्रव प्राशन केले. त्यांना लातूरच्या शासकीय सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी शिवाजी पवार यांना मयत घोषित केले. रूग्णालयातून आलेल्या माहितीवरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ दरम्यान, नातेवाईक म्हणाले, शिवाजी पवार यांना रायवाडी शिवारात दोन एकर जमीन असून, यावर्षी पाऊस नसल्याने पेरणीही झाली नाही. सोसायटी व खाजगी बँकेचे त्यांच्यावर कर्ज आहे़ शिवाय, एक मुलगीही लग्नाला आली आहे. दोन मुले मजूरी करतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी पेरणीसाठी म्हैस विकून खत आणि बियाणे आणले होते. मात्र पाऊसच नसल्याने पेरणीही झाली नाही़ आर्थिक विवंचनेत येऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.

टॅग्स :laturलातूरfarmer suicideशेतकरी आत्महत्याagricultureशेती