शहरं
Join us  
Trending Stories
1
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
2
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
3
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
4
Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
5
गुंतवणूक सोन्यात की शेअर बाजारात? ३ लाखांच्या सोन्यावर पुढील वर्षी किती नफा मिळेल? सोपं गणित
6
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
7
नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
8
कोट्यवधीची रोकड, सोने हिऱ्यांनी भरलेली बॅग अन् बरेच काही...; ED च्या हाती कुणाचं लागलं 'घबाड'?
9
'ऑपरेशन सिंदूर'वर लष्कर-ए-तैयबा प्रमुख हाफिज सईदचे मोठे वक्तव्य; म्हणाला- 'भारत पुढील 50 वर्षे...'
10
Happy New Year 2026 Wishes: नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Quotes, Messages, WhatsApp Status शेअर करत स्वागत करा नव्या वर्षाचं!
11
Nimesulide Banned: निमसुलाइड औषधावर सरकारनं घातली बंदी, किडनीसाठी अत्यंत धोकादायक!
12
मुंबई महापालिकेसाठी भाजपाची १३७ उमेदवारांची यादी जाहीर; किती अमराठी उमेदवारांना दिली संधी?
13
शिंदेसेनेचे स्वबळावर ७४ उमेदवार! महायुतीचे जागावाटप बारगळले; निवडणूक होणार चुरशीची
14
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं कमळ, भाजपाचे ३ नगरसेवक बिनविरोध 
15
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
16
धनंजय मुंडे यांना दिलासा! करुणा मुंडे यांची याचिका कोर्टाने फेटाळली, काय होतं प्रकरण?
17
भांडवलशाहीचा 'भीष्म पितामह' निवृत्त! दिवाळखोर कंपनीतून वॉरेन बफेंनी कसे उभारले अब्जावधींचे साम्राज्य?
18
अभिषेक बच्चनचं पत्नीसोबत 'न्यू इयर सेलिब्रेशन', चाहतीसोबत फोटो; ऐश्वर्याच्या सौंदर्यावर सगळेच फिदा
19
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
20
कानात ब्लूटूथ इयरफोन लावल्याने कॅन्सरचा मोठा धोका? एक्सपर्ट्सनी सांगितलं 'सत्य'
Daily Top 2Weekly Top 5

कोवळ्या पिकांच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांची रात्रभर जागल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:14 IST

चापोली : कोविडमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी आर्थिक जुळवाजुळव करून खरिपाची पेरणी केली. उगवलेली कोवळी पिके वन्य प्राणी रात्रीच्या ...

चापोली : कोविडमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी आर्थिक जुळवाजुळव करून खरिपाची पेरणी केली. उगवलेली कोवळी पिके वन्य प्राणी रात्रीच्या वेळी फस्त करीत आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात जागल करीत असल्याचे पहावयास मिळत आहे.

जूनच्या प्रारंभी पावसाने दमदार हजेरी लावल्याने चापोलीसह परिसरातील शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी आटोपली. सध्या पिके चांगली उगवली आहेत. त्यामुळे पावसाची गरज आहे. परंतु, १०-१२ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे उगवेली पिके कोमेजू लागली आहेत. पिके वाचविण्यासाठी शेतकरी सिंचनाद्वारे पाणी देण्याचा प्रयत्न करीत आहेत.

चापोलीसह परिसरातील डोंगरमाथ्याच्या शेजारील व परिसरातील हरीण, रानडुक्कर, मोर, सायाळ यासह वन्य प्राणी कोवळ्या पिकांवर ताव मारीत आहेत. वन्य जीवांचे कळप पिके फस्त करीत आहेत. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. पीक जगविण्यासाठी शेतकरी मेटाकुटीला येत आहे. वनविभागाने याकडे लक्ष देऊन नुकसानीची पाहणी करावी आणि संबंधित शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळवून द्यावी. तसेच वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

रात्रीच्या वेळी वन्य प्राणी पिकात...

दिवसा बहुतांश शेतकरी शेतात असल्याने वन्य प्राणी शेतात येत नाहीत. परंतु रात्रीच्या सुमारास हरीण, रानडुकरांचे कळप उगवलेल्या पिकांवर ताव मारीत आहेत. त्यामुळे शेतकरी स्वतःचा जीव धोक्यात घालून रात्रभर जागल करून पिकांचे संरक्षण करीत असल्याचे चित्र दिसत आहेत.

बंदोबस्त करावा...

रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत हरणांचे कळप हे वावरातील कोवळी पिके खाऊन नासाडी करीत आहेत. हरीण शेंडे खात असल्याने पुन्हा पीक वर येत नाही. परिणामी, उत्पनात घट येते. वनविभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा.

- धनंजय बालवाड, शेतकरी, चापोली.

पिकांचे अतोनात नुकसान...

पिकांचे नुकसान टाळण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून वन्य प्राण्यांना हुसकावण्याचा प्रयत्न करीत आहोत. मोठी हरणे भरधाव वेगात पिकातून धावत सुटत असल्याने पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतात रात्र जागून काढावी लागत आहे. फटाकड्या, ध्वनी रेकॉर्डिंग क्षेपकाच्या साह्याने वन्य प्राण्यांना हुसकावून लावत आहोत.

- लक्ष्मण तरगुडे, शेतकरी, चापोली.